शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

निशिकांत पाटील, वैभव शिंदे भाजपवासी!

By admin | Updated: May 22, 2017 23:21 IST

निशिकांत पाटील, वैभव शिंदे भाजपवासी!

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : माजी आमदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. हा प्रवेश सोमवार, दि. २९ मे रोजी इस्लामपूर येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी स्वत:च्या भाजप प्रवेशाचा इन्कार केला आहे.बागणी (ता. वाळवा) जिल्हा परिषद मतदार संघातून सागर खोत यांनी रयत विकास आघाडीतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये घराणेशाहीच्या मुद्द्यावरून वादाला तोंड फुटले. तेथून वैभव शिंदे यांनीही राष्ट्रवादीकडून लढत दिली होती. मात्र बंडखोर संभाजी कचरे यांच्याकडून खोत आणि शिंदे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे नेते, आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांनी कचरे यांना बळ दिल्याचा आरोप शिंदे समर्थकांकडून होत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याचवेळी वैभव शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. परंतु त्यासाठी मुहूर्त सापडत नव्हता. त्यावेळी शिंदे, सदाभाऊ खोत, वैभव शिंदे, निशिकांत पाटील यांनी आष्टा येथे बैठक घेऊन भाजप प्रवेशाबाबत चर्चा केल्याचे सांगितले जाते. तेव्हा ‘लोकमत’ने ‘तुम्ही पुढे व्हा, आम्ही पाठीमागून येतो’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. सदाभाऊ खोत आणि विलासराव शिंदे यांनी केलेल्या त्या वक्तव्यांना आता दुजोरा मिळत आहे. २९ मे रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस इस्लामपुरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत यल्लमा चौकात शेतकरी मेळावा आणि जाहीर सभा होणार आहे. या सभेत नगराध्यक्ष पाटील व वैभव शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, अशी माहिती मिळाली.खासदार शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात पडलेल्या दरीमुळे खोत यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी नगराध्यक्ष पाटील यांच्या मदतीने स्वत:चा गट मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही कट्टर कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीविरोधातील काही गट नाराज झाले आहेत.राष्ट्रवादीच्या विरोधात मोट बांधण्यासाठी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनीही प्रयत्न केले. नगरपालिकेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढविण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. परंतु खासदार राजू शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक यांच्या आग्रहास्तव विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली गेली. त्यातून निशिकांत पाटील यांनाही आघाडीकडे वळवण्यात यश आले. त्यानंतर पालिकेवर आघाडीचा झेंडा फडकला. नगरपालिका, जिल्हा परिषदेतील या ‘फॉर्म्युल्या’च्या यशानंतर भाजपवाल्यांनी अनेकांना प्रवेशासाठी गळ घातला आहे. आघाडीच्या यशानंतर : प्रवेशाला बळजिल्हा परिषद निवडणुकीतही रयत विकास आघाडीला यश मिळाले. तेव्हापासून सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील, वैभव शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. आता मुख्यमंत्र्यांच्या दौरा २९ मेरोजी निश्चित झाला असून, त्यावेळी निशिकांत पाटील व शिंदे यांचा भाजपप्रवेश होणार आहे.