शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

आता आषाढामध्येही शुभमंगल सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : परंपरेनुसार आषाढात शुभकार्य टाळली जातात, मात्र, यंदाच्या आषाढात निकड पाहून विवाह सोहळे होऊ लागले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : परंपरेनुसार आषाढात शुभकार्य टाळली जातात, मात्र, यंदाच्या आषाढात निकड पाहून विवाह सोहळे होऊ लागले आहेत. यासाठी काढीव मुहूर्ताचा आधार घेतला जात आहे. सध्या लॉकडाऊनचे निर्बंध असल्याने अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोहळे आटोपले जात आहेत.

साैर पंचांगाप्रमाणे वर्षातील हा चौथा महिना असतो. सूर्य जेव्हा १६ जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा हिंदू पंचांगातील आषाढ सुरू होतो. याकाळात शुभकार्ये वर्ज्य मानली जातात. सध्या कोरोनाचा काळ आहे. लॉकडाऊन व त्यातील निर्बंधांमुळे लोकांसमोर विवाह सोहळ्यावरून अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मुहूर्त शोधून अडचणीतून सोहळे पार पाडले जात आहेत. गौण काळात असे मुहूर्त शोधले जातात. अनेक पंचांगकर्त्यांनीही या महिन्यात मुहूर्त दिलेले आहेत. चातुर्मासाचा काळही विवाह सोहळ्यांसाठी वर्ज्य मानला जातो, मात्र, या काळातही शुभमुहूर्त पाहून लग्नसमारंभाचे नियोजन करण्यात येत आहे.

चौकट

आषाढातही मुहूर्त

पंचागकर्त्यांनी या महिन्यात १२, २५, २६, २८, २९ जुलैला विवाह मुहूर्त प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार आता २५ तारखेपासून पुढील मुहूर्तावर लग्नसोहळे आटोपण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

कोट

आषाढात शुभमुहूर्त टाळले जायचे, पण आता निकडीच्यावेळी गौणकाळातही शास्त्राच्या आधारानुसार मुहूर्त काढले जात आहेत. सध्या कोरोनाचे निर्बंध आहेत. त्यामुळे या काळात गरजेनुसार लग्नांसाठी शुभमुहूर्त काढले जात आहेत.

- संतोष गाडगीळ, भटजी, सांगली

चौकट

परवानगी केवळ २५ लोकांचीच

सांगली जिल्ह्यात सध्या कडक लॉकडाऊन लागू असून लग्नसोहळ्यांकरीता केवळ २५ लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिली जात आहे. वर आणि वधूच्या घरचे व अगदी जवळचे नातेवाईक घेऊनच लग्नसोहळे करावे लागत आहेत.

चौकट

मंगल कार्यालये पडली ओस

मंगल कार्यालय चालक संतोष भट म्हणाले की, सध्या २५ लोकांच्या उपस्थितीचे बंधन असल्याने मंगल कार्यालयांमध्ये सोहळे टाळले जात आहेत. इतक्या लोकांसाठी कार्यालय परवडत नसल्याने घरात, शेतात किंवा मठ, मंदिरांमध्ये लग्न करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे कार्यालय व त्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.