शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी ओबीसी नेते एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST

सांगलीत जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक झाली. यावेळी पांडुरंग कोरे, गणेश माळी, राजेंद्र कुंभार, ...

सांगलीत जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक झाली. यावेळी पांडुरंग कोरे, गणेश माळी, राजेंद्र कुंभार, अमर पडळकर, नंदकुमार कोरे, बाबासाहेब आळतेकर आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी नेत्यांनी वज्रमूठ केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत मंगळवारी झालेल्या बैठकीत सरकारविरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचे ठरले.

त्यानुसार गुरुवारी (दि.३) सांगलीत कृष्णा नदीत उतरून निदर्शने केली जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार असून सर्व तालुक्यांत तहसीलदारांनाही स्थानिक स्तरावर निवेदने दिली जातील. अध्यक्षांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला स्थायी सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक गणेश माळी, राजेंद्र कुंभार, अमर पडळकर, ऊर्मिला बेलवलकर, जिल्हा परिषद सदस्या ॲड. शांता कनुजे, माजी महापौर संगीता खोत, पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, प्रकाश ढंग, परशुराम नागरगोजे, बाबासाहेब आळतेकर, जयगौंड कोरे, नंदकुमार कोरे आदी उपस्थित होते.

न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या एका निकालामुळे राज्यभरात ओबीसींचे आरक्षण हिरावले गेले आहे. अनेक जिल्ह्यांत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिकेत ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांतून ओबीसींची अप्रत्यक्ष हकालपट्टी झाल्याचा आरोप अध्यक्षा कोरे यांनी केला.

आळतेकर म्हणाले की, या विषयावरील याचिकेवेळी राज्य सरकारने पुरेशा ताकदीने बाजू मांडली नाही. न्यायालयाने वारंवार विचारणा करूनही प्रतिवाद केला नाही. यामुळेच ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले.

खोत म्हणाल्या की, राजकीय आरक्षण परत मिळण्यासाठी रस्त्यावर यावे लागेल. सरकारने ओबीसी आयोग स्थापन करून वस्तुस्थिती न्यायालयापुढे मांडावी. पांडुरंग कोरे म्हणाले, लॉकडाऊनमुळे प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन केले जाईल. याद्वारे संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरू शकतो हे सरकारला दाखवून देणार आहोत. नंदकुमार कोरे म्हणाले की, ओबीसींचे आरक्षण डावलणे घटनेविरोधात आहे. सध्या राजकीय आरक्षणावर गंडांतर आले आहे, भविष्यात नोकऱ्यांमध्येही येऊ शकते. हा धोका लक्षात घेऊन आताच व्यापक लढा उभारायला हवा.