शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

दिघंचीत नवीन बस स्थानकाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क दिघंची : दिघंची, ता. आटपाडी येथील बस स्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे. या ठिकाणी नवीन बस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

दिघंची : दिघंची, ता. आटपाडी येथील बस स्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे. या ठिकाणी नवीन बस स्थानकाची गरज असल्याने ते बांधावे, अशी मागणी ग्रामस्थांसह व्यापारीवर्गातून होत आहे.

दिघंची हे गाव सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. आटपाडी तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. दिघंचीमधून दिघंची-हेरवाड व मल्हारपेठ-पंढरपूर हे दोन राज्यमार्ग जात असून या मार्गांचे काम पूर्णत्वाकडे आहे. दिघंचीत नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.

दिघंचीमधून मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद, परभणी, जालना, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, गुहागर, चिपळूण आदी लांब पल्ल्याच्या एसटी बस अधिक प्रमाणात जात आहेत. प्रवासी संख्या जास्त असते. दिघंचीत हायस्कूल व कॉलेज असल्याने शालेय विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. या विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी १२ किलोमीटर आटपाडीला हेलपाटे मारावे लागतात.

दिघंचीपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना एकमेव व जवळचा मार्ग आहे. त्यामुळे भाविकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असते, बस स्थानकाविना त्यांची गैरसोय होत आहे.

सध्या हे बस स्थानक मोडकळीस आले असून नेतेमंडळी व एसटी महामंडळ अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. दिघंचीत सुसज्ज बसस्थानक व्हावे व एसटी पार्सलची व शालेय विद्यार्थ्यांना पासची सोय करावी, अशी मागणी दिघंचीकरांमधून होत आहे.

चौकट

दिघंचीतील बस स्थानकाची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यामुळे बसस्थानकाची नवीन इमारत करण्याची गरज आहे. यासाठी आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे, अशी माहिती सरपंच अमोल मोरे यांनी दिली.