शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

राज्यपाल नियुक्त सदस्यप्रकरणी केंद्र सरकारला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:21 IST

सांगली : राज्यपाल नियुक्त सदस्यप्रकरणी कायद्यातील मूळ तरतुदींचा भंग होत असल्याप्रकरणी याचिकेस दखलपात्र ठरवत उच्च न्यायालयाने याप्रकरणी म्हणणे मांडण्यास ...

सांगली : राज्यपाल नियुक्त सदस्यप्रकरणी कायद्यातील मूळ तरतुदींचा भंग होत असल्याप्रकरणी याचिकेस दखलपात्र ठरवत उच्च न्यायालयाने याप्रकरणी म्हणणे मांडण्यास केंद्र सरकारच्या ॲटर्नी जनरलना आदेश दिले आहेत.

न्यायमूर्ती आर. डी. धानुका व माधव जामदार यांच्या खंडपीठाने याबाबतचे आदेश दिले. या याचिकांद्वारे सदस्य नियुक्तीत मंत्रिमंडळ आणि राज्यपालांच्या अमर्याद अधिकारांनाच आव्हान दिले असून, त्यावर आता केंद्र सरकारला स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे. याचिकाकर्ते दिलीप आगळे (लातूर) आणि शिवाजी पाटील (सांगली) यांनी स्वतंत्रपणे याचिका दाखल केल्याने राज्य सरकारने १२ व्यक्तींच्या नियुक्‍त्या करण्याबाबत राज्यपालांना केलेली शिफारस आता न्यायालयीन वादात अडकली आहे. संविधानातील कलम १७१ (३)(इ) मधील तरतुदीनुसार कला, विज्ञान, साहित्य, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांतील जाणकारांना विधान परिषेदवर नियुक्तीचे अधिकार राज्यपालांना आहेत. मात्र, आजवर या नियुक्त्या राजकीय हेतूने केल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयास निदर्शनास आणून दिले. पराभूत झालेल्या उमेदवारांचे पुनर्वसन करण्यासाठी किंवा मर्जीतील राजकीय व्यक्तींच्या नेमणुका करण्यासाठी या तरतुदीचा गैरवापर होऊ नये व खिरापतीसारख्या नियुक्त्या वाटल्या जाऊ नयेत, यासाठी ही याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्त्यांनी स्वतःची नियुक्ती विधान परिषदेवर व्हावी, यासाठीही राज्य सरकार व राज्यपालांकडे प्रस्ताव पाठविले होते. या दोन्ही याचिका दाखल करून घेण्यास पात्र नाहीत, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे महाअभिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने याचिकेतील मुद्यांचे घटनात्मक महत्त्व लक्षात घेत त्या विचारार्थ घेण्यास योग्य असल्याचे प्राथमिक मत नोंदविले आणि केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल यांना म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली.

कोट

उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्यपाल नियुक्त सदस्य नोंदणीबाबत राज्य आणि केंद्र सरकारला आता स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. तसेच योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी राज्यपालांवर घटनात्मक बंधन घालतानाच त्यांच्या अधिकारांच्या मर्यादाबाबतही स्पष्टता येईल.

- शिवाजी पाटील, याचिकाकर्ते, सांगली