शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
2
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
3
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
4
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
5
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
6
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
7
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
8
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
9
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
10
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
11
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
12
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
13
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
14
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
15
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
16
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
17
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
18
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
19
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
20
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?

आजपासून नवे निर्बंध, व्यापारी पेठांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्य शासनाने लागू केलेल्या कोरोनाच्या नव्या निर्बंधांसह वीकेंडच्या लॉकडाऊनबाबत सांगली शहरातील व्यापारी पेठांमध्ये चिंतेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्य शासनाने लागू केलेल्या कोरोनाच्या नव्या निर्बंधांसह वीकेंडच्या लॉकडाऊनबाबत सांगली शहरातील व्यापारी पेठांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आले. मंगळवारपासून हे नवे निर्बंध अमलात येणार आहेत; मात्र शासन आदेशाबाबत व्यापारी, व्यावसायिकांत संभ्रमावस्था दिसून आली. आदेश लागू होण्याच्या पूर्वसंध्येला नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

शासनाचे निर्बंध केवळ दोन दिवसांपुरतेच आहेत, असा समज व्यापारी, व्यावसायिकांनी केला होता, मात्र व्यापारी संघटनांनी चौकशी केल्यानंतर त्यांच्यासाठी हे निर्बंध महिनाभर कायम राहणार असल्याचे समजले. त्यामुळे संघटनांनी सोशल मीडियाद्वारे ही बाब व्यापारी, व्यावसायिकांपर्यंत पोहोचवली. किरकोळ व्यावसायिकांना मात्र हा संदेश मिळाला नसल्याने त्यांना आठवड्यातील पाच दिवस व्यवसाय करण्यास मुभा आहे, असाच त्यांचा समज झाला. त्यामुळे गोंधळाचे वातावरण सांगलीत दिसून आले. व्यापारी वर्गातून शासनाच्या या निर्णयाबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरणही निर्माण झाले आहे.

एकीकडे हा गोंधळ सुरू असताना बाजारात भाजी व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील शिवाजी मंडई, रिसाला रोड, जुनी भाजी मंडई परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली.

कोट

गेले वर्षभर आम्ही व्यापार नसल्याने आर्थिक संकटात सापडलो आहोत. त्यातच पुन्हा निर्बंध आणून आम्हाला संकटात टाकण्याचे काम शासनाने केले आहे. व्यापाऱ्यांचे जगणे यामुळे मुश्कील होईल.

- समीर खान, व्यापारी, मारुती रोड, सांगली

कोट

घरपट्टी, वीजबिल आम्हाला भरावेच लागले. आता महिनाभर व्यापार बंद ठेवून आम्ही जगणार कसे? दुकाने बंद राहिल्याने देणी थांबणार नाहीत. त्यामुळे शासनाने आठवड्यातील काही दिवसतरी व्यवसायास मुभा द्यायला हवी होती.

-फैय्याज मुल्ला, पानपट्टीचालक, सांगली

कोट

एका कुटुंबातील चौघांना कुठेही जायचे असेल तर त्यांनी शासनाच्या नव्या निर्बंधानुसार दोन रिक्षा करायच्या का? दोघांसाठी रिक्षा करणे कोणत्याही ग्राहकाला परवडत नाही. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या आमच्या पोटावर यामुळे पाय पडणार आहे.

- माणिक पाटील, रिक्षाचालक, सांगली

व्यापारी संघटना आक्रमक

व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, शासनाने अर्धवट आदेश काढले आहेत. त्यात स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश काढायला हवे होते. त्यामुळे जोपर्यंत स्पष्ट आदेश मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही व्यापार सुरू ठेवणार. शासनाने काही व्यावसायिकांना मुभा व काहींवर निर्बंध असे आदेश मागे घ्यावेत. व्यापारी अतुल शहा यांनीही दुकाने बंद न ठेवण्याचे आवाहन करीत शासन निर्णयास विरोध दर्शविला.