शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

नेमिनाथनगर भूखंडाचा अर्ज दहा वर्षांपासून धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST

सांगली : नेमिनाथनगरमधील कोट्यवधीच्या भूखंडाची परस्पर विक्री प्रकरणात बुधवारी धक्कादायक प्रकार समोर आला. हा भूखंड महापालिकेच्या नावावर करण्यासाठी नगरभूमापन ...

सांगली : नेमिनाथनगरमधील कोट्यवधीच्या भूखंडाची परस्पर विक्री प्रकरणात बुधवारी धक्कादायक प्रकार समोर आला. हा भूखंड महापालिकेच्या नावावर करण्यासाठी नगरभूमापन कार्यालयाकडे २०११ मध्ये अर्ज करण्यात आला होता. दहा वर्षे या कार्यालयाकडून नाव लावण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याचे नगरसेवक संतोष पाटील व नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी सांगितले.

नेमिनाथनगरमधील मंजूर रेखांकनातील नऊ गुंठ्यांच्या भूखंडाची परस्पर विक्री करण्यात आल्याचे प्रकरण काँग्रेसचे नगरसेवक पाटील व साखळकर यांनी उजेडात आणले. तत्कालीन सांगली नगरपालिकेने या भूखंडावर नाव लावून घेतले नव्हते. त्याचा फायदा घेत या भूखंडाची विक्री करण्यात आली. त्यानंतर संबंधिताने फायनान्स कंपनीकडून या भूखंडावर दीड कोटीचे कर्ज घेतले. हे कर्ज थकत गेल्यानंतर फायनान्स कंपनीने भूखंडाचा जाहीर लिलाव काढला होता. त्यानंतर हे प्रकरण समोर आले.

दरम्यान, महापालिकेच्या नगररचना विभागाने २२ ऑगस्ट २०११ रोजी नगरभूमापन कार्यालयाकडे या भूखंडावर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. तसेच चौकशी नोंदवहीत १९८४ मध्ये हा खुला भूखंड असल्याचा उल्लेख आहे. नगरभूमापन कार्यालयाने वेळीच महापालिकेचे नाव न लावल्याने मूळ मालकाने या जागेचा बाजार केला. या कार्यालयाच्या ढिम्म कारभारामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांच्या भूखंडावर पाणी सोडण्याची वेळ आली होती, असेही पाटील व साखळकर यांनी सांगितले.

चौकट

आयुक्तांनी मागविला अहवाल

आयुक्त नितीन कापडणीस यांनी नगररचना विभागाकडून या भूखंडासंदर्भातील सर्वच कागदपत्रांची फाईल मागवून घेतली. महापालिकेकडील उपलब्ध कागदपत्रातून हा खुला भूखंड असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तातडीने या प्रकरणी कार्यवाही करण्याचे आदेशही आयुक्तांनी नगररचना व मालमत्ता विभागाला दिले.

चौकट

महसूलमंत्र्यांकडे तक्रार करणार

नगरभूमापन कार्यालयाच्या ढिम्म कारभारामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे. आतापर्यंत अनेक भूखंडांना नावे लावण्याचे अर्ज या कार्यालयाकडे पडून आहेत. त्यावर कसलाच निर्णय नगरभूमापन कार्यालयाने घेतलेला नाही. याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी सांगितले.