शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
7
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
8
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
9
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
10
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
11
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
12
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
13
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
14
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
15
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
16
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
17
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
18
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
19
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
20
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यालय धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:25 IST

सांगली : राजारामबापू तंत्रशिक्षण संस्थेच्या वसंत कॉलनीतील इमारतीत राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांचा राबता वाढल्याने पक्षाचे जिल्हा परिषदेसमोरील जिल्हा कार्यालय धूळखात ...

सांगली : राजारामबापू तंत्रशिक्षण संस्थेच्या वसंत कॉलनीतील इमारतीत राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांचा राबता वाढल्याने पक्षाचे जिल्हा परिषदेसमोरील जिल्हा कार्यालय धूळखात पडले आहे. आरआयटीच्या इमारतीलाच आता राष्ट्रवादीचे कार्यालय म्हणून संबोधले जात असून त्याठिकाणीच पक्षाच्या बैठका, कार्यक्रम, सत्कार सोहळे होत आहेत.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर मदन पाटील यांनी पक्षाचे जिल्हा कार्यालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला. जलसंपदामंत्री जयंत पाटील व दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनाही ही जागा आवडली. जिल्हा परिषदेच्या समोरच कार्यालय असल्याने ही जागा घेण्याचे नियोजन झाले. पक्षाच्या नावावर जागा खरेदी करण्यात आली. महापालिका क्षेत्रासह जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकाही याठिकाणी होत होत्या. अनेक निवडणुकांचे साक्षीदार असलेले हे कार्यालय आता इतिहासाच्या पाऊलखुणा जपत धूळ खात पडले आहे.

वसंत कॉलनीत जयंत पाटील यांच्या तंत्रशिक्षण संस्थेच्या जागेत आता पक्षीय बैठका, कार्यक्रम होऊ लागले आहेत. जयंत पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकारीही याचठिकाणी बैठका घेतात. त्यामुळे जिल्हा कार्यालय ओस पडले आहे. जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, सचिव यांचे केबिन्स्, मिटिंग हॉल यांना आता कार्यकर्त्यांची प्रतीक्षा करावी लागते. केवळ फलकापुंरते अस्तित्व उरले असून वसंत कॉलनीतील इमारतीलाही राष्ट्रवादी कार्यालयाचा फलक लावला आहे. जयंत पाटील यांचा आता पक्षात एकछत्री अंमल असल्यामुळे त्यांच्याच संस्थेची सांगलीतील इमारत पक्षीय राजकारणाचे केंद्र बनली आहे. यापूर्वी कोणत्याही निवडणुकीतील विजयाचा गुलाल राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यालयाला लागत होता, आता तो नव्या इमारतीला लागत आहे.

चौकट

वसंत कॉलनी पुन्हा केंद्रस्थानी

गेली कित्येक वर्षे मदन पाटील यांच्या माध्यमातून सांगलीतील वसंत कॉलनी राजकीय हालचालींच्या केंद्रस्थानी होती. त्यांच्या निधनानंतर वसंत कॉलनीतील राजकीय हालचाली शांत झाल्या. आता याच कॉलनीतील जयंत पाटील यांच्या संस्थेत राष्ट्रवादीचे कार्यालय सुरू झाल्याने ही कॉलनी पुन्हा राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू बनली आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचीही घरे याच कॉलनीत असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा येथे राबता असतो.