शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांविरोधात संघटित लढण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:26 IST

शिराळा : हवामानातील बदल जगासाठी विनाशकारी धोक्याची घंटा आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम गरीब, ...

शिराळा :

हवामानातील बदल जगासाठी विनाशकारी धोक्याची घंटा आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम गरीब, शेतकरीवर्गावर होत आहे. या घटकांना संघटित करून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या भांडवलदार आणि सरकारविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. शिवा दुबे यांनी केले.

'पर्यावरण समृद्धी मंच शिराळा' या समूहाने ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले आहे.

या उपक्रमांतर्गत एस. ए. पी.सी. सी. या संस्थेच्या समन्वयक प्रा. शिवा दुबे (मुंबई) आणि पर्यावरण कार्यकर्ती नुपूर रिसबूड (बेंगलोर) यांनी 'वातावरण बदलाचे परिणाम व पर्यायी न्याय व्यवस्था' याविषयी विचार मांडले.

प्रा. शिवा दुबे म्हणाल्या, वातावरण बदलाचा परिणाम पंचमहाभुतावर होत आहे. पर्यावरण ऱ्हासाबरोबर आर्थिक विषमतादेखील वाढत आहे. अमेरिका, युरोपातील औद्योगिकीकरणाने जगाला धोका निर्माण झाला आहे. सरकारांची नीती ही मोठ्या उद्योगधार्जिणी असल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. पर्यावरण चळवळीकडे जगाचे लक्ष वेधणारी ग्रेटा थनबर्गने लहान मुले, मुली यांच्यामार्फत पर्यावरण बदलास सुरुवात केली आहे. आपणही पर्यावरण संवर्धनासाठी जागृत झाले पाहिजे. पर्यावरणाचे नुकसान करणारे घटक शोधून त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. शासनाच्या पर्यावरण व्यवस्थेमधील कायदे व प्रक्रिया या व्यवस्थेमध्ये आपण भारतात शेतकरी, आदिवासी, गरीब लोकांचा सहभाग वाढवला पाहिजे. हवामान बदलाचे परिणाम गरीब, शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. पर्यावरणाचे नुकसान करणारे श्रीमंत देश आणि भांडवलदार हे मात्र सुरक्षित आहेत. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ आणि कोरोनासारख्या साथीत शहरातील झोपडपट्टीत राहणारे मजूर, शेतकरी आणि आदिवासी यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. उद्योगधंदे, पर्यावरण उपाययोजनासंदर्भात शासनाची उदासीनता आहे.

पर्यावरण अभ्यासक नुपूर रिसबूड म्हणाल्या, सध्याची कोरोना परिस्थिती आणि वारंवार होणारी चक्रीवादळे हेदेखील वातावरण बदलाचे परिणाम आहेत. पहिल्यांदा माणसाने मर्यादा तोडली आहे. त्यामुळेच निसर्ग त्याची मर्यादा सोडत आहे. आता मानवजातीच्या कल्याणासाठी पर्यावरण संवर्धनाकडे सजगतेने बघण्याची गरज आहे.

सचिन करमाळे यांनी स्वागत केले. जलनायक प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र लोकरे यांनी सूत्रसंचालन केले. महादेव हवालदार यांनी आभार मानले. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, पर्यावरणतज्ज्ञ मोहन पराजणे, गंगाराम पाटील, प्रा. स्मिता जांभळी, प्रदीप पाटणकर, सुप्रिया घोरपडे, अक्षय जहागीरदार, करुणा कांबळे आदी उपस्थित होते.