शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

मदनभाऊंच्या बंगल्याजवळून राष्ट्रवादीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:14 IST

सांगली : माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या सांगली-मिरज रस्त्यावरील विजय बंगल्याशेजारूनच राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार आहे. राष्ट्रवादी जिल्हा परिषदेसमोरील पक्षकार्यालयाऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विजय बंगल्यासमोरील आरआयटीतून निवडणुकीच्या हालचाली करणार आहे. तशी घोषणा सोमवारी शहर पदाधिकाऱ्यांनी केली.आमदार जयंत पाटील व मदनभाऊ पाटील यांच्यातील राजकीय सख्य संपूर्ण जिल्ह्याला माहीत ...

सांगली : माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या सांगली-मिरज रस्त्यावरील विजय बंगल्याशेजारूनच राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार आहे. राष्ट्रवादी जिल्हा परिषदेसमोरील पक्षकार्यालयाऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विजय बंगल्यासमोरील आरआयटीतून निवडणुकीच्या हालचाली करणार आहे. तशी घोषणा सोमवारी शहर पदाधिकाऱ्यांनी केली.आमदार जयंत पाटील व मदनभाऊ पाटील यांच्यातील राजकीय सख्य संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. मदनभाऊ हयात असताना लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत जयंत पाटील यांच्याशी संघर्ष झाला होता. कधीकाळी दोघेही राष्ट्रवादीत होते. तरीही त्यांच्यात सुप्त संघर्ष होता. मदनभाऊंच्या नेतृत्वाखाली महापालिका जिंकण्यासाठी २००८ मध्ये जयंतरावांनी भाजप, जनता दल यांची महाआघाडी स्थापन केली होती. २०१३ मध्ये मदनभाऊंनी जयंतरावांना धोबीपछाड देत महापालिकेची सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जयंतरावांच्या खेळींनी मदनभाऊंना गारद केले. पण या निवडणुकीनंतर मात्र जयंतराव व मदनभाऊंमध्ये मनोमीलनाचे वारे वाहू लागले. जिल्हा बँक, मार्केट कमिटीच्या निवडणुका दोघांनीही एकत्रित लढल्या. सांगली-मिरज रस्त्यावरील विजय बंगल्यातूनच मदनभाऊंच्या राजकीय खेळ्या सुरू असायच्या. त्याशेजारीच जयंत पाटील यांच्या आरआयटीचे प्रशिक्षण केंद्र होते. विजय बंगल्याच्या पूर्व बाजूला असलेली जागाही काही वर्षापूर्वी जयंतरावांनी खरेदी केली आहे. या जागेत जयंतराव निवासस्थान बांधणार असल्याची चर्चा होती. पण अजून तरी तिथे काहीच बांधकाम झालेले नाही. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. विजय बंगल्यावर काँग्रेसचे कार्यकर्ते व इच्छुक गर्दी करू लागले आहेत. जयश्रीताई पाटील यांच्याकडे उमेदवारीसाठी साकडे घातले जात आहे. राष्ट्रवादीच्या हालचालीही विजय बंगल्याशेजारीच होणार आहेत.शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे यांनी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे कार्यालय आरआयटीच्या इमारतीत हलविल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीकडून इच्छुकांचे अर्ज याच कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. जिल्हा कार्यालयात पक्षाच्या जिल्हा व तालुकास्तरीय बैठका असतात. त्यांना अडचण होऊ नये, यासाठी कार्यालय तात्पुरते स्थलांतरित केले आहे.आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडे!राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यास १७ मेपासून सुरूवात होत आहे. सर्वसाधारण पुरूषासाठी एक हजार, महिलांसाठी पाचशे, तर मागासवर्गीय महिलांसाठी तीनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शहराच्या विकासासाठी स्वच्छ व चारित्र्यवान अराजकीय व्यक्तींनीही राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी करावी, त्यांच्या अर्जाचाही पक्ष निश्चित विचार करेल, असे बजाज व पाटील यांनी सांगितले. समविचारी पक्षांशी आघाडीबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची तयारीही केल्याचे ते म्हणाले.विशाल पाटील बेदखलकाँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. याबाबत विचारता बजाज, जगदाळे म्हणाले की, विशाल पाटील यांच्या भूमिकेबाबत त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी उत्तर दिले आहे. मुलाच्या चुकीबद्दल वडिलांनी धोपाटा घातल्यानंतर, त्यावर आपण काय बोलणार?, असे उदाहरण देत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.