शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

इस्लामपुरात मुख्यमंत्र्यांच्या एन्ट्रीने राष्ट्रवादीच रिचार्ज

By admin | Updated: August 14, 2016 00:25 IST

राजकारण रंगले : भाजपचे विक्रम पाटील यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका

अशोक पाटील--इस्लामपूर --मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी प्रथमच इस्लामपुरात ‘एन्ट्री’ केली आणि थेट राजारामबापू साखर कारखाना गाठला. राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांना तास-दोन तास वेळ दिला, मात्र केवळ औपचारिकता म्हणून भाजपचे विक्रम पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ‘कॉलर’ ताठ झाली, तर भाजप आणि घटकपक्षांतील कार्यकर्ते हिरमुसले.वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादीच्या विरोधकांची भूमिका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, आमदार शिवाजीराव नाईक बजावत आहेत. मात्र जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या गडाला जराही तडा जाऊ दिलेला नाही. मोदी लाटेत जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले. भाजपची ताकद वाढली. सत्ता गेली तरीही जयंत पाटील यांची क्रेझ कमी झाली नाही. विधानसभेला शिराळ्यात राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या आघाडीची बिघाडी झाल्यानेच शिवाजीराव नाईक यांना आमदारपदाची संधी मिळाली. भविष्यात पुन्हा आघाडी करून आ. नाईक यांना शह देण्याचा ‘कार्यक्रम’ जयंत पाटील यांनी आखला आहे. नाईक यांना मंत्रीपद मिळाले नाही, यामागे त्यांचाच ‘कार्यक्रम’ असल्याची चर्चा आहे. त्यातच एकेकाळी साखर कारखानदारांविरुद्ध लढणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी आमदार झाल्यावर राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतरच त्यांना राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागली! १९९५ नंतर युती शासनाच्या काळात जयंत पाटील सत्तेपासून दूर होते, मात्र कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर गेले नाहीत. तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी इस्लामपूर शहरात जम बसविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विरोधकांची ताकद वाढत होती. मात्र पुन्हा राज्यात आघाडी-कॉँग्रेसची सत्ता आली आणि जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांना ताकद दिली. त्यानंतर अण्णा डांगे यांनीही राष्ट्रवादीशी घरोबा केल्यामुळे, पाटील यांची मतदार संघासह जिल्ह्यावर पकड मजबूत होत गेली. मोदी लाटेत त्यांचे समर्थक भाजपमध्ये गेले. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद संपुष्टात येते की काय, अशी चर्चा होती. तथापि राष्ट्रवादीचा इस्लामपूर मतदारसंघ अबाधित ठेवण्यात जयंत पाटील यशस्वी झाले आहेत. शिवाय जिल्ह्यातील भाजपच्या ताकदीमागे त्यांचा हात असल्याचा आरोप विरोधक करतात. याची माहिती असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी इस्लामपूर दौऱ्यात कारखान्यावरील राजारामबापूंच्या पुतळ्यास अभिवादन करून उद्योग समूहाची प्रशंसा केली. यामुळे भाजपचे नव्हे, तर याठिकाणचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील भाजपमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नसताना, मोदी लाटेचा साक्षात्कार आणि जयंत पाटील यांची छुपी साथ यामुळे भाजप आमदारांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांचा आदेश मानून दौऱ्याचे नियोजन केले आहे, यात गैर काय?- रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटना