शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

‘स्वाभिमानी’चा टक्का राष्ट्रवादी कॉँग्रेसमुळे घसरला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:06 IST

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शेतकऱ्यांच्या ताकदीवर राजकीय पटलावर आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शेतकऱ्यांच्या ताकदीवर राजकीय पटलावर आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी काँग्रेस आघाडीमध्ये सहभागी झाले. मात्र लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघातील वाळवा आणि शिराळा तालुक्यांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्या सलगीमुळे स्वाभिमानीचा टक्का घसरल्याची चर्चा आहे. शेट्टी यांच्याविरोधात सक्रिय असलेली रयत क्रांती संघटनाही लोकसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेली आहे.२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या महाआघाडीत सामील होऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आव्हान दिले होते. त्यानंतर खोत यांना कृषी राज्यमंत्रीपद मिळाले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली. दोघांमधील मतभेद वाढतच गेले. जिल्हा परिषद निवडणुकीत तर या दोघांमध्ये मोठी दरी पडली. यातून खोत यांनी भाजपची शाल पांघरून नव्या रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार शेट्टी हे खोत आणि भाजप सरकारवरील नाराजीतून काँगे्रस महाआघाडीमध्ये सामील झाले. महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेट्टी यांनी निवडणूक लढवली. परंतु हे अनेक शेतकऱ्यांना रूचले नाही. यांनी त्यातल्या त्यात आमदार जयंत पाटील यांच्याशी केलेल्या सलगीवरही सर्वसामान्य शेतकरी संतप्त प्रतिक्रिया देत होते. आता या परिसरातील मतदानाचा टक्का घसरला आहेच आणि याचा थेट फटका ‘स्वाभिमानी’ला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.प्रारंभीच्या टप्प्यात शेट्टी यांच्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजकीय नांगरट केली होती. परंतु भाजप आणि शिवसेनेची युती झाली. जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या धैर्यशील माने यांना शेट्टींविरोधात उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून रयत क्रांती संघटनेच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला. संपूर्ण निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी सदाभाऊ खोत राज्यभर फिरले. मात्र त्यांची वाळव्यातील रयत क्रांती संघटना बॅफूटवरच गेली.