शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शब्दात कितीही गोडवा असला तरी, त्यामागची भावना तितकीच महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:03 IST

सांगली : शब्दांना काही अर्थ असतो का? कारण शब्दकोशातही देण्यात आलेले शब्दांचे अर्थ खूपच सीमित स्वरूपाचे असतात, असे भाषाशास्त्राची ...

सांगली : शब्दांना काही अर्थ असतो का? कारण शब्दकोशातही देण्यात आलेले शब्दांचे अर्थ खूपच सीमित स्वरूपाचे असतात, असे भाषाशास्त्राची अभ्यासक म्हणून नेहमीच वाटते. त्यामुळे शब्द कितीही गोड असले तरी त्यामागची भावना तितकीच महत्त्वाची असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.भवाळकर म्हणाल्या, भाषेतील गोडवा व भावनेतील गोडवा महत्त्वाचा ठरत असतो. कारण केवळ शब्दांना अर्थ कधीच नसतो, तर तो तुम्ही उच्चारता कसे हे महत्त्वाचे असते. शब्दकोशातही त्याचे अर्थ खूपच सीमित स्वरूपात असल्याचे एक भाषाशास्त्राची अभ्यासक म्हणून नेहमीच वाटते.भाषेतील गोडवाच अनुभवायचा झाल्यास शब्दातील उच्चारावरही लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. भाषेतील हेलकावे, आरोह, अवरोह, स्वराघात, बलाघात म्हणजेच कोणत्या शब्दावर तुम्ही जोर देऊन बोलता, यावरही ते अवलंबून असते. उदाहरणच द्यायचे झाले तर शब्दकोशात शहाणा या शब्दाचा वाईट अर्थ आहे, असे कुणी म्हणेल का? पण एखादा जरा जास्तच बोलायला लागला, तर दुसरा लगेच त्याला फार शहाणे आहात, असे म्हणतो.म्हणजेच त्याला मूर्खच म्हणायचे असते. त्यामुळे शब्द जरी सकारात्मक वापरला तरी, त्याचे उच्चारणे खूप काही सांगून जाते. खेकसून बोलणे, हळुवार, सावकाश, टोमणे मारत बोलणे यातून हेच दिसून येते. आवाजात जरी कितीही मृदुपणा असला तरी, शब्दातील लागटपणा लगेच समोरच्या व्यक्तीला कळतो. त्यामुळे भाषेचे, शब्दांचे प्रक्षेपण व त्याच्या संदर्भातून तुम्ही किती गोड, सकारात्मक बोलता, हे दिसून येते.माणसे जोडण्याची, हृदये जोडण्याची प्रक्रिया ही चांगल्यारितीने होण्यासाठी आपले गोड शब्दच कारणीभूत ठरतात. आवाजातील पट्टी महत्त्वाची असते. अनेकजण साधे बोलले तरी खेकसत असल्यासारखे बोलतात.आपण किती माणसांशी संवाद साधतो व त्यावेळी आपले शब्द किती प्रभावी आहेत, यावरही लक्ष दिले गेले पाहिजे. दोन माणसांच्या समोर असणाऱ्या आवाजाची पट्टी व एखाद्या सभेतील पट्टी यात बदल हवाच व शब्दातील बदलही तितकाच प्रभावी असेल, तरच गोडी निर्माण होते.