शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
3
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
4
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
5
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
6
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
7
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
8
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
9
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
10
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
11
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
12
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
13
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
14
कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!
15
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
16
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
17
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
18
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
19
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
20
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?

पाण्याचे व्यवस्थापन व हिशोब काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST

सांगली : पाण्याच्या शाश्वत विकास व त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यरत असलेल्या तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पाणीप्रश्नाकडे ...

सांगली : पाण्याच्या शाश्वत विकास व त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यरत असलेल्या तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पाणीप्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष व त्यामुळे भविष्यात येणारे अनर्थ लक्षात घेता, तरुणाईने यात पुढाकार घ्यायला हवा आणि त्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन व हिशोब काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेच्या तरुणाईने कार्यरत राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ भूजल वैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी व्यक्त केले.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीने ‘भूजल साक्षरता’ या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोसकी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.जी. कणसे होते.

गोसकी पुढे म्हणाले, सध्या मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता असल्याने त्याकडे आपले दुर्लक्ष होते. पाण्याचे व्यवस्थापन आणि पाण्याचा हिशोब आपण ठेवत नाही, हीच खरी मोठी अडचण आहे. पाण्याच्या बाबतीत आपण आपण गांभीर्याने विचार करीत नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. भूजल सर्वेक्षण व साक्षरतेच्या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेची तरुणाई खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे, हे नक्कीच आशादायी चित्र आहे. यासाठीच पाण्याचे महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.