शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आता लक्ष्य सीईटी परीक्षा, अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST

संतोष भिसे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दहावीच्या बंपर निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ...

संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दहावीच्या बंपर निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात प्रवेशासाठी सीईटी होणार असून त्यानंतर प्रवेशाचे वेळापत्रक शासनाकडून जाहीर केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांचा कल पाहता, प्रवेशासाठी त्यांनी ग्रामीण भागाला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे एसटीची वाहतूक बंद आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामांसाठी शहरांकडे महाविद्यालयात येता आले नाही. अत्यावश्यक कामासाठी येताना बरीच कसरत करावी लागली. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. या स्थितीत शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला तरी, विद्यार्थ्यांना पुन्हा गावाकडेच अडकून पडावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गावाकडील महाविद्यालयांनाच प्राधान्य दिल्याचे आढळत आहे. त्यामुळे ग्रामीण महाविद्यालये यंदा फुल्ल होण्याची चिन्हे आहेत.

बॉक्स

यंदाही अकरावी रेस्ट ईयरच

अकरावीचे वर्ष विद्यार्थी रेस्ट इयर मानतात. कोरोनामध्ये तर खऱ्याअर्थाने ते रेस्ट ईयरच ठरले. यावर्षीही वर्ग सुरू होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे विद्यार्थी गावातच थांबण्याच्या मानसिकतेत आहेत.

कोट

यावर्षी गावातच थांबणार

गेले वर्षभर महाविद्यालये बंद असल्याने चांगला अभ्यास झाला नाही. येणाऱ्या वर्षात काय होईल याची निश्चिती अद्याप नाही. त्यामुळे गावातच प्रवेश घेणार आहे.

- ओंकार सावंत, विद्यार्थी, एरंडोली

डिप्लोमाला प्रवेश घ्यायचा होता, पण यावर्षीही तिसऱ्या लाटेत महाविद्यालये बंद राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गावातच प्रवेश घेणार आहे.

- स्नेहा आळतेकर, विद्यार्थिनी, अंकली.

सीईटीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया

अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. प्रवेशासाठी ऑगस्ट महिन्यात सीईटी होणार आहे. तिचा निकाल लागल्यानंतर शासनाकडून अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. सीईटी सक्तीची नाही. दहावीचा निकाल चांगला लागल्याने अकरावीचे सर्व शाखांचे प्रवेश यावर्षी फुल्ल होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीही चांगल्या निकालाने अकरावीला प्रतिसाद होता.

- पोपट मलगुंडे, निरीक्षक, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद

पॉईंटर्स

अकरावीला प्रवेश देणारी महाविद्यालये : २३८, एकूण जागा : ४३,७४०, गेल्यावर्षी किती अर्ज आले : ४१,०००, कितीजणांनी प्रवेश घेतला : ३८,२४०, किती जागा रिक्त राहिल्या : ५५००.