शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

कोल्हापूर- सोलापूर , सातारा जिल्ह्यांपेक्षा सांगली जिल्ह्याची लोकसंख्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:23 IST

पुणे आणि मुंबई या दोन शहरात नोकरी व रोजगाराच्या निमित्ताने जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सातारा, सोलापूर व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांपेक्षा सांगली जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे.

ठळक मुद्देजागतिक लोकसंख्या दिन...! दशकांमधील लोकसंख्या वाढीचा दर नव्वद वर्षांतील नीचांकी दशक : कुटुंब नियोजनाचे वाढते प्रमाण, रोजगारासाठीच्या स्थलांतराचा परिणाम

अविनाश कोळी ।सांगली : रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांकडे जाणारे लोक व त्यांच्या कुटुंबांमुळे गेल्या ९० वर्षांत सर्वात कमी लोकसंख्या वाढ गत दशकात नोंदली गेली आहे. २००९ च्या तुलनेत २०११ च्या लोकसंख्या वाढीचा दर ७.७ टक्क्यांनी घटला आहे. लोकसंख्या वाढीच्या दराच्या प्रमाणात येथील घनताही वाढल्याचे दिसत आहे.

सांगली जिल्ह्याच्या दशकीय जनगणनेचा इतिहास पाहिला, तर १९०१ ते १९११ आणि १९११ ते १९२१ या काळात लोकसंख्येत घट झाली होती. त्यानंतर सातत्याने १४ ते २५ टक्क्यांपर्यंत लोकसंख्या वाढीचा दर राहिला. २००१ ते २०११ या दशकात केवळ ९.१८ टक्केच लोकसंख्या वाढ झाली. गेल्या ९० वर्षांतील ही सर्वात नीचांकी वाढ आहे. लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. ही बाब एका बाजूला समाधानकारक वाटत असली, तरी त्यात स्थलांतराचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. दोन किंवा एका मुलावर शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्याचे वाढत जाणारे प्रमाण जसे याला कारणीभूत आहे, त्याचपद्धतीने रोजगारासाठी मोठ्या शहराकडे धावणारे कुशल कामगार, सुशिक्षित तरुण व अन्य वर्ग यामुळेही वाढीच्या दरावर परिणाम दिसून येतो.

पुणे आणि मुंबई या दोन शहरात नोकरी व रोजगाराच्या निमित्ताने जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एखादी व्यक्ती तिथे स्थिरावली की, पूर्ण कुटुंब त्याबरोबर स्थलांतरित होत असते. रोजगाराच्या मर्यादा, बंद पडणारे उद्योग, घटणारा व्यापार यामुळे जिल्ह्याच्या अर्थचक्रावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आता जनगणनेच्या नोंदीत दिसून येत आहेत. लोकसंख्येबाबत सांगली जिल्हा राज्यात पंधराव्या क्रमांकावर आहे. सातारा, सोलापूर व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांपेक्षा सांगली जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे.लोकसंख्येतील स्त्री-पुरुष गुणोत्तराचे प्रमाण पाहिले, तर जिल्ह्याचे सध्याचे प्रमाण ९६४ इतके आहे. २००१ मध्ये ते ९५७ इतके होते. गुणोत्तर प्रमाणात जिल्हा राज्यात १० व्या क्रमांकावर असून, पुणे विभागात साताºयाखालोखाल सांगलीचा क्रमांक लागतो, मात्र बालकांमधील गुणोत्तर प्रमाणाबाबत सांगली जिल्हा अत्यंत वाईट स्थितीत आहे. बालकांमधील स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण ८६२ इतके कमी आहे.ग्रामीणचे : प्रमाण कमीजिल्ह्यात दशकातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण पाहिले, तर ग्रामीण लोकसंख्येची वाढ ७.८ असून, शहरी लोकसंख्या वाढ १३.६ इतकी आहे. शहरी लोकसंख्या सध्या २५.५ टक्के इतकी असून, ग्रामीण लोकसंख्या ७४.५ इतकी आहे.जत, मिरजेची वाढ अधिकतालुकानिहाय लोकसंख्या वाढीचा दर पाहिल्यास सर्वाधिक वाढीचे प्रमाण हे जतमध्ये १५.६ टक्के, इतके नोंदले गेले आहे. त्याखालोखाल मिरजेचे प्रमाण १३ टक्के इतके आहे. शिराळयातील प्रमाण सर्वात कमी म्हणजे २.९ टक्के आहे. 

टॅग्स :SangliसांगलीEconomyअर्थव्यवस्था