शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

बोर्डाची नव्हे, ही तर कोरोनाचीच परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST

सांगली : राज्यभरात कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झालेला असताना शासनाने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर ...

सांगली : राज्यभरात कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झालेला असताना शासनाने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर पालकांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. गेले वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासाातून गुण‌त्तेसाठी संघर्ष करावा लागला, आता ऑफलाईन परीक्षेच्या निमित्ताने पालकांपुढे धर्मसंकट उभे असल्याचे प्रतिक्रियांमधून जाणवले.

शिक्षणमंत्र्यांनी सोमवारी ऑफलाईन परीक्षेचा निर्णय जाहीर केला. दहावीच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत, तर बारावीच्या लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत प्रत्यक्ष केंद्रावर होणार आहेत. राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक शहरांत अंशत: संचारबंदीही जाहीर झाली आहे. या स्थितीत परीक्षेसाठी मुलांना शाळेत पाठविण्याविषयी पालकांत दुमत आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सध्या अत्यल्प आहे. दररोजचे नव्याने बाधितही १० ते ३० दरम्यान आहेत, पण शेजरच्या सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात उद्रेक होऊ लागला आहे. तेथून रुग्ण सांगलीकडे पसरायला वेळ लागणार नाही. परीक्षा प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत जिल्ह्यातही संख्या वाढू शकते, त्यामुळे पालक चिंतेत आहेत.

कोट

प्रत्यक्ष केंद्रावर कोरोनाची पुरेशी काळजी घेऊन परीक्षा घ्यायला हरकत नाही, पण काळजी घेताना प्रामाणिकपणा राहिला पाहिजे. मास्क, सॅनिटायझर देखाव्यापुरते नकोत. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रसंगी शाळेने मास्क द्यायला हवा. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचेही शंभर टक्के निर्जंतुकीकरण झाले पाहिजे. सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाची कोरोना चाचणी झाली पाहिजे.

- संजय रुपलग, पालक

कोट

शिक्षणमंत्र्यांनी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी राज्यात सर्वत्र सुरक्षित वातावरण नाही. काही भागांत रुग्णसंख्या जाेमाने वाढतेय, तर काही ठिकाणी नियंत्रणात आहेत. प्रत्यक्ष परीक्षेचे दिवस येईपर्यंत कशी स्थिती राहील यावर परीक्षेची अंमलबजावणी ठरवावी. कोणाच्या तरी दबावाखाली विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचवू नये.

- अनिता कदम, पालक

कोट

प्रत्यक्ष परीक्षेचा हट्ट शासनाने धरू नये. ऑनलाईन परीक्षा हादेखील उपाय आहे. पदवीसह अन्य परीक्षा ऑनलाईन स्वरूपातच झाल्या, त्यामुळे बारावीच्याही तशाच घेणे शक्य आहे.

- अविनाश शेटे, पालक

कोट

पुणे, मुंबई व विदर्भात रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात सर्वत्र एकाचवेळी परीक्षा शक्य नाहीत. त्यामुळे त्या पुढे ढकलाव्यात. ऑनलाईनमुळे दहावी-बारावीचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे अपूर्ण अभ्यासावर परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अन्याय करणारे ठरेल. स्थिती नियंत्रणात येईपर्यंत कोणत्याच माध्यमातून परीक्षा घेऊ नयेत.

- अमर भानुसे, पालक

कोट

यंदा वर्षभर नियमित शाळा न झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झालेले नाही. याचा विचार करता एप्रिल-मे महिन्यातील परीक्षा पुढे ढकलाव्यात. ऑनलाईन अभ्यास पुढे सुरू ठेवृून राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करावा, तोपर्यंत कोरोनाची साथ कमी झाल्यास परीक्षा घ्याव्यात. तूर्त ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही मार्ग मागे घ्यावेत.

- त्रिशला वायचळ, पालक

कोट

गेल्या काही दिवसांत प्रत्यक्ष वर्ग भरू लागले आहेत, पण विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचे चित्र नाही. त्यामुळे वर्गात परीक्षा घ्याव्यात. कोरोनाची अत्यंत कडक काळजी घेण्याची जबाबदारी शाळा व बोर्डाने घ्यावी. परीक्षा झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शैक्षणिक नुकसान होईल.

- राजेंद्र खराडे, पालक

पॉईंटर्स

- दहावीचे परीक्षार्थी - ४०,८४४

- बारावीचे परीक्षार्थी - ३३,०९०