शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

दिघंचीत नवीन बस स्थानकाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क दिघंची : दिघंची, ता. आटपाडी येथील बस स्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे. या ठिकाणी नवीन बस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

दिघंची : दिघंची, ता. आटपाडी येथील बस स्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे. या ठिकाणी नवीन बस स्थानकाची गरज असल्याने ते बांधावे, अशी मागणी ग्रामस्थांसह व्यापारीवर्गातून होत आहे.

दिघंची हे गाव सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. आटपाडी तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. दिघंचीमधून दिघंची-हेरवाड व मल्हारपेठ-पंढरपूर हे दोन राज्यमार्ग जात असून या मार्गांचे काम पूर्णत्वाकडे आहे. दिघंचीत नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.

दिघंचीमधून मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद, परभणी, जालना, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, गुहागर, चिपळूण आदी लांब पल्ल्याच्या एसटी बस अधिक प्रमाणात जात आहेत. प्रवासी संख्या जास्त असते. दिघंचीत हायस्कूल व कॉलेज असल्याने शालेय विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. या विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी १२ किलोमीटर आटपाडीला हेलपाटे मारावे लागतात.

दिघंचीपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना एकमेव व जवळचा मार्ग आहे. त्यामुळे भाविकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असते, बस स्थानकाविना त्यांची गैरसोय होत आहे.

सध्या हे बस स्थानक मोडकळीस आले असून नेतेमंडळी व एसटी महामंडळ अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. दिघंचीत सुसज्ज बसस्थानक व्हावे व एसटी पार्सलची व शालेय विद्यार्थ्यांना पासची सोय करावी, अशी मागणी दिघंचीकरांमधून होत आहे.

चौकट

दिघंचीतील बस स्थानकाची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यामुळे बसस्थानकाची नवीन इमारत करण्याची गरज आहे. यासाठी आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे, अशी माहिती सरपंच अमोल मोरे यांनी दिली.