शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘किसान सन्मान’अंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेल्या रक्कम वसुलीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST

केंद्रीय कृषी कल्याण मंत्रालयाने फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ...

केंद्रीय कृषी कल्याण मंत्रालयाने फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. दीड वर्षे अनुदान दिल्यानंतर लाभार्थ्यांची छाननी करून आयकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहेत. आयकर भरणाऱ्या किंवा यापूर्वी भरलेल्या शेतकरी खातेदारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. तहसीलदारांमार्फत शेतकऱ्यांन‍ा दीड वर्षात मिळालेल्या रक्कम वसुलीच्या नोटिसा तलाठ्यांमार्फत बजावण्यात येत आहेत. आयकर भरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने अपात्र लाभार्थी ठरल्याने आपल्या बँक खात्यावर जमा झालेली लाभाची रक्कम शासनास परत करावी. आपण पात्र नसताना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करून शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहात. योजनेसाठी अपात्र असल्याने घेतलेली रक्कम आपल्या गावातील तलाठ्यांकडे शासकीय पावती घेऊन जमा करावी. दहा दिवसांत ही रक्कम जमा न केल्यास वसुली कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी नोटिसीत म्हटले आहे.

मिरज तालुक्यात सुमारे ५० हजार लाभार्थी असून, यापैकी आयकर भरणाऱ्या १६४४ शेतकऱ्यांना १ कोटी २८ लाख वसुलीच्या व इतर कारणांमुळे अपात्र ठरविलेल्या ७६३ शेतकऱ्यांना ४५ लाख रुपये वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. किसान सन्मान योजनेचे जिल्ह्यात सुमारे ४ लाख ५८ हजार लाभार्थी असून, यापैकी १४ हजारजणांना अपात्र ठरवून १० कोटी ४६ लाख रुपये वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. आयकर न भरणाऱ्या शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नाहीत. कर्ज मिळविण्यासाठी आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासन लाभार्थी म्हणून अपात्र ठरवित असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. प्रशासनाच्या वसुली नोटिसांमुळे शेतकरी संतप्त आहेत.