शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

निगडीच्या तरुणाचा तौक्ते वादळात सलग ११ तास समुद्रातून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : ताशी १८० किलोमीटरच्या वेगाने वाहणारा वारा, तुफानी पाऊस, सेकंदाला ३६ फूट ...

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : ताशी १८० किलोमीटरच्या वेगाने वाहणारा वारा, तुफानी पाऊस, सेकंदाला ३६ फूट उंच उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा, विजेचा प्रचंड कडकडाट व भयाण काळोख अशा प्रतिकूल परिस्थितीतही तब्बल अकरा तास समुद्रात पोहत ‘त्याने’ मृत्यूवर विजय मिळवला. निगडी (ता. शिराळा) येथील राहुल रामचंद्र साळुंखे (वय २२) हे त्या तरुणाचे नाव.

तौक्ते वादळामुळे समुद्रात बुडालेल्या ‘बार्स पी पी ३०० पास’ या मॅथ्यू असोसिएट्सच्या जहाजावर राहुलबरोबर २७३ जण कामाला आहेत. समुद्रातून कच्चे तेल काढण्यासाठी हे अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. दि. १२ व १३ मे रोजी हवामान खात्याच्या अंदाजानुसार ज्याठिकाणी जहाज उभे होते, तेथे धोका नव्हता. तरीही २०० मीटर आणखी हे जहाज मागे घेऊन आठ नांगर टाकून दि. १४ रोजी उभे केले होते. हे ठिकाण मुंबईपासून शंभर किलोमीटर समुद्रात ‘हिरा फिल्ड’ या पॉईंटवर होते. १६ मे रोजी रात्री दहानंतर अचानक चक्रीवादळाने विक्राळ रूप धारण केले. यावेळी सर्व आठही नांगर तुटले व जहाज भरकटले व प्लॅटफॉर्मला जाऊन धडकले.

यावेळी जहाजामध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा, भयानक पाऊस अशा परिस्थितीत मृत्यू समोर दिसत होता. लाईफ ड्रमही या भयानक वेगामुळे फुटू लागले. यावेळी नौदलाला याबाबत माहिती दिली. त्यांनी दोन तासात पोहोचतो, असे सांगितले. मात्र, या दरम्यान हवेच्या व लाटांच्या वेगामुळे जवळपास ६५ किलोमीटर जहाज भरकटले. त्यामुळे नौदलाच्या जवानांना हे ठिकाण शोधण्यास वेळ लागला. दुपारी साडेतीनच्या दरम्यान नौदलाचे जवान आले. मात्र, ते जहाजाजवळ येण्यास धोका होता. जीव वाचविण्यासाठी राहुलसह सर्वांनी समुद्रात उड्या मारल्या.

नाैदलाच्या जवानांनी जे-जे मिळतील, त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी राहुल व तासगाव येथील शेखर शेळके हे तब्बल अकरा तास पोहत राहिले. ‘एनडीए’च्या जवानांनी त्याला वाचवले. जवानांनी राहुल व सहकाऱ्यांना वाचवले व बाहेर आणले. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना काही दिवसाची सुट्टी दिली. राहुल सध्या निगडी येथे आला आहे. यावेळी त्याने ही घटना सांगितली.