शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी, स्वाभिमानीची मते फुटली

By admin | Updated: July 31, 2014 23:28 IST

नियोजन समिती निवडणूक : काँग्रेसचे पाचही सदस्य विजयी

सांगली : जिल्हा नियोजन समितीतील महापालिकेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी बाजी मारली. विरोधी राष्ट्रवादी व स्वाभिमानीच्या मतांमध्ये फाटाफूट झाली. स्वाभिमानीने चार गटात काँग्रेसला, तर एका गटात राष्ट्रवादीला साथ दिली. राष्ट्रवादीची दोन ते तीन मते फुटल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. जिल्हा नियोजन समितीत महानगरपालिकेचे पाच सदस्य आहेत. या सदस्यांच्या निवडीसाठी २१ जणांनी अर्ज भरले होते. परंतु अर्ज माघार घेण्याच्यादिवशी १० जणांनी माघार घेतल्याने ११ उमेदवार रिंगणात राहिले. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी पाच, तर स्वाभिमानीच्या एका सदस्याचा अर्ज कायम राहिला. दरम्यान, महानगरपालिकेच्या ७८ नगरसेवकांनी काल मतदानाचा हक्क बजावला होतापालिकेत काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे २५, तर स्वाभिमानीचे ११ सदस्य आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार पवार यांच्या देखरेखीखाली आज गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. खुल्या गटात काँग्रेसचे हारुण शिकलगार यांना ४४, राष्ट्रवादीचे महेंद्र सावंत २४, तर स्वाभिमानीचे जगन्नाथ ठोकळे यांना ८ मते मिळाली. या गटात दोन मते बाद झाली. काँग्रेसला दोन मते जादा मिळाली, तर राष्ट्रवादीचे एक, तर स्वाभिमानीची तीन मते फुटली. महिला गटात काँग्रेसच्या बबिता मेंढे व राष्ट्रवादीच्या आशा शिंदे यांच्या चुरशीची लढत झाली. मेंढे यांना ४२, तर शिंदे यांना ३६ मते मिळाली. मागास प्रवर्गात काँग्रेसच्या किशोर लाटणे यांना ४८, राष्ट्रवादीचे राजू गवळींना २९ मते मिळाली. या गटात काँग्रेसला ६ मते जादा पडली. मागास प्रवर्ग महिला गटात काँग्रेसच्या मृणाल पाटील यांना ५०, तर राष्ट्रवादीच्या प्रियंका बंडगर यांना २८, तर अनुसूचित गटात काँग्रेसच्या अश्विनी कांबळे यांना ५५ व राष्ट्रवादीच्या स्नेहल सावंत यांना २३ मते मिळाली. या दोन्ही गटात स्वाभिमानीने काँग्रेसला साथ दिली. स्वाभिमानीला तीन मतांचा फटका बसला आहे. इतर गटात उमेदवार नसल्याने त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ दिली. (प्रतिनिधी) पाच गटांपैकी चार गटांत काँग्रेसच्या उमेदवारांच्या मतात वाढ झाली असली, तरी सर्वसाधारण महिला गटात मात्र काँग्रेसला संख्याबळाइतकीच मते मिळाली. काँग्रेसमधील एका गटाने राष्ट्रवादीला मदत केल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती, तर स्वाभिमानीने काँग्रेसला साथ दिल्याचे समजते. कमी मताधिक्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती.