शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

‘म्हैसाळ’साठी २७५ कोटींची गरज

By admin | Updated: March 14, 2016 00:23 IST

सुभाष देशमुख : जत तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा, शासनाला अहवाल देणार

जत : जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी २५० ते २७५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. असा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना सादर करण्यात येईल, अशी माहिती आमदार सुभाष देशमुख (दक्षिण सोलापूर) यांनी दिली.ते म्हणाले, शासन जत तालुक्यातील चारा व पाणी टंचाईसाठी प्रत्येकवर्षी सर्वसाधारण पाच कोटी रुपये खर्च करत आहे. जो खर्च होईल तो एकदाच होणार आहे. त्यानंतर मात्र चारा व पाणी टंचाई निर्माण होणार नाही. येथील नागरिकांनाही ऊस तोडणी कामगार म्हणून स्थलांतर करावे लागणार नाही. म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी येथील जनतेची भावना आहे. शासनस्तरावर झालेल्या निर्णयानुसार जत तालुक्यातील दुष्काळी जनतेच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आ. सुभाष देशमुख यांनी जत शहर व तालुक्यातील बनाळी, वायफळ, अचकनहळ्ळी गावांचा दौरा केला. त्यांच्यासमवेत आ. विलासराव जगताप व कार्यकर्ते उपस्थित होते.म्हैसाळ कालवा परिसरात असलेल्या तलावात पाणी सोडावे, चारा डेपो, छावणी किंवा शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे, खरीपप्रमाणे रब्बी हंगामातीलही नुकसानभरपाई मिळावी, शेतसारा, वीज बिल माफ करावे, पीक विमा योजनेचे पैसे मिळावेत, वर्षातून तीनवेळा म्हैसाळ कालव्यातून आवर्तन करावे, वायफळ (ता.जत) पर्यंत कालव्यातून पाणी सोडावे, हवामानावर आधारित पीक विमा योजनेचे पैसे मिळावेत आदी मागण्या शेतकऱ्यांनी आ. सुभाष देशमुख यांच्याकडे केल्या आहेत. भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी व प्रमोद सावंत, उमेश सावंत, संजयकुमार सावंत, रमेश साबळे, विलास पाटील, सुरेश शिंदे, शिवाजीराव ताड, बी. आर. सावंत, हेमंत भोसले उपस्थित होते. (वार्ताहर)छावणी सुरु करण्याची मानसिकता नाहीचारा छावणी सुरू करण्याची शासनाची मानसिकता नाही. परंतु पशुधन जगविण्यासाठी शासन चारा उपलब्ध करून देणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगितले. म्हैसाळ कालवा परिसरात असलेल्या तलावात पाणी सोडावे, चारा डेपो, छावणी किंवा शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे. खरीपप्रमाणे रब्बी हंगामातीलही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.