शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

हरिपूर-आकाशवाणी रस्त्यावरील ४९० घरांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:23 IST

सांगली : हरिपूर ते कोथळी या नवीन पुलाला जोड रस्ता म्हणून हरिपूर ते आकाशवाणी रस्त्याचे ९० फुटाने रुंदीकरण करण्यासाठी ...

सांगली : हरिपूर ते कोथळी या नवीन पुलाला जोड रस्ता म्हणून हरिपूर ते आकाशवाणी रस्त्याचे ९० फुटाने रुंदीकरण करण्यासाठी येथील ४९० लोकांना भूसंपादनाच्या नोटिसा बजावल्या आहेत. येथील लोकांनी यास विरोध दर्शविल्यानंतर प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांनी बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.

हरिपूर ते कोथळी पुलाचे काम सध्या सुरू आहे. त्याला जोड रस्ता म्हणून हरिपूर ते आकाशवाणी हा पूर्वीचा ग्रामीण मार्ग भाजपच्या सत्ताकाळात जिल्हा मार्ग केला आहे. येथील नागरिकांना याची कोणतीही कल्पना नव्हती. अचानक या मार्गावर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नागरिक हादरले. या रुंदीकरण प्रक्रियेमुळे येथील ४९० घरे बाधित होणार आहे. यामध्ये मातंग समाजाची जवळपास ८० ते ९० घरे असून, अनेक मोठे बंगले, शेती, समाजमंदिरेही आहेत. या सर्व लोकांनी या कारवाईला विरोध केला आहे.

पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी या रस्ता रुंदीकरणास हरिपुरात ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला होता. याबाबत ग्रामपंचायतीत ठरावही केला होता. त्यावेळी बांधकाम विभागाने या पुलासाठी हरिपूर ते आकाशवाणी हा रस्ता न वापरता हरिपूर ते अंकली हा सध्याचा अस्तित्वातील रस्ता वापरणार असल्याचे सांगून कोणाचे घर, शेती भूसंपादनात जाणार नसल्याचे ग्वाही दिली होती. त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध मावळला होता.

मात्र काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली घरे, शेत जमीन व प्लॉटधारकांना नोटिसा बजावल्या. यात आडवी येणारी बांधकामे अतिक्रमणे ठरवून पाडण्याचा इशारा या नोटिसीद्वारे दिला आहे. त्यामुळे या लोकांनी संजय बजाज यांच्या माध्यमातून ही बाब पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून देत हा रस्ता जिल्हा मार्ग न करता सध्या आहे ग्रामीण मार्ग ठेवावा अशी मागणी केली होती.

स्थगितीची मागणी

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले की, याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी बांधकाम विभागाने सुरू केलेल्या या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. तोपर्यंत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला कारवाई न करण्याची सूचना दिली आहे.