शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

सागरेश्वरच्या व्याघ्र प्रकल्पाचा प्रस्तावच नाही! एनटीआरसीचा मात्र हिरवा कंदील :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:23 IST

देवराष्ट : यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्या त वाघ सोडण्याचा अद्याप प्रस्तावच नसल्याची माहिती सागरेश्वरचे वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी दिली. मात्र अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याचा दावा दिल्ली येथील एनटीआरसी या संस्थेच्या सदस्यांनी केला असून, या प्रकल्पासाठी कोट्यवधीचा निधी लागणार आहे. येत्या काही महिन्यांत प्रस्ताव दाखल ...

ठळक मुद्देवाघ सोडण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागणार

देवराष्ट : यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात वाघ सोडण्याचा अद्याप प्रस्तावच नसल्याची माहिती सागरेश्वरचे वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी दिली. मात्र अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याचा दावा दिल्ली येथील एनटीआरसी या संस्थेच्या सदस्यांनी केला असून, या प्रकल्पासाठी कोट्यवधीचा निधी लागणार आहे. येत्या काही महिन्यांत प्रस्ताव दाखल झाल्यास प्रत्यक्ष अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे.

सागरेश्वर व्याघ्र प्रकल्पाचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर विचाराधीन आहे. मात्र अजून प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. नॅशनल टायगर रिझर्व्ह कॉर्पोरेशनचे डॉ. विजयकुमार यांनी सागरेश्वर अभयारण्यास भेट देऊन व प्रत्यक्ष अभयारण्याच्या भौगोलिक परिस्थितीची पाहणी करून, येथील वातावरण वाघांसाठी पोषक असल्याचा दावा केला आहे. तसेच येथे वाघांना मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.

त्यानुसार वरिष्ठ पातळीवर अभयारण्यात वाघ सोडण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत लवकरच अधिकाऱ्यांचे एक पथक ताडोबा येथील व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन तेथील भौगोलिक व नैसर्गिक वातावरणाचा अभ्यास करणार आहे. त्यानंतरच या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.याबाबत वनक्षेत्रपाल साळी म्हणाले की, सागरेश्वर अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी वातावरण व भौगोलिक परिस्थिती अनुकूल असली तरी, अभयारण्याला कुंपण घालणे गरजेचे आहे. सध्या ७ फूट उंचीचे कुंपण असून ते किमान १५ फूट उंचीचे करणे गरजेचे आहे. अजूनही अभयारण्याच्या काही भागामध्ये जागेच्या हद्दीवरून वाद असल्याने कुंपण घालण्याचे काम थांबलेले आहे. शिवाय कुंपणाशेजारील काही अंतरावरील झाडेही काढावी लागणार आहेत. कर्मचाºयांना प्रशिक्षणासह पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. यासाठी कोट्यवधीच्या निधीची गरज आहे. प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यास प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.प्रकल्पासाठी ३५ कोटींची गरजसागरेश्वर अभयारण्यात वाघ दाखल होण्यासाठी अभयारण्याला कुंपण घालणे, वाहनांची खरेदी करणे, कर्मचाºयांना प्रशिक्षण या व अन्य बाबींसाठी अंदाजे ३५ कोटी रुपयांची गरज आहे.किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागणारसागरेश्वर अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यापासून प्राथमिक बाबींची पूर्तता करण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग