शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सोनहिरा खोऱ्यातील आठ पुलांची उंची वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कडेगाव तालुक्‍याच्या सोनहिरा खोऱ्यातील प्रमुख रस्त्यांवरील आठ पुलांवर दरवर्षी पुराचे पाणी येते आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : कडेगाव तालुक्‍याच्या सोनहिरा खोऱ्यातील प्रमुख रस्त्यांवरील आठ पुलांवर दरवर्षी पुराचे पाणी येते आणि वाहतूक ठप्प होते. त्यामुळे या पुलांची उंची वाढविण्याची गरज व्यक्त हाेत आहे.

सोनहिरा खोऱ्याची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. पश्‍चिमेकडून सोनहिरा ओढ्यासह अन्य ओढे, ओघळी, नाले पूर्वेकडे वाहतात. हे सर्व प्रवाह सोनहिरा ओढ्याला मिळतात आणि सोनहिरा खोऱ्यातून पूर्वेकडे असलेल्या येरळा नदीला रामापूर हद्दीत मिळतात. या खोऱ्यातील चिंचणी येथे १५७ दशलक्ष घनफूट क्षमतेचा तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव तुडुंब भरतो. संततधार मोठा पाऊस किंवा अतिवृष्टी झाली की या तलावाचे ५ ते ६ स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होतो. यामुळे सोनहिरा खोऱ्यातील चिंचणी-वाजेगाव, चिंचणी-आसद, चिंचणी-मोहित्यांचे वडगाव, अंबक-मोहित्यांचे वडगाव, देवराष्ट्रे -अंबक, देवराष्ट्रे-शिरगाव सोनहिरा ओढ्यावरील या सहा पुलांसह चिंचणी-सोनकिरे रस्त्यावरील बेलगंगा ओढ्यावरील पूल आणि येरळा नदीवरील रामापूर-कामळापूर पूल अशा आठ पुलांवर पुराचे पाणी येते. यामुळे या पुलांची उंची वाढविण्याची गरज आहे.

पश्‍चिम भागातून जाणाऱ्या प्रत्येक ओढ्यावर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यात आली आहे. या खोऱ्यात ताकारी योजनेचे पाणी आल्यापासून हरितक्रांती झाली आहे. मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येकवर्षी पाऊस जास्त पडतो. पाऊस व तलावातून होणाऱ्या विसर्गामुळे हे सर्व कमी उंचीचे पूल पाण्याखाली जातात. या पुलांवर पाणी असताना दुचाकीवरून जाण्याचे धाडस करणाऱ्या काही वाहनधारकांना येथे प्राण गमवावे लागले आहेत.

चौकट :

राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडून अपेक्षा

माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सर्वांगीण विकासाची कामे करून सोनहिरा खोरा सुजलाम सुफलाम केला. आता या कामातील काही राहिलेल्या उणिवा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दूर काराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

फोटो : २८ कडेगाव १

ओळ : कडेगाव तालुक्यात सोनहिरा खोऱ्यातील अत्यंत कमी उंचीच्या आसद-चिंचणी पुलावरून वाहत असलेले पुराचे पाणी.