शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

सागरेश्वरच्या व्याघ्र प्रकल्पाचा प्रस्तावच नाही! एनटीआरसीचा मात्र हिरवा कंदील :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:23 IST

देवराष्ट : यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्या त वाघ सोडण्याचा अद्याप प्रस्तावच नसल्याची माहिती सागरेश्वरचे वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी दिली. मात्र अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याचा दावा दिल्ली येथील एनटीआरसी या संस्थेच्या सदस्यांनी केला असून, या प्रकल्पासाठी कोट्यवधीचा निधी लागणार आहे. येत्या काही महिन्यांत प्रस्ताव दाखल ...

ठळक मुद्देवाघ सोडण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागणार

देवराष्ट : यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात वाघ सोडण्याचा अद्याप प्रस्तावच नसल्याची माहिती सागरेश्वरचे वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी दिली. मात्र अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याचा दावा दिल्ली येथील एनटीआरसी या संस्थेच्या सदस्यांनी केला असून, या प्रकल्पासाठी कोट्यवधीचा निधी लागणार आहे. येत्या काही महिन्यांत प्रस्ताव दाखल झाल्यास प्रत्यक्ष अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे.

सागरेश्वर व्याघ्र प्रकल्पाचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर विचाराधीन आहे. मात्र अजून प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. नॅशनल टायगर रिझर्व्ह कॉर्पोरेशनचे डॉ. विजयकुमार यांनी सागरेश्वर अभयारण्यास भेट देऊन व प्रत्यक्ष अभयारण्याच्या भौगोलिक परिस्थितीची पाहणी करून, येथील वातावरण वाघांसाठी पोषक असल्याचा दावा केला आहे. तसेच येथे वाघांना मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.

त्यानुसार वरिष्ठ पातळीवर अभयारण्यात वाघ सोडण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत लवकरच अधिकाऱ्यांचे एक पथक ताडोबा येथील व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन तेथील भौगोलिक व नैसर्गिक वातावरणाचा अभ्यास करणार आहे. त्यानंतरच या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.याबाबत वनक्षेत्रपाल साळी म्हणाले की, सागरेश्वर अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी वातावरण व भौगोलिक परिस्थिती अनुकूल असली तरी, अभयारण्याला कुंपण घालणे गरजेचे आहे. सध्या ७ फूट उंचीचे कुंपण असून ते किमान १५ फूट उंचीचे करणे गरजेचे आहे. अजूनही अभयारण्याच्या काही भागामध्ये जागेच्या हद्दीवरून वाद असल्याने कुंपण घालण्याचे काम थांबलेले आहे. शिवाय कुंपणाशेजारील काही अंतरावरील झाडेही काढावी लागणार आहेत. कर्मचाºयांना प्रशिक्षणासह पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. यासाठी कोट्यवधीच्या निधीची गरज आहे. प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यास प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.प्रकल्पासाठी ३५ कोटींची गरजसागरेश्वर अभयारण्यात वाघ दाखल होण्यासाठी अभयारण्याला कुंपण घालणे, वाहनांची खरेदी करणे, कर्मचाºयांना प्रशिक्षण या व अन्य बाबींसाठी अंदाजे ३५ कोटी रुपयांची गरज आहे.किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागणारसागरेश्वर अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यापासून प्राथमिक बाबींची पूर्तता करण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग