शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

‘किसान सन्मान’अंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेल्या रक्कम वसुलीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST

केंद्रीय कृषी कल्याण मंत्रालयाने फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ...

केंद्रीय कृषी कल्याण मंत्रालयाने फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. दीड वर्षे अनुदान दिल्यानंतर लाभार्थ्यांची छाननी करून आयकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहेत. आयकर भरणाऱ्या किंवा यापूर्वी भरलेल्या शेतकरी खातेदारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. तहसीलदारांमार्फत शेतकऱ्यांन‍ा दीड वर्षात मिळालेल्या रक्कम वसुलीच्या नोटिसा तलाठ्यांमार्फत बजावण्यात येत आहेत. आयकर भरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने अपात्र लाभार्थी ठरल्याने आपल्या बँक खात्यावर जमा झालेली लाभाची रक्कम शासनास परत करावी. आपण पात्र नसताना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करून शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहात. योजनेसाठी अपात्र असल्याने घेतलेली रक्कम आपल्या गावातील तलाठ्यांकडे शासकीय पावती घेऊन जमा करावी. दहा दिवसांत ही रक्कम जमा न केल्यास वसुली कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी नोटिसीत म्हटले आहे.

मिरज तालुक्यात सुमारे ५० हजार लाभार्थी असून, यापैकी आयकर भरणाऱ्या १६४४ शेतकऱ्यांना १ कोटी २८ लाख वसुलीच्या व इतर कारणांमुळे अपात्र ठरविलेल्या ७६३ शेतकऱ्यांना ४५ लाख रुपये वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. किसान सन्मान योजनेचे जिल्ह्यात सुमारे ४ लाख ५८ हजार लाभार्थी असून, यापैकी १४ हजारजणांना अपात्र ठरवून १० कोटी ४६ लाख रुपये वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. आयकर न भरणाऱ्या शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नाहीत. कर्ज मिळविण्यासाठी आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासन लाभार्थी म्हणून अपात्र ठरवित असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. प्रशासनाच्या वसुली नोटिसांमुळे शेतकरी संतप्त आहेत.