शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

‘मोक्ष’ संकल्पनेत न गुरफटता देहदान आवश्यक

By admin | Updated: April 3, 2015 00:36 IST

सतीश डोडिया यांचे मत

सध्या प्रत्येकजण स्वकेंद्रित जीवन जगत आहे. साहजिकच कित्येकांच्या जीवनातून ‘दान’ ही संकल्पना हद्दपार झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात दानाचे महत्त्व रुजवून त्यांना देहदान, रक्तदान आणि नेत्रदानाला प्रवृत्त करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखेच आहे. आजही भारतीयांच्या मनात पूर्वपरंपरेनुसार चालत आलेल्या रूढींचा पगडा आहे. देहदान केले, तर मोक्ष मिळतो का? रक्तदान करणे शरीरास लाभदायक आहे का? नेत्रदानाची खरंच गरज आहे का? यासह विविध विषयांवर अमित डोडिया प्रतिष्ठानचे सतीश डोडिया यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...भारतीय संस्कृतीत ‘दान’ या संकल्पनेचे काय महत्त्व आहे? - ‘दान’ या संकल्पनेला आपल्याकडे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. परंतु दान करताना डाव्या हाताचे उजव्या हाताला कळता कामा नये, असा संकेत आहे. यामागे दान करणाऱ्या व्यक्तीच्या मनात अहंकार निर्माण होऊ नये, हा विचार आहे. कालानुरूप दानाच्या परिभाषेत बदल होत गेला. विज्ञान युगात देहदान, नेत्रदान आणि रक्तदान यांना महत्त्व आले आहे. विविध सामाजिक संघटनांच्या जागृतीमुळे दानाच्या या तीनही प्रकारात नागरिकांचा सहभाग वाढत आहे. एकवीसाव्या शतकातदेखील देहदानाबाबत नागरिकांच्या मनात गैरसमज आहेत का ?- दुर्दैवाने गैरसमज आहेत. आजही कित्येक शिक्षित लोकदेखील मोक्ष, मुक्ती, आत्मा या मूर्खपणाच्या परिघात फिरत आहेत. कोणाला देहदानाविषयी माहिती सांगायला गेले की, त्यांचा पहिला प्रश्न असतो, अंत्यविधी नाही केला तर संबंधित व्यक्तीचा आत्मा इतरत्र भटकत राहील. त्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. वास्तविक आपण विज्ञान युगात वावरत आहोत. त्यामुळे हे निरर्थक विचार फेकून दिले पाहिजेत. यासाठी विविध सामाजिक संघटनांनी समाजजाणीव जागृत करण्याची आवश्यकता आहे. आज परदेशात देहदानाकडे कल वाढत चालला आहे. व्यक्ती गेल्यानंतर तिच्या शरीराचा उपयोग जर इतरांना होत असेल, तर देहदान करायला काय हरकत आहे? हा विचार आपल्याकडे रुजायला हवा. देहदानाची खरंच गरज आहे का आणि कोणत्या व्यक्तीचे देहदान स्वीकारले जाते?- शरीरशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीच्या शरीराचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक असते. साहजिकच कोणी देहदान केले, तर त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होतो. कोणताही आजार नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे देहदान स्वीकारले जाते. परंतु त्या देहाचा उपयोग प्रत्यारोपणासाठी होत नाही. याउलट वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘ब्रेन डेथ’ घोषित केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी भावनेच्या मायाजालात न गुरफटता वैद्यकीय सल्ल्यानुसार संबंधित व्यक्तीला लावलेला कृत्रिम आॅक्सिजनचा पुरवठा काढून देहदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. असे केले तर त्यांचे सर्व अवयव दुसऱ्यांच्या उपयोगी येऊ शकतात. सांगली जिल्ह्याचा विचार केल्यास मागील सात वर्षांत ५० हून अधिक जणांनी देहदान केलेले आहे, तर यंदा सुमारे ३५० जणांनी देहदान करण्याचा संकल्प केलेला आहे. जनस्वास्थ्य परिवारातर्फे देहदानाबाबत जागृतीची मोहीम सुरू आहे. नेत्रदानाची चळवळ उभी राहावी यासाठी काय करता येईल?- सामाजिक संघटना त्यांच्यापरीने प्रयत्न करीत आहेत. परंतु शहर स्तरावर विचार केला तर, महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अंत्यविधी साहित्य मोफत मिळण्यासाठी मनपातर्फे जो पास देण्यात येतो, त्याच्यामागे नेत्रदानाचे आवाहन करण्यात आलेले आहे. परंतु ते कितीजण गांभीर्याने घेतात, हा प्रश्नच आहे. सध्या मनपाची आर्थिक स्थितीही गंभीर आहे. प्रत्येक वर्षी नागरिकांच्या अंत्यविधीवर मनपाचे लाखो रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे मनपाने अंत्यविधी हा सशुल्क करणे आवश्यक आहे. जे नेत्रदान करतील, त्यांना अंत्यविधी खर्चात ५० टक्के सवलत आणि मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी रक्षाविसर्जन नदीत न करता झाडाच्या बुंध्यात केल्यास अशा व्यक्तींच्या अंत्यविधीचा खर्च मनपाने करणे योग्य आहे. यामुळे नेत्रदानामध्येही वाढ होईल आणि रक्षाविसर्जनामुळे होणारे नदी प्रदूषण देखील कमी होईल. जिल्ह्यातील नेत्रदानाची काय स्थिती आहे ?- सध्या नेत्रपटल खराब असणाऱ्या ७५० व्यक्तींना नेत्रदानाची गरज आहे. जिल्ह्यात पाच नेत्रपेढ्या आहेत. गैरसमजुतीमुळे नेत्रदानाचे प्रमाण कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात नेत्रदानाचे प्रमाण वाढत आहे. एखाद्या व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केलेला असतो, परंतु त्या व्यक्तीचे निधन झाल्यास ‘नेत्र’ काढण्यास कुटुंबीय विरोध करतात. यामुळे वादाचे प्रसंगही उद्भवतात. हा प्रश्न भावनिक असल्याने आम्हीही फार आग्रह करीत नाही. मुळात भारतातच प्रतिवर्षी केवळ १५ ते १७ हजार नेत्रदान होते. सव्वाशे कोटी लोकसंख्या असूनही आपण श्रीलंकेकडून ‘नेत्र’ आयात करतो. रक्तदान केल्यास त्याचा आपल्या शरीराला काही लाभ होतो का ?- रक्तदानामुळे दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचतातच, परंतु तीन महिन्यांनी एकदा रक्तदान केल्यास आपले शरीर सुदृढ राहण्यास मदतच होते. किडनी आणि हृदयविकाराचे आजार देखील कमी होण्यास मदत होते. साहजिकच स्वत:च्या स्वार्थाकरिता तरी प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे.                                                                                                                                                      नरेंद्र रानडे