शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

तासगावात राष्ट्रवादी मौनात की कोमात?

By admin | Updated: October 15, 2015 00:30 IST

नगरसेवकांची सोडचिठ्ठी : नेत्यांची हतबलता

दत्ता पाटील -- तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करुन पक्षाला धक्का दिला आहे. एकेकाळी पालिकेत बहुमतात असलेल्या राष्ट्रवादीचे, आता अस्तित्व शोधण्याची वेळ आली आहे. शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असतानादेखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मौन सोडलेले नाही. भाजपचे कमळ हातात धरणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा बडगाही उगारलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी मौनात आहे की कोमात, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील आबा आणि खा. संजयकाका पाटील यांच्या गटाने एकत्रितपणे तासगाव नगरपालिकेची गतवेळची निवडणूक लढवली होती. त्यात आबा गटाचे वर्चस्व होते. दोन्ही नेते एकत्र असतानादेखील कार्यकर्त्यांत कुरघोडीचे राजकारण सुरूच होते. किंंबहुना खासदार संजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही गटांतील कुरघोड्या वाढल्या. दरम्यान, आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची अवस्था, वर्चस्व असूनदेखील आत्मविश्वास गमावल्यासारखी झाली होती. नगरसेवकांतील वैयक्तिक हेवेदावे आणि अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत खा. संजयकाका पाटील यांनी नाराज नगरसेवकांना गळ लावला. तीन नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देत, त्यापैकी एकाला नगराध्यक्षपदही बहाल केले. पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर राजकीय स्थित्यंतर थांबेल, असे वाटत असतानाच, राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. आयेशा नदाफ यांचे नगरसेवकपद रद्द होऊ नये, यासाठी खासदार संजयकाकांनी खेळी केली. त्यानंतर डॉ. नदाफ यांनीही खासदारांचे नेतृत्व मान्य केले. नगराध्यक्ष बदलासाठी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी राष्ट्रवादीत राहूनच भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. त्यापैकी नगरसेवक जाफर मुजावर यांनाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपवासी केले. आबांच्या पश्चात पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के बसत असताना, पक्षातील नेते मात्र मौन धारण करुन आहेत. पक्षाला अस्तित्व शोधण्याची वेळ आली असताना, नेत्यांचे मौन का, असा सवाल सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत. कवठेमहांकाळ पंचायत समितीत पक्ष सोडणाऱ्या सदस्यांना सदस्यत्व रद्दचा इशारा पक्षाकडून देण्यात आला. मात्र तासगाव पालिकेत भाजपचे कमळ हातात धरणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी नेते हतबल झाले आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादीसोबतचनगरसेवकांनी वैयक्तिक स्वार्थापोटीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. स्वार्थीनी पक्ष सोडल्यामुळे यापुढे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. आ. सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व दाखवून देणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कमलेश तांबवेकर आणि स्वप्नील जाधव यांनी सांगितले.लक्ष कोण घालणार? काही महिन्यांपूर्वी तासगाव-कवठेमहांकाळमध्ये दुसऱ्या नेतृत्वाला लक्ष देण्याची आवश्यकता नसल्याचे वक्तव्य पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. आता कवठेमहांकाळ पंचायत समिती आणि तासगाव नगरपालिका दोन्हीकडे भाजपने धक्का दिला आहे. आता तरी राष्ट्रवादीचे नेते लक्ष घालणार का, याची चर्चा आहे.