शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून नवे निर्बंध, व्यापारी पेठांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्य शासनाने लागू केलेल्या कोरोनाच्या नव्या निर्बंधांसह वीकेंडच्या लॉकडाऊनबाबत सांगली शहरातील व्यापारी पेठांमध्ये चिंतेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्य शासनाने लागू केलेल्या कोरोनाच्या नव्या निर्बंधांसह वीकेंडच्या लॉकडाऊनबाबत सांगली शहरातील व्यापारी पेठांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आले. मंगळवारपासून हे नवे निर्बंध अमलात येणार आहेत; मात्र शासन आदेशाबाबत व्यापारी, व्यावसायिकांत संभ्रमावस्था दिसून आली. आदेश लागू होण्याच्या पूर्वसंध्येला नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

शासनाचे निर्बंध केवळ दोन दिवसांपुरतेच आहेत, असा समज व्यापारी, व्यावसायिकांनी केला होता, मात्र व्यापारी संघटनांनी चौकशी केल्यानंतर त्यांच्यासाठी हे निर्बंध महिनाभर कायम राहणार असल्याचे समजले. त्यामुळे संघटनांनी सोशल मीडियाद्वारे ही बाब व्यापारी, व्यावसायिकांपर्यंत पोहोचवली. किरकोळ व्यावसायिकांना मात्र हा संदेश मिळाला नसल्याने त्यांना आठवड्यातील पाच दिवस व्यवसाय करण्यास मुभा आहे, असाच त्यांचा समज झाला. त्यामुळे गोंधळाचे वातावरण सांगलीत दिसून आले. व्यापारी वर्गातून शासनाच्या या निर्णयाबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरणही निर्माण झाले आहे.

एकीकडे हा गोंधळ सुरू असताना बाजारात भाजी व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील शिवाजी मंडई, रिसाला रोड, जुनी भाजी मंडई परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली.

कोट

गेले वर्षभर आम्ही व्यापार नसल्याने आर्थिक संकटात सापडलो आहोत. त्यातच पुन्हा निर्बंध आणून आम्हाला संकटात टाकण्याचे काम शासनाने केले आहे. व्यापाऱ्यांचे जगणे यामुळे मुश्कील होईल.

- समीर खान, व्यापारी, मारुती रोड, सांगली

कोट

घरपट्टी, वीजबिल आम्हाला भरावेच लागले. आता महिनाभर व्यापार बंद ठेवून आम्ही जगणार कसे? दुकाने बंद राहिल्याने देणी थांबणार नाहीत. त्यामुळे शासनाने आठवड्यातील काही दिवसतरी व्यवसायास मुभा द्यायला हवी होती.

-फैय्याज मुल्ला, पानपट्टीचालक, सांगली

कोट

एका कुटुंबातील चौघांना कुठेही जायचे असेल तर त्यांनी शासनाच्या नव्या निर्बंधानुसार दोन रिक्षा करायच्या का? दोघांसाठी रिक्षा करणे कोणत्याही ग्राहकाला परवडत नाही. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या आमच्या पोटावर यामुळे पाय पडणार आहे.

- माणिक पाटील, रिक्षाचालक, सांगली

व्यापारी संघटना आक्रमक

व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, शासनाने अर्धवट आदेश काढले आहेत. त्यात स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश काढायला हवे होते. त्यामुळे जोपर्यंत स्पष्ट आदेश मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही व्यापार सुरू ठेवणार. शासनाने काही व्यावसायिकांना मुभा व काहींवर निर्बंध असे आदेश मागे घ्यावेत. व्यापारी अतुल शहा यांनीही दुकाने बंद न ठेवण्याचे आवाहन करीत शासन निर्णयास विरोध दर्शविला.