शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

रोजगार हमी योजनेवर मजुरांची संख्या चौपट - सांगली जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:18 IST

शरद जाधव । सांगली : पावसाने दिलेली ओढ व तीव्र पाणीटंचाईमुळे शेतातील कामे थांबली असतानाच, आता ‘मनरेगां’तर्गत (महात्मा गांधी ...

ठळक मुद्देगतवर्षी साडेसहा हजार मजुरांची नोंद, यंदा २३ हजारांवर लोक कामावर

शरद जाधव ।सांगली : पावसाने दिलेली ओढ व तीव्र पाणीटंचाईमुळे शेतातील कामे थांबली असतानाच, आता ‘मनरेगां’तर्गत (महात्मा गांधी रोजगार हमी) जिल्हाभर सुरू असलेल्या कामांवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात गेल्या दीड वर्षापासून एकदाही समाधानकारक पाऊस न झाल्याने राज्य शासनाने गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मनरेगाच्या कामांवर २३ हजारावर मजूर काम करत आहेत. गतवर्षी हीच संख्या साडे सहा हजार होती.जिल्ह्याचा पूर्व भाग नेहमीच दुष्काळाच्या झळांनी होरपळत असतो. पाणी योजनांच्या माध्यमातून यातील काही भाागात पाणी पोहोचले असले तरी, पाचवीला पूजलेला दुष्काळ हटण्याचे नाव घेत नाही. यामुळेच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. स्वाभाविकपणे शेतीतील कामे थांबली आहेत. जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव पूर्व भागातही दाहकता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कामे करण्याबरोबरच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.

रस्त्यांची दुरूस्ती, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड, मुरुमीकरण, विहिरींची कामे, पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी फळबाग लागवड, बांधबंदिस्ती यासह इतर कामे ग्रामपंचायतीसह इतर विभागाकडून सुरू आहेत. जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे मनरेगाअंतर्गत सुरू आहेत.या आठवड्यातील मनरेगावर कार्यरत मजुरांचा आढावा घेतला असता, मजुरांच्या संख्येत वाढच होत आहे. ही संख्या गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १४९ कामांवर ५ हजार १३४ मजूर आटपाडी तालुक्यात कार्यरत आहेत, तर तासगाव तालुक्यात ४ हजार ७०४ मजूर मनरेगाच्या कामावर राबत आहेत. जिल्ह्यात ५२३ कामे सुरू असून यात ग्रामपंचायतीमार्फत ३०७, तर इतर विभागामार्फत २४९ कामे सुरू आहेत.

विशेष म्हणजे केवळ दुष्काळी तालुकेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातच मनरेगांतर्गत कामे सुरू आहेत. यात वाळवा, पलूस तालुक्यात कामांची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायतींपैकी २४९ ग्रामपंचायतींकडून मनरेगाची कामे सुरू करण्यात आली आहेत.जानेवारीनंतर दुष्काळाची दाहकता आणखी वाढणार आहे. त्यामुळे जूनपर्यंतच्या कालावधित मजुरांना काम मिळेल याचे नियोजन केले आहे. रब्बी हंगाम बहरात असताना, पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांना मनरेगाच्या कामावर जावे लागत असल्याने, दुष्काळीची जिल्ह्यातील तीव्रता स्पष्टपणे दिसत आहे.लोकसहभागातून : कामांना प्राधान्यजिल्ह्यातील सर्वच दहा तालुक्यात मनरेगाची कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तालुक्यात दुष्काळाची दाहकता नसली तरी, या भागातील कामे लोकसहभागातून करण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे केवळ दुष्काळीच नव्हे, तर सधन भागातील कामे होण्यासही मदत होत आहे. विशेष म्हणजे दुष्काळाचे गंभीर रूप असलेल्या जत तालुक्यात मनरेगाच्या कामांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असल्याने याठिकाणी तुलनेने कमी कामे सुरू आहेत. 

अशी बदलली स्थितीजिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामावर गतवर्षी साडेसहा हजार मजूर काम करीत होते. यंदा नोव्हेंबर २0१९ पर्यंत मजुरांची संख्याही १0 हजाराच्या घरात होती. ती जानेवारीपर्यंत आता २३ हजाराच्या घरात गेली आहे. दोन महिन्यात अचानक दुप्पट वाढ झाल्याने दुष्काळाची दाहकता दिसून येत आहे.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार