शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ना अपघाताची भीती ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणारे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST

सांगली : जिवापेक्षा मोबाईलवरील संभाषणाला प्राधान्य देत वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वत:सह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालून हे ...

सांगली : जिवापेक्षा मोबाईलवरील संभाषणाला प्राधान्य देत वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वत:सह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालून हे वाहनधारक सुसाट सुटले आहेत. त्यांना ना अपघाताची भीती वाटते ना पोलिसांच्या कारवाईची. त्यामुळे आता अशा वाहनधारकांविरोधात कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात २०१९ या वर्षात वाहन चालविताना मोबाईल वापरणाऱ्या २ लाख ६६ हजार हजार वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. वाहन चालविताना मोबाईल वापरण्यामुळे एकूण १०० अपघात होऊन त्यात १३ जणांचा बळी गेला. अन्य जखमी झाले. सांगली जिल्ह्यातही असे अपघात होत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असे वाहनधारक सुसाट वेगाने जात आहेत. ज्याठिकाणी वाहतूक पोलीस नाहीत, अशाठिकाणी निष्काळजीपणा अधिक दिसून येतो. त्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. दुचाकी, चारचाकी व मोठ्या वाहनांचे अनेक चालकही सर्रास वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना आढळतात. पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतरही पुन्हा ती चूक करण्याचा प्रकार ते करतात. सांगली जिल्ह्यात २०१९ मध्ये सर्वाधिक म्हणजे ८ हजार ६३३ वाहनधारकांना मोबाईल वापरत वाहन चालविल्याबद्दल १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. दंडाची रक्कम आता वाढविण्यात आली असली, तरी असे गुन्हे करण्याच्या प्रमाणावर अद्याप आळा बसलेला नाही. त्यामुळे परवाना रद्दपासून कारावासापर्यंतच्या कडक शिक्षेची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच अशा बेशिस्त वाहनधारकांना आळा बसेल.

चौकट

दंड काय

वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास आता एक हजार ते पाच हजार रुपये दंड किंवा ६-१२ महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. हाच गुन्हा पुन्हा केल्यास १० हजार रुपये दंड किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. केंद्र शासनाने मोटार वाहन कायदा-२०१९ अंतर्गत नुकतेच याबाबत बदल करून कडक तरतुदी केल्या आहेत.

चौकट

मोबाईलवर बोलत वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा आहे. सार्वजनिक व वैयक्तिक सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण होऊ शकतो. वाहनधारकांना याबाबत अधिक काळजी घ्यावी लागते. बऱ्याचदा पोलिसांना पाहिले की मोबाईल बंद करण्याचे व लपवालपवी करण्याचे प्रकार वाहनधारकांकडून होत असतात. तरीही पोलिसांमार्फत या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाते.

- प्रज्ञा देशमुख

सहायक पोलीस निरीक्षक