शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांविरोधात संघटित लढण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:26 IST

शिराळा : हवामानातील बदल जगासाठी विनाशकारी धोक्याची घंटा आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम गरीब, ...

शिराळा :

हवामानातील बदल जगासाठी विनाशकारी धोक्याची घंटा आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम गरीब, शेतकरीवर्गावर होत आहे. या घटकांना संघटित करून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या भांडवलदार आणि सरकारविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. शिवा दुबे यांनी केले.

'पर्यावरण समृद्धी मंच शिराळा' या समूहाने ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले आहे.

या उपक्रमांतर्गत एस. ए. पी.सी. सी. या संस्थेच्या समन्वयक प्रा. शिवा दुबे (मुंबई) आणि पर्यावरण कार्यकर्ती नुपूर रिसबूड (बेंगलोर) यांनी 'वातावरण बदलाचे परिणाम व पर्यायी न्याय व्यवस्था' याविषयी विचार मांडले.

प्रा. शिवा दुबे म्हणाल्या, वातावरण बदलाचा परिणाम पंचमहाभुतावर होत आहे. पर्यावरण ऱ्हासाबरोबर आर्थिक विषमतादेखील वाढत आहे. अमेरिका, युरोपातील औद्योगिकीकरणाने जगाला धोका निर्माण झाला आहे. सरकारांची नीती ही मोठ्या उद्योगधार्जिणी असल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. पर्यावरण चळवळीकडे जगाचे लक्ष वेधणारी ग्रेटा थनबर्गने लहान मुले, मुली यांच्यामार्फत पर्यावरण बदलास सुरुवात केली आहे. आपणही पर्यावरण संवर्धनासाठी जागृत झाले पाहिजे. पर्यावरणाचे नुकसान करणारे घटक शोधून त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. शासनाच्या पर्यावरण व्यवस्थेमधील कायदे व प्रक्रिया या व्यवस्थेमध्ये आपण भारतात शेतकरी, आदिवासी, गरीब लोकांचा सहभाग वाढवला पाहिजे. हवामान बदलाचे परिणाम गरीब, शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. पर्यावरणाचे नुकसान करणारे श्रीमंत देश आणि भांडवलदार हे मात्र सुरक्षित आहेत. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ आणि कोरोनासारख्या साथीत शहरातील झोपडपट्टीत राहणारे मजूर, शेतकरी आणि आदिवासी यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. उद्योगधंदे, पर्यावरण उपाययोजनासंदर्भात शासनाची उदासीनता आहे.

पर्यावरण अभ्यासक नुपूर रिसबूड म्हणाल्या, सध्याची कोरोना परिस्थिती आणि वारंवार होणारी चक्रीवादळे हेदेखील वातावरण बदलाचे परिणाम आहेत. पहिल्यांदा माणसाने मर्यादा तोडली आहे. त्यामुळेच निसर्ग त्याची मर्यादा सोडत आहे. आता मानवजातीच्या कल्याणासाठी पर्यावरण संवर्धनाकडे सजगतेने बघण्याची गरज आहे.

सचिन करमाळे यांनी स्वागत केले. जलनायक प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र लोकरे यांनी सूत्रसंचालन केले. महादेव हवालदार यांनी आभार मानले. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, पर्यावरणतज्ज्ञ मोहन पराजणे, गंगाराम पाटील, प्रा. स्मिता जांभळी, प्रदीप पाटणकर, सुप्रिया घोरपडे, अक्षय जहागीरदार, करुणा कांबळे आदी उपस्थित होते.