शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

‘त्या’ मका बियाणांची उगवणच नाही

By admin | Updated: July 30, 2015 00:29 IST

शेतकऱ्यांच्या तक्रारी : कृषी विभागाकडून कालबाह्य बियाणांचे वाटप

तासगाव : तासगाव तालुक्यात राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून महिन्याभरापूर्वी खरीप हंगामासाठी मका बियाणांचे वाटप करण्यात आले होते; मात्र हे मका बियाणे कालबाह्य झाल्याचे नंतर उघडकीस आले होते. या बियाणांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला असून, अनेक ठिकाणी या बियाणांची उगवण झाली नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी तक्रार केली असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.तासगाव तालुक्यात कृषी विभागाकडून कालबाह्य झालेल्या मका बियाणांचे वाटप करण्यात आले होते. परंतु नंतर हे बियाणे कालबाह्य असल्याचे निष्पन्न झाले. हे बियाणे कृषी विभागाकडून परतही घेण्यात आले नाही. काही निर्णय होईपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी याच बियाणांची पेरणीही केली होती; मात्र पेरणी केलेल्या क्षेत्रात बियाणांची उगवणच झाली नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. कालबाह्य बियाणांचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसला आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रात काही प्रमाणात उगवण झालेली दिसून येतआहे. पण लागवडीचा खर्च निघणेही शक्य नाही. त्यामुळे हंगाम असेपर्यंतच तातडीने दुबार पेरणी करण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहिलेला नाही. कृषी विभागाच्या गलथान कारभारामुळेच शेतीचे नुकसान झाले असून, हे नुकसान भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)‘लोकमत’चे वृत्तराज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर महाबीजच्या ‘कुबेर’ या जातीच्या मका बियाणांचे वाटप मागील वर्षीच्या खरीप हंगामात करण्यात आले होते. तासगाव तालुक्याला दहा टन बियाणे वाटपासाठी देण्यात आले होते. त्यावेळी बहुतांश बियाणे शिल्लक राहिले होते. या खरीप हंगामात तालुका कृषी विभागाने शिल्लक असलेले बियाणे शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वाटपही सुरू केले, मात्र हे बियाणे मुदत कालबाह्य झालेले होते. याबाबत ‘लोकमत’मधून बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी तासगावसह जिल्ह्यातील सर्व मका बियाणांचे वाटप थांबवण्याचे आदेश दिले होते. बातमीची दखल घेत महाबीजने हे बियाणे ताब्यात घेतले होते.महाबीजच्या ‘कुबेर’ जातीच्या बियाणांची ७ जुलैला एक एकर क्षेत्रावर पेरणी केली होती. त्यानंतर आतापर्यंत पाणी पाजून, खतेही घातली आहेत. मात्र शेतात विरळ प्रमाणातच उगवण झाली आहे. त्यामुळे हे पीक असेच ठेवून परवडणारे नाही. दुबार पेरणी करावी लागणार आहे. कृषी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे मोठे आर्थिक़ नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई मिळावी, यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दिलेली आहे.- अमोल पाटील, बस्तवडे, (ता. तासगाव)