शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षातही फुलांच्या घटत्या दराने उत्पादकांवर संक्रांत

By admin | Updated: January 22, 2017 23:40 IST

लग्नसराईतही अपेक्षाभंग : मिरजेच्या फूल बाजारात मागणी घटली, शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा ‘व्हेलेंटाईन डे’ची

सदानंद औंधे ल्ल मिरजगणेशोत्सव, दसरा, दिवाळीत कोसळणाऱ्या दराने फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. फूलबागा फुलवूनही दर नसल्याने कोमेजून गेलेल्या शेतकऱ्यांवर नव्या वर्षात लग्नसराई सुरू झाल्यानंतरही फुलांचे दर घटल्याने संक्रांत आली आहे. संक्रांत व लग्नसराई सुरू झाल्यानंतरही फुलांचे दर घटल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. फुलांचे दर निम्म्यावर आल्याने शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. मागणी व दर नसल्याने मिरजेच्या बाजारात फुलांची आवक घटली आहे. यावर्षी फुलांचे उत्पादन व बाजारात आवक मोठी असल्याने गणेशोत्सवातही फुलांचे दर वाढले नाहीत. गणेशोत्सव व दसरा, दिवाळीत झेंडूचा दर ५० रुपयांपर्यंत जात असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात झेंडूची लागवड केली होती. मात्र दरवाढीसाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची गणेशोत्सव, दसरा व दिवाळीत झेंडूला १० रुपयापेक्षा कमी दर मिळाल्याने निराशा झाली. झेंडूला दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी झेंडू शेतातून काढून टाकल्याने झेंडूच्या क्षेत्रात घट झाली आहे. झेंडूची आवक कमी झाली तरीही दर दहा रुपयाच्या वर गेलेला नाही. फुलांना मागणी नसल्याने मिरजेतील बाजारातून होणाऱ्या फुलांच्या निर्यातीत घट झाली आहे. फुलांच्या बाजारात निशिगंध, झेंडू, गलांडा, लिली, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी हरितगृहातील फुलांचीही आवक असल्याचे शेतकरी दीपक कोरे यांनी सांगितले. निशिगंध व गुलाबाचे दरही कमी झाले आहेत. निशिगंधचा ३०० रुपयावरून १०० रुपयावर, तर गुलाबाचा दर प्रती शेकडा ३०० रुपयांवरून २०० रुपयांवर आला आहे. मार्गशीर्ष व संक्रांतीतही फुलांना दर मिळाला नाही. आता लग्नसराईस प्रारंभ झाल्यानंतरही फुलांना मागणी नाही. व्हॅलेंटाईन डे साठी हरितगृहातील गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी फुलांना मागणी येत असल्याने फुलांना दरासाठी व्हेलेंटाईन डे ची प्रतीक्षा करावी लागणार आहे.धास्ती कायमनोटाबंदीनंतर बाजारात भाज्यांसह सर्वच शेतीमालाचे दर गडगडले आहेत. त्यामुळे यावर्षी व्हॅलेंटाईन डे नेहमीप्रमाणे साजरा होणार का? याबाबत साशंकता असल्याने, हरितगृहात फुलांचे उत्पादन घेणारे शेतकरी धास्तावले आहेत. व्हॅलेंटाईन डेसाठी मिरजेतून मुंबई, दिल्ली, बेंगलोर या मोठ्या शहरात रेल्वेने फुलांची निर्यात होते. व्हॅलेंटाईन डेसाठी जानेवारीअखेरपासूनच फुलांच्या निर्यातीस सुरूवात होते. हरितगृहातील फुलांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचीही चांगली कमाई होते. मात्र यावर्षी व्हॅलेंटाईन डे साठी फुलांना मागणी कमी असल्याने शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. फुले टिकत नसल्याने पंचाईत