शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १७ गावांना निर्मलग्राम पुरस्कार

By admin | Updated: December 11, 2014 23:50 IST

सांगली दुसरा : जतची आठ गावे

सांगली : केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छ भारत अभियान मोहिमेअंतर्गत निर्मलग्राम योजनेचा २०१३-१४ चा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्यातील ५८७ गावांना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील १७ गावांचा समावेश आहे. यंदा ११९ गावे निर्मलसाठी पात्र ठरली होती. परंतु त्यातील केवळ १७ गावांनाच निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाला. पुणे विभागात सांगलीचा दुसरा क्रमांक आला आहे. केंद्र शासनाने शंभर टक्के शौचालय मुक्तीसाठी निर्मलग्राम योजनेतर्गंत ७०४ गावांपैकी ४७५ गावे निर्मल झाली आहेत, तर अद्याप २२९ गावे निर्मल होण्यापासून दूर आहेत. मागील पाच वर्षात जिल्ह्यातील २४ गावे निर्मल झाली होती. परंतु त्यानंतर प्रशासन आणि गावकऱ्यांच्या दुर्लक्षामुळे यामध्ये थोडी ढिलाई आल्याचे चित्र होते. २०१३-१४ या वर्षात ११९ गावे निर्मलग्राम योजनेसाठी पात्र ठरली होती. सहा महिन्यांपूर्वी शासनाने नेमलेल्या समितीकडून गावांची पाहणी झाली होती. आज याचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सर्वाधिक आठ गावे समाविष्ट आहेत. यामध्ये बोर्गी बु., अंतराळ, जालिहाळ खुर्द, करेवाडी, कुलाळवाडी, शेड्याळ, मिरवाड आणि वाशाणचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील चिंचाळे, खानापूरमधील बामणी, भेंडवडे, पारे, मिरजेतील बामणोळी, शिराळ्यातील चरण, तासगावातील डोंगरसोनी, मतकुणकी, शिरगाव या गावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)