शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

जिल्ह्यात राष्ट्रवादीला हव्यात पाच जागा

By admin | Updated: June 17, 2014 00:45 IST

जिल्हाध्यक्षांचे मत : इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर, जत, शिराळ्यावर दावा

सांगली : काँग्रेस आघाडीअंतर्गत राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी राज्यात जादा जागांची मागणी होत असतानाच, जिल्ह्यातही राष्ट्रवादीने पाच जागांवर दावा केला आहे. गत विधानसभा निवडणुकीत चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या होत्या. यंदा खानापूर-आटपाडी विधानसभेची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. दुसरीकडे जिल्हा काँग्रेसने सर्वच जागांवर लढण्याचा ठराव करून पक्षाकडे पाठविल्याने जिल्ह्यातही जागावाटपावरून आघाडीअंतर्गत मतभेद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. गत विधानसभा निवडणुकीत दोन ठिकाणी काँग्रेस, तीन ठिकाणी राष्ट्रवादी, तर तीन जागी भाजपला यश मिळाले. काँग्रेसला केवळ पलूस-कडेगाव आणि खानापूर-आटपाडीच्या जागेवर यश मिळाले. सांगली व मिरजेची जागा भाजपने हस्तगत केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या घटलेल्या ताकदीचे कारण देऊन राष्ट्रवादी जादा जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. तासगाव-कवठेमहांकाळमधून गृहमंत्री आर. आर. पाटील, इस्लामपूर मतदार संघातून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, तर शिराळ्यातून मानसिंगराव नाईक यांनी विजय मिळविला होता. या तीन हक्काच्या जागांसह जत व खानापूर-आटपाडीचीही मागणी राष्ट्रवादीकडून होत आहे. जतमध्ये गतवेळी विलासराव जगतापांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. जगतापांची पक्षातून हकालपट्टी झाली असली तरी, या जागेवर राष्ट्रवादीचाच दावा आहे. खानापूर-आटपाडीतून काँग्रेसचे सदाशिवराव पाटील विजयी झाले असले तरी, हा मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा आहे. या मतदारसंघात राजेंद्रअण्णा देशमुख, अनिल बाबर यांच्यासह अन्य राष्ट्रवादी नेतेही इच्छुक आहेत.आघाडीचा निर्णय झाला तर या दावेदारीवर विचार होणार आहे. राष्ट्रवादीने पाच जागांच्या मागणीची तयारी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी सर्वच जागांवर दावा करून स्वबळाच्या मुद्यास बळ दिले आहे.