शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

बोर्डाची नव्हे, ही तर कोरोनाचीच परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST

सांगली : राज्यभरात कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झालेला असताना शासनाने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर ...

सांगली : राज्यभरात कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झालेला असताना शासनाने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर पालकांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. गेले वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासाातून गुण‌त्तेसाठी संघर्ष करावा लागला, आता ऑफलाईन परीक्षेच्या निमित्ताने पालकांपुढे धर्मसंकट उभे असल्याचे प्रतिक्रियांमधून जाणवले.

शिक्षणमंत्र्यांनी सोमवारी ऑफलाईन परीक्षेचा निर्णय जाहीर केला. दहावीच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत, तर बारावीच्या लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत प्रत्यक्ष केंद्रावर होणार आहेत. राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक शहरांत अंशत: संचारबंदीही जाहीर झाली आहे. या स्थितीत परीक्षेसाठी मुलांना शाळेत पाठविण्याविषयी पालकांत दुमत आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सध्या अत्यल्प आहे. दररोजचे नव्याने बाधितही १० ते ३० दरम्यान आहेत, पण शेजरच्या सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात उद्रेक होऊ लागला आहे. तेथून रुग्ण सांगलीकडे पसरायला वेळ लागणार नाही. परीक्षा प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत जिल्ह्यातही संख्या वाढू शकते, त्यामुळे पालक चिंतेत आहेत.

कोट

प्रत्यक्ष केंद्रावर कोरोनाची पुरेशी काळजी घेऊन परीक्षा घ्यायला हरकत नाही, पण काळजी घेताना प्रामाणिकपणा राहिला पाहिजे. मास्क, सॅनिटायझर देखाव्यापुरते नकोत. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रसंगी शाळेने मास्क द्यायला हवा. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचेही शंभर टक्के निर्जंतुकीकरण झाले पाहिजे. सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाची कोरोना चाचणी झाली पाहिजे.

- संजय रुपलग, पालक

कोट

शिक्षणमंत्र्यांनी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी राज्यात सर्वत्र सुरक्षित वातावरण नाही. काही भागांत रुग्णसंख्या जाेमाने वाढतेय, तर काही ठिकाणी नियंत्रणात आहेत. प्रत्यक्ष परीक्षेचे दिवस येईपर्यंत कशी स्थिती राहील यावर परीक्षेची अंमलबजावणी ठरवावी. कोणाच्या तरी दबावाखाली विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचवू नये.

- अनिता कदम, पालक

कोट

प्रत्यक्ष परीक्षेचा हट्ट शासनाने धरू नये. ऑनलाईन परीक्षा हादेखील उपाय आहे. पदवीसह अन्य परीक्षा ऑनलाईन स्वरूपातच झाल्या, त्यामुळे बारावीच्याही तशाच घेणे शक्य आहे.

- अविनाश शेटे, पालक

कोट

पुणे, मुंबई व विदर्भात रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात सर्वत्र एकाचवेळी परीक्षा शक्य नाहीत. त्यामुळे त्या पुढे ढकलाव्यात. ऑनलाईनमुळे दहावी-बारावीचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे अपूर्ण अभ्यासावर परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अन्याय करणारे ठरेल. स्थिती नियंत्रणात येईपर्यंत कोणत्याच माध्यमातून परीक्षा घेऊ नयेत.

- अमर भानुसे, पालक

कोट

यंदा वर्षभर नियमित शाळा न झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झालेले नाही. याचा विचार करता एप्रिल-मे महिन्यातील परीक्षा पुढे ढकलाव्यात. ऑनलाईन अभ्यास पुढे सुरू ठेवृून राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करावा, तोपर्यंत कोरोनाची साथ कमी झाल्यास परीक्षा घ्याव्यात. तूर्त ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही मार्ग मागे घ्यावेत.

- त्रिशला वायचळ, पालक

कोट

गेल्या काही दिवसांत प्रत्यक्ष वर्ग भरू लागले आहेत, पण विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचे चित्र नाही. त्यामुळे वर्गात परीक्षा घ्याव्यात. कोरोनाची अत्यंत कडक काळजी घेण्याची जबाबदारी शाळा व बोर्डाने घ्यावी. परीक्षा झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शैक्षणिक नुकसान होईल.

- राजेंद्र खराडे, पालक

पॉईंटर्स

- दहावीचे परीक्षार्थी - ४०,८४४

- बारावीचे परीक्षार्थी - ३३,०९०