शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

‘किसान सन्मान’अंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेल्या रक्कम वसुलीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST

केंद्रीय कृषी कल्याण मंत्रालयाने फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ...

केंद्रीय कृषी कल्याण मंत्रालयाने फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. दीड वर्षे अनुदान दिल्यानंतर लाभार्थ्यांची छाननी करून आयकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहेत. आयकर भरणाऱ्या किंवा यापूर्वी भरलेल्या शेतकरी खातेदारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. तहसीलदारांमार्फत शेतकऱ्यांन‍ा दीड वर्षात मिळालेल्या रक्कम वसुलीच्या नोटिसा तलाठ्यांमार्फत बजावण्यात येत आहेत. आयकर भरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने अपात्र लाभार्थी ठरल्याने आपल्या बँक खात्यावर जमा झालेली लाभाची रक्कम शासनास परत करावी. आपण पात्र नसताना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करून शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहात. योजनेसाठी अपात्र असल्याने घेतलेली रक्कम आपल्या गावातील तलाठ्यांकडे शासकीय पावती घेऊन जमा करावी. दहा दिवसांत ही रक्कम जमा न केल्यास वसुली कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी नोटिसीत म्हटले आहे.

मिरज तालुक्यात सुमारे ५० हजार लाभार्थी असून, यापैकी आयकर भरणाऱ्या १६४४ शेतकऱ्यांना १ कोटी २८ लाख वसुलीच्या व इतर कारणांमुळे अपात्र ठरविलेल्या ७६३ शेतकऱ्यांना ४५ लाख रुपये वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. किसान सन्मान योजनेचे जिल्ह्यात सुमारे ४ लाख ५८ हजार लाभार्थी असून, यापैकी १४ हजारजणांना अपात्र ठरवून १० कोटी ४६ लाख रुपये वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. आयकर न भरणाऱ्या शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नाहीत. कर्ज मिळविण्यासाठी आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासन लाभार्थी म्हणून अपात्र ठरवित असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. प्रशासनाच्या वसुली नोटिसांमुळे शेतकरी संतप्त आहेत.