शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

शब्दात कितीही गोडवा असला तरी, त्यामागची भावना तितकीच महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:03 IST

सांगली : शब्दांना काही अर्थ असतो का? कारण शब्दकोशातही देण्यात आलेले शब्दांचे अर्थ खूपच सीमित स्वरूपाचे असतात, असे भाषाशास्त्राची ...

सांगली : शब्दांना काही अर्थ असतो का? कारण शब्दकोशातही देण्यात आलेले शब्दांचे अर्थ खूपच सीमित स्वरूपाचे असतात, असे भाषाशास्त्राची अभ्यासक म्हणून नेहमीच वाटते. त्यामुळे शब्द कितीही गोड असले तरी त्यामागची भावना तितकीच महत्त्वाची असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.भवाळकर म्हणाल्या, भाषेतील गोडवा व भावनेतील गोडवा महत्त्वाचा ठरत असतो. कारण केवळ शब्दांना अर्थ कधीच नसतो, तर तो तुम्ही उच्चारता कसे हे महत्त्वाचे असते. शब्दकोशातही त्याचे अर्थ खूपच सीमित स्वरूपात असल्याचे एक भाषाशास्त्राची अभ्यासक म्हणून नेहमीच वाटते.भाषेतील गोडवाच अनुभवायचा झाल्यास शब्दातील उच्चारावरही लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. भाषेतील हेलकावे, आरोह, अवरोह, स्वराघात, बलाघात म्हणजेच कोणत्या शब्दावर तुम्ही जोर देऊन बोलता, यावरही ते अवलंबून असते. उदाहरणच द्यायचे झाले तर शब्दकोशात शहाणा या शब्दाचा वाईट अर्थ आहे, असे कुणी म्हणेल का? पण एखादा जरा जास्तच बोलायला लागला, तर दुसरा लगेच त्याला फार शहाणे आहात, असे म्हणतो.म्हणजेच त्याला मूर्खच म्हणायचे असते. त्यामुळे शब्द जरी सकारात्मक वापरला तरी, त्याचे उच्चारणे खूप काही सांगून जाते. खेकसून बोलणे, हळुवार, सावकाश, टोमणे मारत बोलणे यातून हेच दिसून येते. आवाजात जरी कितीही मृदुपणा असला तरी, शब्दातील लागटपणा लगेच समोरच्या व्यक्तीला कळतो. त्यामुळे भाषेचे, शब्दांचे प्रक्षेपण व त्याच्या संदर्भातून तुम्ही किती गोड, सकारात्मक बोलता, हे दिसून येते.माणसे जोडण्याची, हृदये जोडण्याची प्रक्रिया ही चांगल्यारितीने होण्यासाठी आपले गोड शब्दच कारणीभूत ठरतात. आवाजातील पट्टी महत्त्वाची असते. अनेकजण साधे बोलले तरी खेकसत असल्यासारखे बोलतात.आपण किती माणसांशी संवाद साधतो व त्यावेळी आपले शब्द किती प्रभावी आहेत, यावरही लक्ष दिले गेले पाहिजे. दोन माणसांच्या समोर असणाऱ्या आवाजाची पट्टी व एखाद्या सभेतील पट्टी यात बदल हवाच व शब्दातील बदलही तितकाच प्रभावी असेल, तरच गोडी निर्माण होते.