शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मदनभाऊंच्या बंगल्याजवळून राष्ट्रवादीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:14 IST

सांगली : माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या सांगली-मिरज रस्त्यावरील विजय बंगल्याशेजारूनच राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार आहे. राष्ट्रवादी जिल्हा परिषदेसमोरील पक्षकार्यालयाऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विजय बंगल्यासमोरील आरआयटीतून निवडणुकीच्या हालचाली करणार आहे. तशी घोषणा सोमवारी शहर पदाधिकाऱ्यांनी केली.आमदार जयंत पाटील व मदनभाऊ पाटील यांच्यातील राजकीय सख्य संपूर्ण जिल्ह्याला माहीत ...

सांगली : माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या सांगली-मिरज रस्त्यावरील विजय बंगल्याशेजारूनच राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार आहे. राष्ट्रवादी जिल्हा परिषदेसमोरील पक्षकार्यालयाऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विजय बंगल्यासमोरील आरआयटीतून निवडणुकीच्या हालचाली करणार आहे. तशी घोषणा सोमवारी शहर पदाधिकाऱ्यांनी केली.आमदार जयंत पाटील व मदनभाऊ पाटील यांच्यातील राजकीय सख्य संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. मदनभाऊ हयात असताना लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत जयंत पाटील यांच्याशी संघर्ष झाला होता. कधीकाळी दोघेही राष्ट्रवादीत होते. तरीही त्यांच्यात सुप्त संघर्ष होता. मदनभाऊंच्या नेतृत्वाखाली महापालिका जिंकण्यासाठी २००८ मध्ये जयंतरावांनी भाजप, जनता दल यांची महाआघाडी स्थापन केली होती. २०१३ मध्ये मदनभाऊंनी जयंतरावांना धोबीपछाड देत महापालिकेची सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जयंतरावांच्या खेळींनी मदनभाऊंना गारद केले. पण या निवडणुकीनंतर मात्र जयंतराव व मदनभाऊंमध्ये मनोमीलनाचे वारे वाहू लागले. जिल्हा बँक, मार्केट कमिटीच्या निवडणुका दोघांनीही एकत्रित लढल्या. सांगली-मिरज रस्त्यावरील विजय बंगल्यातूनच मदनभाऊंच्या राजकीय खेळ्या सुरू असायच्या. त्याशेजारीच जयंत पाटील यांच्या आरआयटीचे प्रशिक्षण केंद्र होते. विजय बंगल्याच्या पूर्व बाजूला असलेली जागाही काही वर्षापूर्वी जयंतरावांनी खरेदी केली आहे. या जागेत जयंतराव निवासस्थान बांधणार असल्याची चर्चा होती. पण अजून तरी तिथे काहीच बांधकाम झालेले नाही. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. विजय बंगल्यावर काँग्रेसचे कार्यकर्ते व इच्छुक गर्दी करू लागले आहेत. जयश्रीताई पाटील यांच्याकडे उमेदवारीसाठी साकडे घातले जात आहे. राष्ट्रवादीच्या हालचालीही विजय बंगल्याशेजारीच होणार आहेत.शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे यांनी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे कार्यालय आरआयटीच्या इमारतीत हलविल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीकडून इच्छुकांचे अर्ज याच कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. जिल्हा कार्यालयात पक्षाच्या जिल्हा व तालुकास्तरीय बैठका असतात. त्यांना अडचण होऊ नये, यासाठी कार्यालय तात्पुरते स्थलांतरित केले आहे.आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडे!राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यास १७ मेपासून सुरूवात होत आहे. सर्वसाधारण पुरूषासाठी एक हजार, महिलांसाठी पाचशे, तर मागासवर्गीय महिलांसाठी तीनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शहराच्या विकासासाठी स्वच्छ व चारित्र्यवान अराजकीय व्यक्तींनीही राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी करावी, त्यांच्या अर्जाचाही पक्ष निश्चित विचार करेल, असे बजाज व पाटील यांनी सांगितले. समविचारी पक्षांशी आघाडीबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची तयारीही केल्याचे ते म्हणाले.विशाल पाटील बेदखलकाँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. याबाबत विचारता बजाज, जगदाळे म्हणाले की, विशाल पाटील यांच्या भूमिकेबाबत त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी उत्तर दिले आहे. मुलाच्या चुकीबद्दल वडिलांनी धोपाटा घातल्यानंतर, त्यावर आपण काय बोलणार?, असे उदाहरण देत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.