शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

दिलासा नाहीच...जिल्ह्यातील निर्बंध आठवडाभरासाठी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ व पॉझिटिव्हिटी रेटही दहा टक्क्यांवर असल्याने या आठवड्यातही निर्बंध कायम राहणार आहेत. अत्यावश्यक ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ व पॉझिटिव्हिटी रेटही दहा टक्क्यांवर असल्याने या आठवड्यातही निर्बंध कायम राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंदच राहणार असून, १९ जुलैपर्यंत निर्बंध कायम राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. दरम्यान, निर्बंध कायम राहिल्याने व्यापारी पेठा सोमवारपासून खुल्या होतील, या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे.

दि. ३ जून रोजी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटनुसार जिल्हा प्रशासनानेच पाच स्तरातील निर्बंध लागू करावयाचे आहेत. या नियमावलीत शासनाने बदल करत आरटीपीसीआर चाचण्यांनुसार पॉझिटिव्हिटी रेट नोंद करण्याचे निर्देश दिले होते. गेल्या आठवड्यापासून केवळ आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण व रुग्णांचे प्रमाण यावर पॉझिटिव्हिटी रेट ठरत आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यातही जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांवर होता तर या आठवड्यातही दहा टक्क्यांपेक्षा जास्त व २० टक्क्यांपेक्षा कमी राहिल्याने तेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या आठवड्यातही चौथ्या स्तरातील निर्बंध कायम राहणार आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सरासरी नऊशेवर कायम राहत असल्याने निर्बंध वाढण्याचेच संकेत होते. त्यानुसार रविवारी सायंकाळी प्रशासनाने आदेश जारी करत आठवडाभर मुदतवाढ दिली आहे.

राज्यात एकीकडे कोरोनाला उतार लागला असताना जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कायम असल्यानेच प्रशासनाने निर्बंध कायम ठेवत केवळ अत्यावश्यक सेवांना दुपारी चारपर्यंत परवानगी दिली आहे तर इतर सर्व दुकाने व सेवा बंद राहणार आहेत.

कोरोना रुग्णसंख्या कायम असतानाच व्यापाऱ्यांकडून दुकाने उघडण्याची मागणी होत होती. विविध व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत दुकाने उघडण्यास परवानग देण्याची मागणीही केली होती. त्यामुळे सोमवारपासून सर्व व्यवहारांना दुपारी चारपर्यंत परवानगी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, निर्बंध कायम राहिल्याने सर्व व्यवहार सुरु होण्याची शक्यता आता मावळली आहे.

कोट

जिल्ह्यात अद्यापही कोरोना रुग्णसंख्या कायम आहे. शिवाय पॉझिटिव्हिटी रेटही दहा टक्क्यांवर असल्याने चौथ्या स्तरातील निर्बंध आठवडाभरासाठी १९ जुलैपर्यंत लागू असणार आहेत.

- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी