शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी ओबीसी नेते एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST

सांगलीत जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक झाली. यावेळी पांडुरंग कोरे, गणेश माळी, राजेंद्र कुंभार, ...

सांगलीत जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक झाली. यावेळी पांडुरंग कोरे, गणेश माळी, राजेंद्र कुंभार, अमर पडळकर, नंदकुमार कोरे, बाबासाहेब आळतेकर आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी नेत्यांनी वज्रमूठ केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत मंगळवारी झालेल्या बैठकीत सरकारविरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचे ठरले.

त्यानुसार गुरुवारी (दि.३) सांगलीत कृष्णा नदीत उतरून निदर्शने केली जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार असून सर्व तालुक्यांत तहसीलदारांनाही स्थानिक स्तरावर निवेदने दिली जातील. अध्यक्षांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला स्थायी सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक गणेश माळी, राजेंद्र कुंभार, अमर पडळकर, ऊर्मिला बेलवलकर, जिल्हा परिषद सदस्या ॲड. शांता कनुजे, माजी महापौर संगीता खोत, पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, प्रकाश ढंग, परशुराम नागरगोजे, बाबासाहेब आळतेकर, जयगौंड कोरे, नंदकुमार कोरे आदी उपस्थित होते.

न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या एका निकालामुळे राज्यभरात ओबीसींचे आरक्षण हिरावले गेले आहे. अनेक जिल्ह्यांत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिकेत ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांतून ओबीसींची अप्रत्यक्ष हकालपट्टी झाल्याचा आरोप अध्यक्षा कोरे यांनी केला.

आळतेकर म्हणाले की, या विषयावरील याचिकेवेळी राज्य सरकारने पुरेशा ताकदीने बाजू मांडली नाही. न्यायालयाने वारंवार विचारणा करूनही प्रतिवाद केला नाही. यामुळेच ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले.

खोत म्हणाल्या की, राजकीय आरक्षण परत मिळण्यासाठी रस्त्यावर यावे लागेल. सरकारने ओबीसी आयोग स्थापन करून वस्तुस्थिती न्यायालयापुढे मांडावी. पांडुरंग कोरे म्हणाले, लॉकडाऊनमुळे प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन केले जाईल. याद्वारे संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरू शकतो हे सरकारला दाखवून देणार आहोत. नंदकुमार कोरे म्हणाले की, ओबीसींचे आरक्षण डावलणे घटनेविरोधात आहे. सध्या राजकीय आरक्षणावर गंडांतर आले आहे, भविष्यात नोकऱ्यांमध्येही येऊ शकते. हा धोका लक्षात घेऊन आताच व्यापक लढा उभारायला हवा.