शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

आत्महत्या रोखण्यासाठी सकारात्मक दिशादर्शनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:25 IST

इस्लामपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. कौटुंबिक, आर्थिक, रोजगार अशा अडचणी असह्य होत ...

इस्लामपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. कौटुंबिक, आर्थिक, रोजगार अशा अडचणी असह्य होत असल्याने समाजातील आत्महत्येचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. या निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी जीवनाकडे सकारात्मकपणे पाहायला हवे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी केले.

येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालायत मानसशास्त्र विभागाने जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त ‘चला आत्महत्या रोखूया व आनंदी जीवन जगूया’ या विषयावर आयोजित पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. नितीन शिंदे, मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. घनश्याम कांबळे उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात तरुण आणि लहान मुले मोबाइलच्या विळख्यात सापडत आहेत. आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे, अशा व्यक्तींना यातून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक दिशादर्शन करणे गरजेचे आहे.

यावेळी डॉ. तेजपाल जगताप, डॉ. विजय माळी, डॉ. स्वाती मोरकळ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो : १२ इस्लामपूर १

ओळ : इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. नितीन शिंदे, डॉ. घनश्याम कांबळे उपस्थित होते.