शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

‘म्हैसाळ’साठी २७५ कोटींची गरज

By admin | Updated: March 14, 2016 00:23 IST

सुभाष देशमुख : जत तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा, शासनाला अहवाल देणार

जत : जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी २५० ते २७५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. असा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना सादर करण्यात येईल, अशी माहिती आमदार सुभाष देशमुख (दक्षिण सोलापूर) यांनी दिली.ते म्हणाले, शासन जत तालुक्यातील चारा व पाणी टंचाईसाठी प्रत्येकवर्षी सर्वसाधारण पाच कोटी रुपये खर्च करत आहे. जो खर्च होईल तो एकदाच होणार आहे. त्यानंतर मात्र चारा व पाणी टंचाई निर्माण होणार नाही. येथील नागरिकांनाही ऊस तोडणी कामगार म्हणून स्थलांतर करावे लागणार नाही. म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी येथील जनतेची भावना आहे. शासनस्तरावर झालेल्या निर्णयानुसार जत तालुक्यातील दुष्काळी जनतेच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आ. सुभाष देशमुख यांनी जत शहर व तालुक्यातील बनाळी, वायफळ, अचकनहळ्ळी गावांचा दौरा केला. त्यांच्यासमवेत आ. विलासराव जगताप व कार्यकर्ते उपस्थित होते.म्हैसाळ कालवा परिसरात असलेल्या तलावात पाणी सोडावे, चारा डेपो, छावणी किंवा शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे, खरीपप्रमाणे रब्बी हंगामातीलही नुकसानभरपाई मिळावी, शेतसारा, वीज बिल माफ करावे, पीक विमा योजनेचे पैसे मिळावेत, वर्षातून तीनवेळा म्हैसाळ कालव्यातून आवर्तन करावे, वायफळ (ता.जत) पर्यंत कालव्यातून पाणी सोडावे, हवामानावर आधारित पीक विमा योजनेचे पैसे मिळावेत आदी मागण्या शेतकऱ्यांनी आ. सुभाष देशमुख यांच्याकडे केल्या आहेत. भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी व प्रमोद सावंत, उमेश सावंत, संजयकुमार सावंत, रमेश साबळे, विलास पाटील, सुरेश शिंदे, शिवाजीराव ताड, बी. आर. सावंत, हेमंत भोसले उपस्थित होते. (वार्ताहर)छावणी सुरु करण्याची मानसिकता नाहीचारा छावणी सुरू करण्याची शासनाची मानसिकता नाही. परंतु पशुधन जगविण्यासाठी शासन चारा उपलब्ध करून देणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगितले. म्हैसाळ कालवा परिसरात असलेल्या तलावात पाणी सोडावे, चारा डेपो, छावणी किंवा शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे. खरीपप्रमाणे रब्बी हंगामातीलही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.