शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

राष्ट्रवादीचे वरातीमागून घोडे

By admin | Updated: August 13, 2014 23:35 IST

गोंधळनामा सुरूच : पक्ष सोडून गेल्यानंतर नोटिसा

सांगली : नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गळती लागलेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा गोंधळनामा सुरूच आहे. राष्ट्रवादीला रामराम ठोकून अन्य पक्षात अधिकृतरित्या प्रवेश करणाऱ्यांना राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांमार्फत नोटिसा बजावल्या जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे घोडे सध्या वरातीमागून धावताना दिसत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीला पक्षीय इतिहासातील सर्वात मोठी गळती लागली आहे. गेल्या दोन वर्षात अर्धा डझन नेत्यांची पक्षातून गच्छंती झाली. माजी महापौर इद्रिस नायकवडी, खासदार संजय पाटील, जतचे विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने अशी यादी आता लांबतच चालली आहे. यातील इद्रिस नायकवडी, विलासराव जगताप यांची पक्षाने एका नोटिसीनंतर हकालपट्टी केली. इतर नेत्यांबाबत वेगळीच प्रक्रिया राबविण्यात आली. संजय पाटील यांना नोटीस बजावण्यात आली, पण नोटिसीला उत्तर देण्यापूर्वीच ते भाजपमध्ये दाखल झाले होते. शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनी भाजपच्या मिरवणुकीत सहभाग घेतल्यानंतरही त्यांना कोणतीही नोटीस पक्षाने बजावली नाही. घोरपडेंनाही भाजपशी संगत केली म्हणून आजवर कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. ही राष्ट्रवादीची राजकीय अगतिकता आहे.प्रत्येकाला वेगवेगळे नियम लावल्यामुळे राष्ट्रवादीच्या नियमावलीचाही गोंधळ दिसून येतो. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही नुकत्याच झालेल्या निर्धार मेळाव्यात पक्षातून बाहेर पडण्याच्या वाटेवर असलेल्या नेत्यांबद्दल संताप व्यक्त केला. अशा लोकांनी लवकरात लवकर पक्ष सोडावा, असा सल्ला पाटील यांनी दिला. त्यानंतर घोरपडेंनी त्यांच्या या सल्ल्याची खिल्ली उडविताना, आम्ही कधीच पक्ष सोडला आहे, हवी तर हकालपट्टी करा, असे सांगून टाकले. बाबर आणि भीमराव माने यांनी या गोष्टी सांगण्याचीही गरज नाही, कारण त्यांनी पक्ष केव्हाचाच सोडलेला आहे. तरीही जिल्हाध्यक्षांनी आता त्यांना नोटीस बजावली आहे. वरातीमागून चालणारे राष्ट्रवादीचे घोडे विधानसभेच्या मैदानात काय करणार?, असा सवाल आता कार्यकर्तेच उपस्थित करू लागले आहेत. (प्रतिनिधी)उशिराची सोडचिठ्ठीअनिल बाबर आणि भीमराव माने यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दुसरा विवाह झाल्यानंतर आता पहिल्या विवाहासाठी सोडचिठ्ठीची नोटीस बजावण्यात आल्यासारखा हा प्रकार आहे! पक्षप्रवेशानंतर या नोटिसांना काय अर्थ आहे, असा सवाल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.