शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

भाजपच्या बहिष्कारावर राष्ट्रवादी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:25 IST

सांगली : जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमास पालकमंत्री जयंत पाटील यांना बोलावून तुम्हीच कार्यक्रमावर बहिष्कार घालून अपमान केला आहे. याबद्दल जि. ...

सांगली : जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमास पालकमंत्री जयंत पाटील यांना बोलावून तुम्हीच कार्यक्रमावर बहिष्कार घालून अपमान केला आहे. याबद्दल जि. प. अध्यक्षांनी माफी मागावी, अशी राष्ट्रवादी सदस्यांनी आक्रमक मागणी केली. तुम्ही माफी मागितली नाही तर जिल्हा परिषदेचा करेक्ट कार्यक्रम होईल, असा इशाराही राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दिला. यावर अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी माझ्या कुटुंबात दु:खद घटना घडल्यामुळे मी येऊ शकले नाही. मी साहेबांशी याबाबत बोलून खुलासा करते, असे स्पष्टीकरण दिले.

जिल्हा परिषदेने मंगळवारी घेतलेल्या आरोग्य विभाग आणि सरपंच कार्यशाळेसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांना रीतसर निमंत्रण दिले होते. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष यांसह भाजपा सभापतींनी बहिष्कार टाकला होता. या विषयावरुन राष्ट्रवादीने आक्रमक होत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले.

याबाबत संभाजी कचरे म्हणाले, पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनमधून सर्व सदस्यांना समान निधी दिला आहे. असे असताना त्यांच्या कार्यक्रमाला पदाधिकारी अनुपस्थित राहिले. ही बाब निंदनीय आहे. आपण बोलावून पुन्हा गैरहजर राहणे त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे आगामी निधीवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी पालकमंत्र्यांची दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली.

शरद लाड, संजय पाटील, संजीवकुमार पाटील, सतीश पवार यांनी कचरे यांना साथ देत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर प्राजक्ता कोरे यांनी मला पालकमंत्र्यांचा अपमान करायचा नव्हता. कुटुंबात दुःखाची घटना घडल्याने मी कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. त्यानंतर माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी अध्यक्ष कोरे यांना पालकमंत्र्यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. कोरे यांनी त्यास सहमती दिल्याने वादावर पडदा पडला.

चौकट

अधिकारी सुपारी घेऊन काम करतायत

पंचायत समितीचे अधिकारी मंत्र्यांची सुपारी घेऊन कामे करीत आहेत, असा आरोप जितेंद्र पाटील यांनी केला. तसेच आम्हीही सरकारमध्ये असल्यामुळे सुपारी बहाद्दर अधिकाऱ्यांचा कारभार चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावर राष्ट्रवादीचे संभाजी कचरे, संजीव पाटील यांनी मर्यादा सोडून पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करु नका, सुपारी घेऊन कोण कामे करते ते जनतेला माहीत आहे. तुमच्या ग्रामपंचायतीने मोठ्या मनाने रस्त्याच्या कामाला एनओसी देण्याची गरज होती, असा टोला जितेंद्र पाटील यांना लगावला.