शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्य घडविण्यासाठी वाचनाची गरज : भवाळकर

By admin | Updated: January 7, 2015 23:24 IST

ग्रंथ महोत्सवास प्रारंभ : सांगलीत ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

सांगली : वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने प्रत्येकाने वाचन करणे आवश्यक आहे. आयुष्य घडविण्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड आत्मसात केली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर यांनी केले. माध्यमिक शिक्षण विभाग आणि प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आज, बुधवारी भवाळकर बोलत होत्या. सकाळी जिल्हा परिषदेपासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यामध्ये शांतिनिकेतन विद्यापीठ व अन्य शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दिंडीच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी लेझीमच्या साथीने ताल धरला होता. ग्रंथ महोत्सवानिमित्त शांतिनिकेतन विद्यापीठात तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भवाळकर म्हणाल्या की, विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात. वाचनाचे वातावरण निर्माण होण्यासाठी शिक्षक व पालकांनी स्वत: वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक शालेय वर्गासाठी स्वतंत्रपणे ग्रंथपेटीचा उपक्रम राबविला पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ ग्रंथ वाचा असे न सांगता, त्यावर विचार करा, शंका असल्यास त्यांचे निरसन करा, असे सांगितले पाहिजे. लेखिका इंदुमती जोंधळे म्हणाल्या की, अभ्यास म्हणजे एक प्रकारचे वाचनच आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना नेमून दिलेली पाठ्यपुस्तके समजून घेतली पाहिजेत. त्याचप्रमाणे चांगल्या ग्रंथांचे वाचन करुन त्यावर चिंतन केले पाहिजे. केवळ पुस्तकी वाचन करुन उपयोग नाही, तर आजूबाजूचा परिसर, आपल्याला भेटणारी माणसेदेखील वाचायला शिकले पाहिजे. यावेळी जोंधळे यांनी त्यांना लहानपणी आलेले दाहक अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन यांनी, पुस्तके आपल्याला विवेकशील बनवित असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावावी, असे आवाहन केले. माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर यादव यांनी, बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांची वाचनशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘ई-बुक्स’ वाचण्यासाठी प्रवृत्त करावे, असे मत मांडले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, शिक्षणाधिकारी (निरंतर) नीशादेवी वाघमोडे, बांधकाम आणि आरोग्य सभापती गजानन कोठावळे, ‘शांतिनिकेतन’चे गौतम पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)वेळेचे नियोजन नाही कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याने व लांबत गेल्याने सर्व विद्यार्थी कंटाळले होते. पुढील परिसंवादासाठी नियोजित वेळेत आलेल्या मान्यवरांना दोन तासांहून अधिक वेळ श्रोत्यांमध्ये थांबावे लागल्याचे लक्षात येताच भवाळकर यांनी,‘संयोजकांनी वेळेचे नियोजन व्यवस्थित न केल्याने ही शिक्षा आपल्या वाट्याला आली आहे’ असे सांगून अवघ्या १० ते १५ मिनिटातच मनोगत आटोपते घेतले.