शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणारे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST

सांगली : जिवापेक्षा मोबाईलवरील संभाषणाला प्राधान्य देत वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वत:सह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालून हे ...

सांगली : जिवापेक्षा मोबाईलवरील संभाषणाला प्राधान्य देत वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वत:सह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालून हे वाहनधारक सुसाट सुटले आहेत. त्यांना ना अपघाताची भीती वाटते ना पोलिसांच्या कारवाईची. त्यामुळे आता अशा वाहनधारकांविरोधात कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात २०१९ या वर्षात वाहन चालविताना मोबाईल वापरणाऱ्या २ लाख ६६ हजार हजार वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. वाहन चालविताना मोबाईल वापरण्यामुळे एकूण १०० अपघात होऊन त्यात १३ जणांचा बळी गेला. अन्य जखमी झाले. सांगली जिल्ह्यातही असे अपघात होत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असे वाहनधारक सुसाट वेगाने जात आहेत. ज्याठिकाणी वाहतूक पोलीस नाहीत, अशाठिकाणी निष्काळजीपणा अधिक दिसून येतो. त्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. दुचाकी, चारचाकी व मोठ्या वाहनांचे अनेक चालकही सर्रास वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना आढळतात. पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतरही पुन्हा ती चूक करण्याचा प्रकार ते करतात. सांगली जिल्ह्यात २०१९ मध्ये सर्वाधिक म्हणजे ८ हजार ६३३ वाहनधारकांना मोबाईल वापरत वाहन चालविल्याबद्दल १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. दंडाची रक्कम आता वाढविण्यात आली असली, तरी असे गुन्हे करण्याच्या प्रमाणावर अद्याप आळा बसलेला नाही. त्यामुळे परवाना रद्दपासून कारावासापर्यंतच्या कडक शिक्षेची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच अशा बेशिस्त वाहनधारकांना आळा बसेल.

चौकट

दंड काय

वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास आता एक हजार ते पाच हजार रुपये दंड किंवा ६-१२ महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. हाच गुन्हा पुन्हा केल्यास १० हजार रुपये दंड किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. केंद्र शासनाने मोटार वाहन कायदा-२०१९ अंतर्गत नुकतेच याबाबत बदल करून कडक तरतुदी केल्या आहेत.

चौकट

मोबाईलवर बोलत वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा आहे. सार्वजनिक व वैयक्तिक सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण होऊ शकतो. वाहनधारकांना याबाबत अधिक काळजी घ्यावी लागते. बऱ्याचदा पोलिसांना पाहिले की मोबाईल बंद करण्याचे व लपवालपवी करण्याचे प्रकार वाहनधारकांकडून होत असतात. तरीही पोलिसांमार्फत या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाते.

- प्रज्ञा देशमुख

सहायक पोलीस निरीक्षक