शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

‘म्हैसाळ’साठी २७५ कोटींची गरज

By admin | Updated: March 14, 2016 00:23 IST

सुभाष देशमुख : जत तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा, शासनाला अहवाल देणार

जत : जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी २५० ते २७५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. असा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना सादर करण्यात येईल, अशी माहिती आमदार सुभाष देशमुख (दक्षिण सोलापूर) यांनी दिली.ते म्हणाले, शासन जत तालुक्यातील चारा व पाणी टंचाईसाठी प्रत्येकवर्षी सर्वसाधारण पाच कोटी रुपये खर्च करत आहे. जो खर्च होईल तो एकदाच होणार आहे. त्यानंतर मात्र चारा व पाणी टंचाई निर्माण होणार नाही. येथील नागरिकांनाही ऊस तोडणी कामगार म्हणून स्थलांतर करावे लागणार नाही. म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी येथील जनतेची भावना आहे. शासनस्तरावर झालेल्या निर्णयानुसार जत तालुक्यातील दुष्काळी जनतेच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आ. सुभाष देशमुख यांनी जत शहर व तालुक्यातील बनाळी, वायफळ, अचकनहळ्ळी गावांचा दौरा केला. त्यांच्यासमवेत आ. विलासराव जगताप व कार्यकर्ते उपस्थित होते.म्हैसाळ कालवा परिसरात असलेल्या तलावात पाणी सोडावे, चारा डेपो, छावणी किंवा शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे, खरीपप्रमाणे रब्बी हंगामातीलही नुकसानभरपाई मिळावी, शेतसारा, वीज बिल माफ करावे, पीक विमा योजनेचे पैसे मिळावेत, वर्षातून तीनवेळा म्हैसाळ कालव्यातून आवर्तन करावे, वायफळ (ता.जत) पर्यंत कालव्यातून पाणी सोडावे, हवामानावर आधारित पीक विमा योजनेचे पैसे मिळावेत आदी मागण्या शेतकऱ्यांनी आ. सुभाष देशमुख यांच्याकडे केल्या आहेत. भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी व प्रमोद सावंत, उमेश सावंत, संजयकुमार सावंत, रमेश साबळे, विलास पाटील, सुरेश शिंदे, शिवाजीराव ताड, बी. आर. सावंत, हेमंत भोसले उपस्थित होते. (वार्ताहर)छावणी सुरु करण्याची मानसिकता नाहीचारा छावणी सुरू करण्याची शासनाची मानसिकता नाही. परंतु पशुधन जगविण्यासाठी शासन चारा उपलब्ध करून देणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगितले. म्हैसाळ कालवा परिसरात असलेल्या तलावात पाणी सोडावे, चारा डेपो, छावणी किंवा शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे. खरीपप्रमाणे रब्बी हंगामातीलही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.