शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोगाच्या रुग्णांचे पोषण लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात सध्या एक हजार १२१ क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या आहे. यापैकी ७८६ रुग्णांना शासनाकडून प्रति ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात सध्या एक हजार १२१ क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या आहे. यापैकी ७८६ रुग्णांना शासनाकडून प्रति महिना ५०० रुपये पोषण भत्ता देण्यात येत असून या भत्त्यापासून जिल्ह्यातील ३३५ क्षयरोगाचे रुग्ण वंचित राहिले आहेत. या रुग्णांची बँक खात्यासह आवश्यक कागदपत्रे न दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

चौकट

जिल्ह्यातील क्षयरोगी : ११२१

भत्ता कितीजणांना मिळतो : ७८६

आजार व भत्ता न मिळणाऱ्यांचे प्रमाण : २९.८८ टक्के

चौकट

टीबीची लक्षणे काय?

-१५ दिवसांपेक्षा जास्त बेडकायुक्त खोकला.

-हलकासा व रात्री येणारा ताप.

-वजन कमी होणे

-भूक कमी होणे,

-बेडक्यातून रक्त येणे, छातीत दुखणे

चौकट

जास्तीत जास्त २४ महिन्यांपर्यंत टीबीमुक्त

टीबीचे लक्षणे आढळून येताच त्याचे निदान झाले तर औषधोपचाराने ६ महिन्यांत टीबी पूर्णपणे बरा होतो. क्षयरोगावर वेळीच उपचार न घेतल्यास तो शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. एमडीआर टीबी नियंत्रणात आणण्याकरिता १८ ते २४ महिने औषधोपचार घ्यावे लागतात. यातून रुग्ण बरा होतो.

कोट

१५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खोकला, छातीत दुखणे, ताप, खोकल्यातून रक्त पडणे असे लक्षणे आढळून आले तर नजीकच्या रुग्णालयात थुंकी तपासणी किंवा एक्स-रे काढून घेणे गरजेचे आहे. खासगी रुग्णालयांनाही टीबीच्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

डॉ. मिलिंद गेजगे, प्रभारी क्षयरोग अधिकारी.