शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात मुख्यमंत्र्यांच्या एन्ट्रीने राष्ट्रवादीच रिचार्ज

By admin | Updated: August 14, 2016 00:25 IST

राजकारण रंगले : भाजपचे विक्रम पाटील यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका

अशोक पाटील--इस्लामपूर --मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी प्रथमच इस्लामपुरात ‘एन्ट्री’ केली आणि थेट राजारामबापू साखर कारखाना गाठला. राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांना तास-दोन तास वेळ दिला, मात्र केवळ औपचारिकता म्हणून भाजपचे विक्रम पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ‘कॉलर’ ताठ झाली, तर भाजप आणि घटकपक्षांतील कार्यकर्ते हिरमुसले.वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादीच्या विरोधकांची भूमिका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, आमदार शिवाजीराव नाईक बजावत आहेत. मात्र जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या गडाला जराही तडा जाऊ दिलेला नाही. मोदी लाटेत जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले. भाजपची ताकद वाढली. सत्ता गेली तरीही जयंत पाटील यांची क्रेझ कमी झाली नाही. विधानसभेला शिराळ्यात राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या आघाडीची बिघाडी झाल्यानेच शिवाजीराव नाईक यांना आमदारपदाची संधी मिळाली. भविष्यात पुन्हा आघाडी करून आ. नाईक यांना शह देण्याचा ‘कार्यक्रम’ जयंत पाटील यांनी आखला आहे. नाईक यांना मंत्रीपद मिळाले नाही, यामागे त्यांचाच ‘कार्यक्रम’ असल्याची चर्चा आहे. त्यातच एकेकाळी साखर कारखानदारांविरुद्ध लढणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी आमदार झाल्यावर राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतरच त्यांना राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागली! १९९५ नंतर युती शासनाच्या काळात जयंत पाटील सत्तेपासून दूर होते, मात्र कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर गेले नाहीत. तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी इस्लामपूर शहरात जम बसविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विरोधकांची ताकद वाढत होती. मात्र पुन्हा राज्यात आघाडी-कॉँग्रेसची सत्ता आली आणि जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांना ताकद दिली. त्यानंतर अण्णा डांगे यांनीही राष्ट्रवादीशी घरोबा केल्यामुळे, पाटील यांची मतदार संघासह जिल्ह्यावर पकड मजबूत होत गेली. मोदी लाटेत त्यांचे समर्थक भाजपमध्ये गेले. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद संपुष्टात येते की काय, अशी चर्चा होती. तथापि राष्ट्रवादीचा इस्लामपूर मतदारसंघ अबाधित ठेवण्यात जयंत पाटील यशस्वी झाले आहेत. शिवाय जिल्ह्यातील भाजपच्या ताकदीमागे त्यांचा हात असल्याचा आरोप विरोधक करतात. याची माहिती असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी इस्लामपूर दौऱ्यात कारखान्यावरील राजारामबापूंच्या पुतळ्यास अभिवादन करून उद्योग समूहाची प्रशंसा केली. यामुळे भाजपचे नव्हे, तर याठिकाणचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील भाजपमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नसताना, मोदी लाटेचा साक्षात्कार आणि जयंत पाटील यांची छुपी साथ यामुळे भाजप आमदारांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांचा आदेश मानून दौऱ्याचे नियोजन केले आहे, यात गैर काय?- रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटना