शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात राष्ट्रवादीला हव्यात पाच जागा

By admin | Updated: June 17, 2014 00:45 IST

जिल्हाध्यक्षांचे मत : इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर, जत, शिराळ्यावर दावा

सांगली : काँग्रेस आघाडीअंतर्गत राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी राज्यात जादा जागांची मागणी होत असतानाच, जिल्ह्यातही राष्ट्रवादीने पाच जागांवर दावा केला आहे. गत विधानसभा निवडणुकीत चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या होत्या. यंदा खानापूर-आटपाडी विधानसभेची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. दुसरीकडे जिल्हा काँग्रेसने सर्वच जागांवर लढण्याचा ठराव करून पक्षाकडे पाठविल्याने जिल्ह्यातही जागावाटपावरून आघाडीअंतर्गत मतभेद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. गत विधानसभा निवडणुकीत दोन ठिकाणी काँग्रेस, तीन ठिकाणी राष्ट्रवादी, तर तीन जागी भाजपला यश मिळाले. काँग्रेसला केवळ पलूस-कडेगाव आणि खानापूर-आटपाडीच्या जागेवर यश मिळाले. सांगली व मिरजेची जागा भाजपने हस्तगत केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या घटलेल्या ताकदीचे कारण देऊन राष्ट्रवादी जादा जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. तासगाव-कवठेमहांकाळमधून गृहमंत्री आर. आर. पाटील, इस्लामपूर मतदार संघातून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, तर शिराळ्यातून मानसिंगराव नाईक यांनी विजय मिळविला होता. या तीन हक्काच्या जागांसह जत व खानापूर-आटपाडीचीही मागणी राष्ट्रवादीकडून होत आहे. जतमध्ये गतवेळी विलासराव जगतापांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. जगतापांची पक्षातून हकालपट्टी झाली असली तरी, या जागेवर राष्ट्रवादीचाच दावा आहे. खानापूर-आटपाडीतून काँग्रेसचे सदाशिवराव पाटील विजयी झाले असले तरी, हा मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा आहे. या मतदारसंघात राजेंद्रअण्णा देशमुख, अनिल बाबर यांच्यासह अन्य राष्ट्रवादी नेतेही इच्छुक आहेत.आघाडीचा निर्णय झाला तर या दावेदारीवर विचार होणार आहे. राष्ट्रवादीने पाच जागांच्या मागणीची तयारी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी सर्वच जागांवर दावा करून स्वबळाच्या मुद्यास बळ दिले आहे.