शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांविरोधात संघटित लढण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:26 IST

शिराळा : हवामानातील बदल जगासाठी विनाशकारी धोक्याची घंटा आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम गरीब, ...

शिराळा :

हवामानातील बदल जगासाठी विनाशकारी धोक्याची घंटा आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम गरीब, शेतकरीवर्गावर होत आहे. या घटकांना संघटित करून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या भांडवलदार आणि सरकारविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. शिवा दुबे यांनी केले.

'पर्यावरण समृद्धी मंच शिराळा' या समूहाने ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले आहे.

या उपक्रमांतर्गत एस. ए. पी.सी. सी. या संस्थेच्या समन्वयक प्रा. शिवा दुबे (मुंबई) आणि पर्यावरण कार्यकर्ती नुपूर रिसबूड (बेंगलोर) यांनी 'वातावरण बदलाचे परिणाम व पर्यायी न्याय व्यवस्था' याविषयी विचार मांडले.

प्रा. शिवा दुबे म्हणाल्या, वातावरण बदलाचा परिणाम पंचमहाभुतावर होत आहे. पर्यावरण ऱ्हासाबरोबर आर्थिक विषमतादेखील वाढत आहे. अमेरिका, युरोपातील औद्योगिकीकरणाने जगाला धोका निर्माण झाला आहे. सरकारांची नीती ही मोठ्या उद्योगधार्जिणी असल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. पर्यावरण चळवळीकडे जगाचे लक्ष वेधणारी ग्रेटा थनबर्गने लहान मुले, मुली यांच्यामार्फत पर्यावरण बदलास सुरुवात केली आहे. आपणही पर्यावरण संवर्धनासाठी जागृत झाले पाहिजे. पर्यावरणाचे नुकसान करणारे घटक शोधून त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. शासनाच्या पर्यावरण व्यवस्थेमधील कायदे व प्रक्रिया या व्यवस्थेमध्ये आपण भारतात शेतकरी, आदिवासी, गरीब लोकांचा सहभाग वाढवला पाहिजे. हवामान बदलाचे परिणाम गरीब, शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. पर्यावरणाचे नुकसान करणारे श्रीमंत देश आणि भांडवलदार हे मात्र सुरक्षित आहेत. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ आणि कोरोनासारख्या साथीत शहरातील झोपडपट्टीत राहणारे मजूर, शेतकरी आणि आदिवासी यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. उद्योगधंदे, पर्यावरण उपाययोजनासंदर्भात शासनाची उदासीनता आहे.

पर्यावरण अभ्यासक नुपूर रिसबूड म्हणाल्या, सध्याची कोरोना परिस्थिती आणि वारंवार होणारी चक्रीवादळे हेदेखील वातावरण बदलाचे परिणाम आहेत. पहिल्यांदा माणसाने मर्यादा तोडली आहे. त्यामुळेच निसर्ग त्याची मर्यादा सोडत आहे. आता मानवजातीच्या कल्याणासाठी पर्यावरण संवर्धनाकडे सजगतेने बघण्याची गरज आहे.

सचिन करमाळे यांनी स्वागत केले. जलनायक प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र लोकरे यांनी सूत्रसंचालन केले. महादेव हवालदार यांनी आभार मानले. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, पर्यावरणतज्ज्ञ मोहन पराजणे, गंगाराम पाटील, प्रा. स्मिता जांभळी, प्रदीप पाटणकर, सुप्रिया घोरपडे, अक्षय जहागीरदार, करुणा कांबळे आदी उपस्थित होते.