शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

इस्लामपुरात विकास आघाडीपुढे राष्ट्रवादीचे तगडे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:28 IST

लोगो - नगरपालिका इमारत लोकमत न्यूज नेटवर्क/युनूस शेख इस्लामपूर : नगरपालिकेतील ३१ वर्षांच्या सत्तेविरोधातील नाराजीचा फायदा उठवत साडेचार वर्षांपूर्वी ...

लोगो - नगरपालिका इमारत

लोकमत न्यूज नेटवर्क/युनूस शेख

इस्लामपूर : नगरपालिकेतील ३१ वर्षांच्या सत्तेविरोधातील नाराजीचा फायदा उठवत साडेचार वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या विकास आघाडीपुढे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी टक्कर देऊन सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान आहे, तर सत्ता परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याने येत्या निवडणुकीत टोकाचा राजकीय संघर्ष होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. गेल्या निवडणुकीत १४ प्रभागांमधून २८ नगरसेवक निवडून आले. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विकास आघाडीच्या निशिकांत पाटील यांनी दिवंगत विजयभाऊ पाटील यांच्यावर मात केली होती. विकास आघाडीचे १३ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक आणि एका अपक्षाने पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ १५ झाले. त्यामुळे शिक्षण समिती वगळता इतर सर्व समित्यांवर त्यांचे वर्चस्व राहिले.

आता शहरात २८ प्रभाग होणार आहेत. प्रभाग रचनेत आणखी दोन-तीन प्रभागांची नव्याने भर पडण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत ५३ हजार ६४२ मतदारसंख्या होती. ती आता ५९ हजारांवर गेली आहे.

विकास आघाडीमध्ये नेत्यांची संख्या आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या असल्याने एकसंघता राहील का, याची शंका आहे. गेल्या निवडणुकीत नानासाहेब महाडिक, शिवाजीराव नाईक, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी विकास आघाडीची भक्कम मोट बांधली होती. राज्यातील तत्कालीन युती सरकारची ताकदही त्यांना मिळाली होती. मात्र आता सत्तेचे राजकारण बदलले आहे.

आघाडीतील राहुल आणि सम्राट महाडिक गटाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची मागणी केली आहे. आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील मात्र विकास आघाडीच्या माध्यमातून लढण्यास अनुकूल आहेत. विकास आघाडीतील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांच्या गटाचे पाच सदस्य आहेत. आ. खोत आणि महाडिक गटाची जवळीक असल्याने आघाडीतील इतर घटक काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी खोत-महाडिक गटाचे वैमनस्य आहे.

राष्ट्रवादीला नगरपालिकेच्या सत्ता कामाचा दांडगा अनुभव आहे. जयंत पाटील यांच्यासारखे खमके नेतृत्व त्यांच्याकडे आहे. या वेळी ते ताकदीने निवडणूक खेळतील यामध्ये शंका नाही. राष्ट्रवादीलाही अंतर्गत कलहाची भीती आहे.

पालिकेला १५८ वर्षांची परंपरा आहे. घरपट्टी, पाणीपट्टी, नाट्यगृह, बहुउद्देशीय सभागृह, व्यापारी गाळे पालिकेच्या आर्थिक मिळकतीचे स्रोत आहेत. पालिकेचे वार्षिक उत्पन्न अंदाजे २० कोटी रुपये आहे.

चौकट

मोठ्या योजनांचे गाजर

भुयारी गटार, २४ बाय ७ पाणी योजना अशा मोठ्या योजनांचे गाजर दाखवत राष्ट्रवादीने १५ वर्षे सत्ता मिळविली होती. मात्र विकास आघाडीने सत्तेवर येताच भुयारी गटारसारख्या आव्हानात्मक कामाची सुरुवात केली आहे. सत्तेतील कुरबुरी आणि कोरोनाचे संकट यामुळे विकास आघाडीला भरीव काम करण्याची संधी मिळालेली नाही.