शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

नवअभियंत्यांनो, शहराच्या समस्यांची उत्तरे शोधा

By admin | Updated: May 26, 2017 23:07 IST

नवअभियंत्यांनो, शहराच्या समस्यांची उत्तरे शोधा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ग्रामीण भागातून शहरांकडे लोकांचे स्थलांतर वाढले आहे. शहरांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यात शहराच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याने या समस्या बिकट होत आहेत. त्यामुळे नव्या अभियंत्यांसमोर शहरातील समस्यांची उत्तरे शोधण्याचे आव्हान असल्याचे मत वालचंद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी शुक्रवारी केले.येथील वालचंद महाविद्यालयाच्या सातव्या पदवीदान समारंभप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर एमटीईचे नूतन अध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, शिवाजी विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, प्राचार्य जी. व्ही. परीशवाड उपस्थित होते. अजित गुलाबचंद म्हणाले की, जगाच्या रचनेत वेगाने बदल घडत आहेत. आजच्याइतके समृध्द आणि अस्थिर वातावरण कधीच नव्हते. त्यामुळे नवअभियंत्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी विस्तीर्ण आकाश खुले आहे. भविष्याचा वेध घेतल्यास दहा वर्षाच्या कालावधित लाखो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. मात्र जो गुणवत्ता दाखवेल त्याचाच निभाव लागेल, अशी स्थिती असेल. खेड्यातून शहराकडे येणाऱ्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. खेड्यांच्या नयनरम्य कल्पनेत रममाण झाल्यामुळे शहराच्या विकासाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. या वास्तवाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. नवअभियंत्यांसमोर शहराच्या विकासाचे आव्हान आहे, ते त्यांनी आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेलले पाहिजे, असे ते म्हणाले.देवानंद शिंदे म्हणाले की, एक जबाबदार अभियंता म्हणून प्रत्येकाने आपली ओळख निर्माण करावी. कल्पकतेला संधी देऊन नवनवीन उपक्रम राबविण्यास पुढाकार घेतला, तर ती देशसेवाच ठरणार आहे. जीवनात यश, अपयशाचे डोंगर नेहमीच सर करावे लागतात. तुमचे कौशल्य दाखविण्यासाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध असून, त्याचा अभियंत्यांनी संधी म्हणून लाभ घेणे आवश्यक आहे. संजयकाका पाटील म्हणाले की, ‘वालचंद’ने अनेक वर्षांपासून उत्तम विद्यार्थी घडविण्याची परंपरा जपली आहे. त्यामध्ये यापुढेही खंड पडणार नाही. नेहमी उत्तम कार्य करण्याचीच दृष्टी ठेवल्यास राष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल होण्यास वेळ लागणार नाही, असे सांगितले. यावेळी वालंचदच्या माजी विद्यार्थी परिषदेचे हेमंत अभ्यंकर, दीपक शिंदे-म्हैसाळकर, श्रीनिवास पाटील यांच्यासह प्राचार्य, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.