शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

जिल्ह्यात राष्ट्रवादीला हव्यात पाच जागा

By admin | Updated: June 17, 2014 00:45 IST

जिल्हाध्यक्षांचे मत : इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर, जत, शिराळ्यावर दावा

सांगली : काँग्रेस आघाडीअंतर्गत राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी राज्यात जादा जागांची मागणी होत असतानाच, जिल्ह्यातही राष्ट्रवादीने पाच जागांवर दावा केला आहे. गत विधानसभा निवडणुकीत चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या होत्या. यंदा खानापूर-आटपाडी विधानसभेची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. दुसरीकडे जिल्हा काँग्रेसने सर्वच जागांवर लढण्याचा ठराव करून पक्षाकडे पाठविल्याने जिल्ह्यातही जागावाटपावरून आघाडीअंतर्गत मतभेद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. गत विधानसभा निवडणुकीत दोन ठिकाणी काँग्रेस, तीन ठिकाणी राष्ट्रवादी, तर तीन जागी भाजपला यश मिळाले. काँग्रेसला केवळ पलूस-कडेगाव आणि खानापूर-आटपाडीच्या जागेवर यश मिळाले. सांगली व मिरजेची जागा भाजपने हस्तगत केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या घटलेल्या ताकदीचे कारण देऊन राष्ट्रवादी जादा जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. तासगाव-कवठेमहांकाळमधून गृहमंत्री आर. आर. पाटील, इस्लामपूर मतदार संघातून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, तर शिराळ्यातून मानसिंगराव नाईक यांनी विजय मिळविला होता. या तीन हक्काच्या जागांसह जत व खानापूर-आटपाडीचीही मागणी राष्ट्रवादीकडून होत आहे. जतमध्ये गतवेळी विलासराव जगतापांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. जगतापांची पक्षातून हकालपट्टी झाली असली तरी, या जागेवर राष्ट्रवादीचाच दावा आहे. खानापूर-आटपाडीतून काँग्रेसचे सदाशिवराव पाटील विजयी झाले असले तरी, हा मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा आहे. या मतदारसंघात राजेंद्रअण्णा देशमुख, अनिल बाबर यांच्यासह अन्य राष्ट्रवादी नेतेही इच्छुक आहेत.आघाडीचा निर्णय झाला तर या दावेदारीवर विचार होणार आहे. राष्ट्रवादीने पाच जागांच्या मागणीची तयारी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी सर्वच जागांवर दावा करून स्वबळाच्या मुद्यास बळ दिले आहे.