शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेविरूद्ध आता रस्त्यावर उतरा

By admin | Updated: June 10, 2016 00:21 IST

जयंत पाटील : सांगलीत राष्ट्रवादीचा मेळावा

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. सत्ताधाऱ्यांतील भांडणावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे शहरातील विकास कामांचे वाटोळे झाले असून, पालिकेतील चुकीच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला. येथील दीनानाथ नाट्यगृहात सांगली विधानसभा क्षेत्र कार्यकर्त्यांचा मेळावा व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, लीलाताई जाधव उपस्थित होते. पाटील म्हणाले की, महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस विकासात अपयशी ठरली आहे. लोकांची सेवा सक्षमपणे केली जात नाही. सत्ताधाऱ्यांतच इतकी भांडणे आहेत की, त्यावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. त्यांच्यातील गटबाजीच्या राजकारणाने शहराचे वाटोळे झाले आहे. पिण्याचे पाणी, डास, गटारी, ड्रेनेज, घरकुलांचे पुनर्वसन, कचऱ्याचा प्रश्न घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. शहराचा विकास खोळंबला आहे. त्यासाठी विधानसभा क्षेत्र व शहरातील युवक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या चुकीच्या निर्णयाला विरोध करावा. पुढील निवडणुकीत महापालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रवादीतील असंख्य कार्यकर्त्यांतून पदाधिकारी निवडी झाल्या आहेत. पदे काम करण्यासाठी दिली जातात. पक्षवाढीसाठी कोणी योगदान देणार नसेल, तर त्याचे पद काढून घेतले जाईल. आपण विरोधी पक्षात आहोत, हे कार्यकर्त्यांनी विसरू नये. महापालिका निवडणुकीसाठी अजून दोन वर्षे आहेत. कार्यकर्त्यांनी प्रभागात पक्षाची बांधणी करावी. ऐनवेळी पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असेही पाटील म्हणाले. यावेळी नगरसेवक विष्णू माने, युवराज गायकवाड, आशा शिंदे, माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे, वसुधा कुंभार, राहुल पवार, मनोज भिसे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांना डोस : पालिकेवर टीकास्त्रमहापालिकेत सत्ताधाऱ्यांचा सावळागोंधळ सुरू आहे. विरोधी राष्ट्रवादीची टीम सत्ताधाऱ्यांविरोधात काम करीत आहे. जनता व कार्यकर्त्यांची भेट रस्त्यावर झाली पाहिजे. तशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. संयमाने बोलले तर जनता प्रतिसाद देते. वाट्टेल तसे बोललो तर काय होते, हे सर्वांनाच माहीत आहे, असा चिमटाही कार्यकर्त्यांना काढला.