शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

जिल्ह्यात टँकरची संख्या घटली

By admin | Updated: June 23, 2014 00:51 IST

मोठ्या पावसाची प्रतीक्षा : रोजगार हमी योजनेवरील मजूर वाढले

सांगली : मान्सून पावसाच्या सरींमुळे जिल्ह्यातील टँकरची संख्या सहाने घटली आहे. टँकरची संख्या आता तीसवरुन वीसवर आली आहे. दरम्यान, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या मात्र अकरा हजारांवर गेली आहे. गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, शिराळा व मिरज तालुक्यात तीस टँकर सुरू करण्यात आले होते. यामधील जत, आटपाडी, खानापूर व शिराळा तालुक्यातील सहा टँकर कमी करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली ८४६ कामे सुरु असून, यावर ११ हजार ५१९ मजूर काम करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. त्याचबरोबर शासकीय यंत्रणेकडील १०६ कामावर ८६५ मजूर काम करीत आहेत. सर्वाधिक कामे आटपाडी तालुक्यात सुरु असून, येथे २२५ कामे सुरु आहेत. तालुकानिहाय कामांची संख्या कंसात मजुरांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. आटपाडी २२५ (३२०७), जत १९६ (३३९७), कडेगाव ४२ (४१९), कवठेमहांकाळ २४ (३०७), खानापूर ६२ (७४७), मिरज ३१ (२९५), पलूस ६६ (११४१), शिराळा ४५ (१९९), तासगाव ८२ (८७३), वाळवा ७३ ( ९३५) अशी कामे सुरु आहेत. मागणीच्या ठिकाणी तात्काळ कामे सुरू करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.