शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आता आषाढामध्येही शुभमंगल सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : परंपरेनुसार आषाढात शुभकार्य टाळली जातात, मात्र, यंदाच्या आषाढात निकड पाहून विवाह सोहळे होऊ लागले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : परंपरेनुसार आषाढात शुभकार्य टाळली जातात, मात्र, यंदाच्या आषाढात निकड पाहून विवाह सोहळे होऊ लागले आहेत. यासाठी काढीव मुहूर्ताचा आधार घेतला जात आहे. सध्या लॉकडाऊनचे निर्बंध असल्याने अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोहळे आटोपले जात आहेत.

साैर पंचांगाप्रमाणे वर्षातील हा चौथा महिना असतो. सूर्य जेव्हा १६ जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा हिंदू पंचांगातील आषाढ सुरू होतो. याकाळात शुभकार्ये वर्ज्य मानली जातात. सध्या कोरोनाचा काळ आहे. लॉकडाऊन व त्यातील निर्बंधांमुळे लोकांसमोर विवाह सोहळ्यावरून अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मुहूर्त शोधून अडचणीतून सोहळे पार पाडले जात आहेत. गौण काळात असे मुहूर्त शोधले जातात. अनेक पंचांगकर्त्यांनीही या महिन्यात मुहूर्त दिलेले आहेत. चातुर्मासाचा काळही विवाह सोहळ्यांसाठी वर्ज्य मानला जातो, मात्र, या काळातही शुभमुहूर्त पाहून लग्नसमारंभाचे नियोजन करण्यात येत आहे.

चौकट

आषाढातही मुहूर्त

पंचागकर्त्यांनी या महिन्यात १२, २५, २६, २८, २९ जुलैला विवाह मुहूर्त प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार आता २५ तारखेपासून पुढील मुहूर्तावर लग्नसोहळे आटोपण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

कोट

आषाढात शुभमुहूर्त टाळले जायचे, पण आता निकडीच्यावेळी गौणकाळातही शास्त्राच्या आधारानुसार मुहूर्त काढले जात आहेत. सध्या कोरोनाचे निर्बंध आहेत. त्यामुळे या काळात गरजेनुसार लग्नांसाठी शुभमुहूर्त काढले जात आहेत.

- संतोष गाडगीळ, भटजी, सांगली

चौकट

परवानगी केवळ २५ लोकांचीच

सांगली जिल्ह्यात सध्या कडक लॉकडाऊन लागू असून लग्नसोहळ्यांकरीता केवळ २५ लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिली जात आहे. वर आणि वधूच्या घरचे व अगदी जवळचे नातेवाईक घेऊनच लग्नसोहळे करावे लागत आहेत.

चौकट

मंगल कार्यालये पडली ओस

मंगल कार्यालय चालक संतोष भट म्हणाले की, सध्या २५ लोकांच्या उपस्थितीचे बंधन असल्याने मंगल कार्यालयांमध्ये सोहळे टाळले जात आहेत. इतक्या लोकांसाठी कार्यालय परवडत नसल्याने घरात, शेतात किंवा मठ, मंदिरांमध्ये लग्न करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे कार्यालय व त्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.