शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अट्टाहास वर्चस्वाचा नव्हे, विकासाचा हवा

By admin | Updated: November 23, 2015 00:32 IST

तासगाव तालुक्यात नेत्यांकडून अपेक्षा : जनतेला हवेत आमदार आणि खासदारही

दत्ता पाटील- तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील वर्चस्ववादाचे कवित्व भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून संपलेले नाही. मात्र तालुक्यातील जनतेचा खरा कौलच नेत्यांना समजला नाही की काय? असाच प्रश्न चढाओढीच्या राजकारणाने उपस्थित झाला आहे. तालुक्याला विधानसभेसोबतच लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची पहिल्यांदा संधी मिळालेली आहे. आमदार सुमनताई पाटील आणि खासदार संजयकाका पाटील या दोन्ही नेत्यांनी वर्चस्वाच्या अट्टाहासाऐवजी विकास कामांचा अट्टाहास धरावा, अशीच जनतेची अपेक्षा आहे.तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यावेळी गावपातळीवर गाजण्याऐवजी तालुका पातळीवरच जास्त चर्चेत आल्या. भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या, तालुक्यावर वर्चस्व मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. सरपंच निवडीनंतरही वर्चस्ववादाचे राजकारण रंगतच राहिले. वर्चस्वाच्या अट्टाहासापोटी निवडून आलेल्या कारभाऱ्यांना आपल्याच पक्षाच्या व्यासपीठावर आणण्यासाठीही दोन्ही नेत्यांकडून जोराचे प्रयत्न झाले. अगदी सरपंचांना घेऊन फोटोसेशन आणि नंतर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पुन्हा वर्चस्वाची डरकाळी फोडण्यात आली. मात्र हे करताना विजयी उमेदवारांची अपेक्षा, उमेदवारांना विजयी करणाऱ्या जनतेच्या अपेक्षांची कोठेच दखल घेण्यात आली नाही. गावपातळीवर विजय मिळविलेल्या कारभाऱ्यांचे पुढील पाच वर्षातील विकासाचे व्हिजन काय आहे, याची साधी चर्चाही कोठे झाली नाही. हा याचा अन् तो त्याचा, एवढीच चर्चा झाली.यावेळच्या निवडणुकीत वर्चस्व कोणाचेही असले तरी, तब्बल १६ गावांतील विद्यमान कारभाऱ्यांना जनतेने नाकारले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीसह भाजपच्याही ग्रामपंचायतींचा समावेश होता. जनतेला एकाच नेत्याचे वर्चस्व हवे असते, तर दोन्ही नेत्यांसाठी बालेकिल्ला असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले नसते. जनतेला विकास हवा आहे. नव्या सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आव्हान आहे. तालुक्यातच आमदार आणि तालुक्यातीलच खासदार असल्यामुळे दोन्ही नेत्यांकडून विकासासाठी मोठा निधी येईल, अशी जनतेला अपेक्षा आहे. दोन्ही नेत्यांनी विकासासाठी ईर्षा करावी. खासदार आणि आमदारांनी गटबाजीचा अट्टाहास करण्याऐवजी विकासाचा अट्टाहास करावा, एवढी साधी अपेक्षा जनतेची आहे. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेते आग्रह धरणार, की गटबाजीचे राजकारण करीत राहणार, हे काळच ठरवले.आम्हीच का निष्ठा ठेवायची?तालुक्यात सध्या भाजप आणि राष्ट्रवादीत जोराचा संघर्ष सुरु आहे. दोन्ही गटात अभेद्य भिंंत तयार झाली आहे. मात्र दोन्हीकडे समान अंतर ठेवून राहणाराही एक गट आहे. अशा भिंंतीवर असणाऱ्या कारभाऱ्यांना खेचण्यासाठी दबाव येत आहे. तरीदेखील दोन्ही नेत्यांनी दावा केलेल्या बहुतांश गावांतील सदस्यांनी नरोवा कुंजरोवाची भूमिका घेतली. काही वर्षापूर्वी आबा आणि काका एक झाले होते. आम्ही एकाच नेत्याच्या मागे का राहायचे? असा प्रश्नच काही सरपंचांनी उपस्थित केला. विकासासाठी आम्हाला दोन्ही नेते हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.जनता वेठीस कशासाठी? लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेने संजयकाका पाटील यांना उच्चांकी मतदान केले होते. विधानसभा निवडणुकीत आर. आर. पाटील यांनाही जनतेने उच्चांकी मतदान दिले होते. दोन्ही नेत्यांना उच्चांकी मताने विजयी करणारी जनता एकच आहे. जनतेची ही भावना नेत्यांना केव्हा समजणार? की स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरत राहणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.