शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांविरोधात संघटित लढण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:26 IST

शिराळा : हवामानातील बदल जगासाठी विनाशकारी धोक्याची घंटा आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम गरीब, ...

शिराळा :

हवामानातील बदल जगासाठी विनाशकारी धोक्याची घंटा आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम गरीब, शेतकरीवर्गावर होत आहे. या घटकांना संघटित करून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या भांडवलदार आणि सरकारविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. शिवा दुबे यांनी केले.

'पर्यावरण समृद्धी मंच शिराळा' या समूहाने ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले आहे.

या उपक्रमांतर्गत एस. ए. पी.सी. सी. या संस्थेच्या समन्वयक प्रा. शिवा दुबे (मुंबई) आणि पर्यावरण कार्यकर्ती नुपूर रिसबूड (बेंगलोर) यांनी 'वातावरण बदलाचे परिणाम व पर्यायी न्याय व्यवस्था' याविषयी विचार मांडले.

प्रा. शिवा दुबे म्हणाल्या, वातावरण बदलाचा परिणाम पंचमहाभुतावर होत आहे. पर्यावरण ऱ्हासाबरोबर आर्थिक विषमतादेखील वाढत आहे. अमेरिका, युरोपातील औद्योगिकीकरणाने जगाला धोका निर्माण झाला आहे. सरकारांची नीती ही मोठ्या उद्योगधार्जिणी असल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. पर्यावरण चळवळीकडे जगाचे लक्ष वेधणारी ग्रेटा थनबर्गने लहान मुले, मुली यांच्यामार्फत पर्यावरण बदलास सुरुवात केली आहे. आपणही पर्यावरण संवर्धनासाठी जागृत झाले पाहिजे. पर्यावरणाचे नुकसान करणारे घटक शोधून त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. शासनाच्या पर्यावरण व्यवस्थेमधील कायदे व प्रक्रिया या व्यवस्थेमध्ये आपण भारतात शेतकरी, आदिवासी, गरीब लोकांचा सहभाग वाढवला पाहिजे. हवामान बदलाचे परिणाम गरीब, शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. पर्यावरणाचे नुकसान करणारे श्रीमंत देश आणि भांडवलदार हे मात्र सुरक्षित आहेत. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ आणि कोरोनासारख्या साथीत शहरातील झोपडपट्टीत राहणारे मजूर, शेतकरी आणि आदिवासी यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. उद्योगधंदे, पर्यावरण उपाययोजनासंदर्भात शासनाची उदासीनता आहे.

पर्यावरण अभ्यासक नुपूर रिसबूड म्हणाल्या, सध्याची कोरोना परिस्थिती आणि वारंवार होणारी चक्रीवादळे हेदेखील वातावरण बदलाचे परिणाम आहेत. पहिल्यांदा माणसाने मर्यादा तोडली आहे. त्यामुळेच निसर्ग त्याची मर्यादा सोडत आहे. आता मानवजातीच्या कल्याणासाठी पर्यावरण संवर्धनाकडे सजगतेने बघण्याची गरज आहे.

सचिन करमाळे यांनी स्वागत केले. जलनायक प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र लोकरे यांनी सूत्रसंचालन केले. महादेव हवालदार यांनी आभार मानले. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, पर्यावरणतज्ज्ञ मोहन पराजणे, गंगाराम पाटील, प्रा. स्मिता जांभळी, प्रदीप पाटणकर, सुप्रिया घोरपडे, अक्षय जहागीरदार, करुणा कांबळे आदी उपस्थित होते.