शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

‘निर्भया रॅली’ने सांगलीच्या सन्मानात भर!

By admin | Updated: October 15, 2016 23:26 IST

सदाभाऊ खोत : सायकल रॅलीस प्रारंभ; जिल्ह्यात सहाशे किलोमीटर करणार प्रवास

सांगली : जिल्हा पोलिस दलाने आयोजित केलेल्या ‘निर्भया सायकल रॅली’च्या माध्यमातून महिलांचा सन्मान, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संतुलन आणि शारीरिक व्यायाम अशी चतुसूत्री साध्य होणार आहे. या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे काम होत असल्याने सांगलीच्या सन्मानात भर पडणार आहे, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय एकात्मता, महिला सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी १५ आॅक्टोबर ते २१ आॅक्टोबरदरम्यान ६०२ किलोमीटर अंतराच्या ‘निर्भया सायकल रॅली’चे आयोजन केले आहे. येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या आवारात शनिवारी सकाळी खोत यांच्याहस्ते रॅलीचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, महापौर हारुण शिकलगार, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी), सुहास पाटील उपस्थित होेते. खोत म्हणाले, पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे काम होत असल्याने सांगलीच्या सन्मानात भर पडणार आहे. महिलांचा सन्मान आणि सायकलच्या माध्यमातून प्रदूषण वाढणार नाही, हे हेतू साध्य होतील. तळागाळातील माणसाला पोलिस दल आपल्या सोबत आहे, हा विश्वास निर्माण होईल. पोलिस दलाचीही प्रतिमा उंचावणार आहे. सामान्य माणसाला निर्भयपणे जगता येईल, असा संदेश दिला आहे. पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दलाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या कल्पनेतून सांगली जिल्ह्यात महिला सुरक्षेसाठी निर्भया पथके तैनात केली आहेत. महिलांना सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याबरोबरच त्यांना तसे वातावरण आहे, याची खात्री देणे महत्त्वाचे आहे. २१ आॅक्टोबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ही रॅली फिरणार आहे. यामध्ये ६९१ जणांनी सहभाग नोंदविला आहे. सायकल रॅलीत माधवनगर (ता. मिरज) येथील गोविंद परांजपे, सांगलीवाडीचे दत्ता पाटील या ज्येष्ठ सायकलपटूंसह अबालवृद्ध सहभागी झाले आहेत. १७ शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी व जनतेला रॅलीचे महत्त्व सांगितले जाणार आहे. रॅलीच्या रस्त्यावरील सर्व ग्रामपंचायती, सरपंच, शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनाही या रॅलीमध्ये सहभागी केले आहे. (प्रतिनिधी) असा असणार सायकल रॅलीचा प्रवास शनिवारी मिरज, कवठेमहांकाळ, जत मार्गे गुड्डापूर हे ११७ किलोमीटर अंतर पार करून गुड्डापूर येथे मुक्काम. रविवारी १६ आॅक्टोबरला गुड्डापूरहून उमदी, जत येथून आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) मुक्काम करुन १२५ किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. १७ आॅक्टोबरला आरेवाडीतून आटपाडी, विटा तासगाव हे १३२ किलोमीटर अंतर पार करणार आहे. तासगाव येथे मुक्काम आहे. १८ आॅक्टोबरला तासगावहून पलूस, सागरेश्वर, देवराष्ट्रे, इस्लामपूरहून शिराळ्याला मुक्काम करणार आहे. हे अंतर ८४ किलोमीटर आहे. १९ आॅक्टोबरला शिराळ्याहून कोकरुड, सोनवडेतून चांदोली येथे मुक्काम आहे. हे अंतर ४० किलोमीटर आहे. २० आॅक्टोबरला चांदोली फॉरेस्ट वाईल्ड लाईफ सॅनेटरी (नेचर ट्रॅक) करून चांदोलीतच मुक्काम आहे. २१ आॅक्टोबरला चांदोलीहून कोकरुड, आष्टा मार्गे १०४ किलोमीटर अंतर पार करून सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात सांगता होणार आहे.