शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

महापालिकेच्या सात कोटींच्या निधीला ‘साडेसाती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST

सांगली : दैव देते आणि कर्म नेते, ही म्हण महापालिकेच्या गाडा हाकणाऱ्या कारभाऱ्यांना तंतोतत लागू होते. जिल्हा नियोजन समितीतून ...

सांगली : दैव देते आणि कर्म नेते, ही म्हण महापालिकेच्या गाडा हाकणाऱ्या कारभाऱ्यांना तंतोतत लागू होते. जिल्हा नियोजन समितीतून सात कोटींचा निधी मंजूर होऊन सहा महिन्यांचा काळ लोटला; पण या निधीतून कोणती कामे करण्याची यावर अजून खलबते सुरू आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात फारसा निधी विकासकामावर खर्च झालेला नाही. आयता निधी मिळाला असतानाही राजकीय कुरघोड्यांत त्याचा खेळखंडोबा सुरू आहे. या निधीला लागलेली साडेसाती कधी सुटणार? असा प्रश्न पडला आहे.

दोन वर्षांपासून महापूर व कोरोनाशी लढा सुरू आहे. आधी महापुरामुळे २०१९ चे वर्ष वाया गेले. त्यातून सावरत असताना कोरोनाचे संकट महापालिकेच्या दारावर येऊन ठेपले. वर्षभरापासून तर कोरोना उपाययोजनावर निधी खर्च केला जात आहे. आरोग्य विभागाव्यतिरिक्त इतर कामांना फारसा निधी मिळालेला नाही. त्यामुळे वाॅर्डातील किरकोळ गटारी, रस्ते, पाइपलाइनची कामे रखडली आहेत. यंदाच्या ७५० कोटींचे बजेट सादर झाले; पण ते मंजूर होण्यापूर्वी कोरोनाची दुसरी लाट आली. अजून महापालिकेचे बजेट अंतिम झालेले नाही. अशा संकटाच्या काळात जिल्हा नियोजन समिती धावून आली. नियोजन समितीने सात कोटींचा निधी मंजूर केला.

हा निधी महापालिकेकडे वर्गही झाला. त्यातून भाजपच्या सत्ताकाळात ६८ कामे प्रस्तावित करण्यात आली; पण महिनाभरात महापालिकेत सत्तापालट झाल्याने या कामांना आडकाठी आणली गेली. राजकीय वरदहस्ताचा वापर करून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेला ठराव पुन्हा महापालिकेकडे आणण्यात आला. आता नूतन महापौरांनी या ठरावातील १८ कामे वगळून मर्जीतील नगरसेवकांची कामे समाविष्ट केली आहेत. त्यामुळे निधीचा वाद पेटला आहे. एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यातच सहा महिन्यांचा कालावधी लोटला. आता पावसाळा सुरू झाल्याने ही कामे मंजूर झाली तरी वेळेत पूर्ण होणार नाही. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत तरी कामे पूर्ण होतील की नाही, याविषयी संभ्रम आहे. एकूणच सात कोटींच्या निधीला राजकीय साडेसाती लागली असून, ती कधी सुटणार? असा प्रश्न सर्वसामान्य नगरसेवकांना पडला आहे.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार

महासभेने सात कोटींच्या निधीतून ६८ कामे प्रस्तावित केली. तसा ठराव मंजूर करून तो ३१ मार्चपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही पाठविण्यात आला; पण सत्ताबदल होताच राजकीय दबाव टाकून या ठरावातील कामे बदलण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर ठरावातील कामांचे प्राधान्यक्रम ठरविण्याची सूचना केली होती; पण सत्ताधारी राष्ट्रवादीने त्यातील कामेच वगळून दुसऱ्या कामांचा समावेश केला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे काही नगरसेवक तक्रार करणार आहेत.