शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
8
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
9
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
10
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
11
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
12
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
13
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
14
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
15
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
16
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
17
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
18
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
19
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
20
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

निकोप मानसिक आरोग्यासाठी विवेकी विचारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:20 IST

इस्लामपूर : मानसिक आजारामुळे शारीरिक कार्यक्षमतेवर प्रतिगामी परिणाम होतात. मानसिक आरोग्य निकोप होण्यासाठी विवेकी विचारांची जोपासना केली पाहिजे, असे ...

इस्लामपूर : मानसिक आजारामुळे शारीरिक कार्यक्षमतेवर प्रतिगामी परिणाम होतात. मानसिक आरोग्य निकोप होण्यासाठी विवेकी विचारांची जोपासना केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील (लातूर) यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती मानसिक आरोग्य व्यवस्थापन व विविध उपक्रम विभागाच्यावतीने ‘मन के साथ - मन की बात’ या राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेत त्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ या विषयावर बोलत होत्या.

डॉ. पाटील म्हणाल्या की, मनोविकारांबद्दल समाजात अंधश्रध्दा आहेत. योग्य व वेळेत उपचार घेतल्यास तीव्र मनोविकार आटोक्यात आणणे शक्य होते. मानसिक आरोग्य बिघडल्यास शरिराला त्रास होतो. मानसिक आरोग्य बिघडण्यास सामाजिक व जैविक कारणे आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्य जपले पाहिजे.

त्या म्हणाल्या, शरिराच्या स्वच्छतेबरोबरच मनाचीही स्वच्छता नियमित केली पाहिजे. सकारात्मक विचार वाढवून नकारार्थी भाव कमी केले पाहिजेत. योग्य समुपदेशन व उपचार केल्यास व्यसनाधिनता नाहीशी करता येऊ शकते.

अतुल सवाखंडे यांनी प्रास्ताविक केले तर नीलेश कुडाळकर यांनी परिचय करून दिला. धर्मराज चवरे यांनी सूत्रसंचालन केले. अजय भालकर यांनी आभार मानले. संजय बनसोडे, माधव बावगे, ठकसेन गोराने, विनायक सावळे, नितीन राऊत, अनिल करवीर, अवधूत कांबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.