शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

महापालिकेविरूद्ध आता रस्त्यावर उतरा

By admin | Updated: June 10, 2016 00:21 IST

जयंत पाटील : सांगलीत राष्ट्रवादीचा मेळावा

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. सत्ताधाऱ्यांतील भांडणावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे शहरातील विकास कामांचे वाटोळे झाले असून, पालिकेतील चुकीच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला. येथील दीनानाथ नाट्यगृहात सांगली विधानसभा क्षेत्र कार्यकर्त्यांचा मेळावा व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, लीलाताई जाधव उपस्थित होते. पाटील म्हणाले की, महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस विकासात अपयशी ठरली आहे. लोकांची सेवा सक्षमपणे केली जात नाही. सत्ताधाऱ्यांतच इतकी भांडणे आहेत की, त्यावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. त्यांच्यातील गटबाजीच्या राजकारणाने शहराचे वाटोळे झाले आहे. पिण्याचे पाणी, डास, गटारी, ड्रेनेज, घरकुलांचे पुनर्वसन, कचऱ्याचा प्रश्न घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. शहराचा विकास खोळंबला आहे. त्यासाठी विधानसभा क्षेत्र व शहरातील युवक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या चुकीच्या निर्णयाला विरोध करावा. पुढील निवडणुकीत महापालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रवादीतील असंख्य कार्यकर्त्यांतून पदाधिकारी निवडी झाल्या आहेत. पदे काम करण्यासाठी दिली जातात. पक्षवाढीसाठी कोणी योगदान देणार नसेल, तर त्याचे पद काढून घेतले जाईल. आपण विरोधी पक्षात आहोत, हे कार्यकर्त्यांनी विसरू नये. महापालिका निवडणुकीसाठी अजून दोन वर्षे आहेत. कार्यकर्त्यांनी प्रभागात पक्षाची बांधणी करावी. ऐनवेळी पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असेही पाटील म्हणाले. यावेळी नगरसेवक विष्णू माने, युवराज गायकवाड, आशा शिंदे, माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे, वसुधा कुंभार, राहुल पवार, मनोज भिसे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांना डोस : पालिकेवर टीकास्त्रमहापालिकेत सत्ताधाऱ्यांचा सावळागोंधळ सुरू आहे. विरोधी राष्ट्रवादीची टीम सत्ताधाऱ्यांविरोधात काम करीत आहे. जनता व कार्यकर्त्यांची भेट रस्त्यावर झाली पाहिजे. तशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. संयमाने बोलले तर जनता प्रतिसाद देते. वाट्टेल तसे बोललो तर काय होते, हे सर्वांनाच माहीत आहे, असा चिमटाही कार्यकर्त्यांना काढला.