शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आता लक्ष इस्लामपूर बाजार समितीकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2015 00:19 IST

पडघम वाजू लागले : जयंतरावांविरोधात विरोधकांचे जुजबी आव्हान; तडजोडीच्या राजकारणाची चिन्हे

अशोक पाटील -इस्लामपूरय. मो. कृष्णा सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच, आता इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधारी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात विरोधकांचे जुजबी आव्हान असल्याने हे विरोधक जयंत पाटील यांच्याबरोबर मिळते—जुळते घेऊन काही तरी पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहेत.राजारामबापू उद्योग समूहातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका जवळजवळ बिनविरोध झाल्या आहेत, तर सातारा जिल्ह्यातील कृष्णा सह. साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. या निवडणुकीत जयंत पाटील यांचे जवळजवळ ९0 टक्के कार्यकर्ते सक्रिय होते. या निवडणुकीचा धुरळा शांत होतो न होतो तोच, वाळवा तालुक्यातील जयंत पाटील समर्थकांनी आपला मोर्चा बाजार समितीकडे वळविला आहे.गत निवडणुकीत जयंत पाटील यांच्यासोबत नानासाहेब महाडिक यांनी मिळते-जुळते घेतले होते. यावेळी मात्र त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले आहेत, तर भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी या निवडणुकीविषयी मौन पाळले आहे.ही निवडणूक १९ संचालकांच्या निवडीसाठी होत असून गतवेळी शिराळा मतदार संघातील कासेगाव, पेठ, ठाणापुडे, ऐतवडे खुर्द, तांदुळवाडी, तर वाळवा तालुक्यातील साखराळे, शिरटे, नागाव, नरसिंहपूर, बहाद्दूरवाडी, कोरेगाव, बावची, अहिरवाडी, साटपेवाडी, शिरगाव, इस्लामपूर, बोरगाव या गावांतील कार्यकर्त्यांना संचालक पदाची संधी मिळाली आहे. यावेळी मात्र नवख्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार जयंत पाटील करीत आहेत.एकूणच बाजार समितीसाठी तडजोडीच्या राजकारणाची चिन्हे दिसत आहेत. कोरे यांचा दावा...इस्लामपूरमधून बाळासाहेब कोरे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यांनी प्रसिध्दीपत्रकात, मी जयंत पाटील यांचा कसा समर्थक आहे, याचाच जास्त उल्लेख केला आहे. पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, भगवान पाटील आणि शहाजी पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. तसेच उमेदवारी न दिल्यास संबंधितांकडे इस्लामपूरच्या पांढरीतील देवच पाहील, असाही उल्लेख केला आहे.व्यापाऱ्यांची मागणीएक तराजू घेऊन कांदा, बटाट्याचा व्यापार करणाऱ्या अनिल पावणे यांनी, कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक पद मिळावे यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले. परंतु त्यांना स्थानिक नेत्यांनी न्याय दिला नाही. यावेळी तरी जयंत पाटील यांनी त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी बाजारातील इतर व्यापाऱ्यांनी केली आहे.