शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १७ गावांना निर्मलग्राम पुरस्कार

By admin | Updated: December 11, 2014 23:50 IST

सांगली दुसरा : जतची आठ गावे

सांगली : केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छ भारत अभियान मोहिमेअंतर्गत निर्मलग्राम योजनेचा २०१३-१४ चा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्यातील ५८७ गावांना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील १७ गावांचा समावेश आहे. यंदा ११९ गावे निर्मलसाठी पात्र ठरली होती. परंतु त्यातील केवळ १७ गावांनाच निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाला. पुणे विभागात सांगलीचा दुसरा क्रमांक आला आहे. केंद्र शासनाने शंभर टक्के शौचालय मुक्तीसाठी निर्मलग्राम योजनेतर्गंत ७०४ गावांपैकी ४७५ गावे निर्मल झाली आहेत, तर अद्याप २२९ गावे निर्मल होण्यापासून दूर आहेत. मागील पाच वर्षात जिल्ह्यातील २४ गावे निर्मल झाली होती. परंतु त्यानंतर प्रशासन आणि गावकऱ्यांच्या दुर्लक्षामुळे यामध्ये थोडी ढिलाई आल्याचे चित्र होते. २०१३-१४ या वर्षात ११९ गावे निर्मलग्राम योजनेसाठी पात्र ठरली होती. सहा महिन्यांपूर्वी शासनाने नेमलेल्या समितीकडून गावांची पाहणी झाली होती. आज याचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सर्वाधिक आठ गावे समाविष्ट आहेत. यामध्ये बोर्गी बु., अंतराळ, जालिहाळ खुर्द, करेवाडी, कुलाळवाडी, शेड्याळ, मिरवाड आणि वाशाणचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील चिंचाळे, खानापूरमधील बामणी, भेंडवडे, पारे, मिरजेतील बामणोळी, शिराळ्यातील चरण, तासगावातील डोंगरसोनी, मतकुणकी, शिरगाव या गावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)