शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

वांगी येथील पुरातन नरसिंह मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज

By admin | Updated: August 31, 2014 23:49 IST

सुमारे १५० वर्षापूर्वी नरसिंह मंदिराची स्थापना कुलकर्णी समाजाने केली होती.

मोहन मोहिते - वांगी  -वांगी येथील धोकादायक बनलेल्या नरसिंह मंदिराचा जीर्णोध्दार करण्याची गरज आहे. या मंदिराच्या धोकादायक झालेल्या भिंती उतरून घ्याव्यात अशी मागणी होत आहे. वांगी येथे सुमारे १५० वर्षापूर्वी नरसिंह मंदिराची स्थापना कुलकर्णी समाजाने केली होती. गावाच्या बरोबर मध्यभागी उंच अशा ठिकाणी पूर्ण दगडी बांधकाम करून या मंदिराची उभारणी करण्यात आली होती. मात्र यानंतर आजपर्यंत कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही.या मंदिरात अंत्यत सुंदर अशा मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सध्या मात्र या मंदिराच्या सर्व बाजूच्या भिंती पडल्या आहेत. तसेच मंदिरावर छतही नाही. देवालयात जाण्यासाठी रस्ता नाही. एखाद्या ग्रामस्थाला दर्शन घ्यायचे असल्यास त्याला रस्त्यावरून परत जावे लागत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मंदिराच्या उर्वरित राहिलेल्या भिंतीही पडण्याच्या मार्गावर आहेत. मंदिराच्या दोन्ही बाजूने रस्ता आहे. मंदिराच्या राहिलेल्या भिंती कधीही या रस्त्यावर पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. कारण येथे राहणाऱ्या नागरिकांची लहान मुले या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावर सतत खेळत असतात. तरी या मंदिराचा जीर्णोध्दार ग्रामपंचायतीने किंवा या मंदिराच्या असणाऱ्या मंडळाने करून नरसिंहाचे दर्शन गावाला घडवून आणावे. अन्यथा धोकादायक मंदिराच्या राहिलेल्या भिंती तरी काढून घ्याव्यात.गावातील प्राचीन असणाऱ्या अंबिका मंदिर, महादेव मंदिर, मारूती मंदिर आदी मंदिरांचा लोकवर्गणीतून जीर्णोध्दार करण्यात आला आहे. सर्व मंदिरांच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र एकमेव नरसिंह मंदिर नष्ट होत चालले आहे. तरी या मंदिराचा जीर्णोध्दार ग्रामपंचायतीने किंवा मंदिराच्या मंडळाने करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.या मंदिराबाबत या मंडळातील सदस्यांना विचारणा केली असता, दुरूस्तीसाठी या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता नाही व असणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण असल्यामुळे या मंदिराच्या जीर्णोध्दारात अडचण निर्माण झाली आहे, असे सांगितले. (वार्ताहर)