शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

दर्जेदार साहित्य निर्मितीची गरज

By admin | Updated: December 26, 2014 00:09 IST

साहित्यिकांचे साहित्य जरूर वाचावे. परंतु त्याचे अनुकरण मात्र करू नये.

आळसंद : ग्रामीण भागातील साहित्यिकांनी शहरातील साहित्यिकांचे साहित्य जरूर वाचावे. परंतु त्याचे अनुकरण मात्र करू नये. दर्जेदार साहित्याची निर्मिती करायची असेल, तर साहित्यिकांनी स्वत:ला प्रकट करायला शिकले पाहिजे, असे मत ज्येष्ठ व पुरोगामी विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले.बलवडी (भा., ता. खानापूर) येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळ व मारूती नाना पवार सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात डॉ. साळुंखे बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येक माणसाने आपले वेगळेपण प्रकट केले पाहिजे. जिज्ञासा ही माणसाच्या चांगुलपणाचे वैशिष्ट्य आहे. नवोदित साहित्यिकांनी ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यासाठी माणसांनी साहित्य वाचले पाहिजे. या परिसराने जगण्याची प्रेरणा दिली. नवा शब्द शिकणे म्हणजे नवा मित्र जोडणे होय. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तरूणांना दिले, तर नव्या बदलाचा वेध घेण्याचा प्रयत्न ते करतील.संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ग्रामीण साहित्य’ या विषयावरील परिसंवादात प्रा. बाबूराव गुरव म्हणाले की, शेती पाण्याच्या प्रश्नावर दहापेक्षा ज्यादा कादंबऱ्या वाचावयास मिळत नाहीत, ही शोकांतिका असून, साहित्यिकांनी पाणीप्रश्नाबाबत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वेदना हा कलेचा आत्मा असून कलावंताकडे एक्स-रेसारखी नजर असली पाहिजे. शेतकऱ्याच्या हृदयात हात घालून साहित्य लिहिण्यासाठी ग्रामीण भागातील साहित्य संमेलनातून मोठे साहित्यिक निर्माण व्हावेत.अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली. कविसंमेलनाचे अध्यक्षपद सौ. नंदिनी साळुंखे-पाटील यांनी भूषविले. सतीश लोखंडे यांनी प्रास्ताविक केले, तर दीपक पवार यांनी आभार मानले. यावेळी भाई संपतराव पवार, सरपंच मनीषा दुपटे, अ‍ॅड. सुभाष पाटील, इंद्रजित देशमुख, अरविंद पत्की, प्रा. शामराव पाटील, उपसरपंच बापूसाहेब पवार, वसंत आपटे, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, रघुराज मेटकरी, रघुनाथ पवार, आनंदराव पाटील, हेमंत पाटील उपस्थित होते. (वार्ताहर) शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडावी‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ग्रामीण साहित्य’ यावरील परिसंवादात प्रा. बाबूराव गुरव म्हणाले की, शेती पाण्याच्या प्रश्नावर दहापेक्षा जास्त कादंबऱ्या वाचावयास मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. साहित्यिकांनी पाणीप्रश्नाबाबत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यांच्या समस्यांना साहित्यातून वाचा फोडण्याची गरज आहे. शेतकऱ्याच्या हृदयात हात घालून साहित्य लिहिण्यासाठी ग्रामीण साहित्य संमेलनातून मोठे साहित्यिक निर्माण व्हावेत.