शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आता लक्ष्य सीईटी परीक्षा, अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST

संतोष भिसे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दहावीच्या बंपर निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ...

संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दहावीच्या बंपर निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात प्रवेशासाठी सीईटी होणार असून त्यानंतर प्रवेशाचे वेळापत्रक शासनाकडून जाहीर केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांचा कल पाहता, प्रवेशासाठी त्यांनी ग्रामीण भागाला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे एसटीची वाहतूक बंद आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामांसाठी शहरांकडे महाविद्यालयात येता आले नाही. अत्यावश्यक कामासाठी येताना बरीच कसरत करावी लागली. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. या स्थितीत शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला तरी, विद्यार्थ्यांना पुन्हा गावाकडेच अडकून पडावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गावाकडील महाविद्यालयांनाच प्राधान्य दिल्याचे आढळत आहे. त्यामुळे ग्रामीण महाविद्यालये यंदा फुल्ल होण्याची चिन्हे आहेत.

बॉक्स

यंदाही अकरावी रेस्ट ईयरच

अकरावीचे वर्ष विद्यार्थी रेस्ट इयर मानतात. कोरोनामध्ये तर खऱ्याअर्थाने ते रेस्ट ईयरच ठरले. यावर्षीही वर्ग सुरू होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे विद्यार्थी गावातच थांबण्याच्या मानसिकतेत आहेत.

कोट

यावर्षी गावातच थांबणार

गेले वर्षभर महाविद्यालये बंद असल्याने चांगला अभ्यास झाला नाही. येणाऱ्या वर्षात काय होईल याची निश्चिती अद्याप नाही. त्यामुळे गावातच प्रवेश घेणार आहे.

- ओंकार सावंत, विद्यार्थी, एरंडोली

डिप्लोमाला प्रवेश घ्यायचा होता, पण यावर्षीही तिसऱ्या लाटेत महाविद्यालये बंद राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गावातच प्रवेश घेणार आहे.

- स्नेहा आळतेकर, विद्यार्थिनी, अंकली.

सीईटीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया

अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. प्रवेशासाठी ऑगस्ट महिन्यात सीईटी होणार आहे. तिचा निकाल लागल्यानंतर शासनाकडून अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. सीईटी सक्तीची नाही. दहावीचा निकाल चांगला लागल्याने अकरावीचे सर्व शाखांचे प्रवेश यावर्षी फुल्ल होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीही चांगल्या निकालाने अकरावीला प्रतिसाद होता.

- पोपट मलगुंडे, निरीक्षक, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद

पॉईंटर्स

अकरावीला प्रवेश देणारी महाविद्यालये : २३८, एकूण जागा : ४३,७४०, गेल्यावर्षी किती अर्ज आले : ४१,०००, कितीजणांनी प्रवेश घेतला : ३८,२४०, किती जागा रिक्त राहिल्या : ५५००.