शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

जत राष्ट्रवादीला हव्यात चार जागा

By admin | Updated: June 27, 2015 00:16 IST

सांगली बाजार समिती : जयंत पाटील यांना पदाधिकाऱ्यांचे साकडे

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाशीही युती करा, मात्र जत तालुका राष्ट्रवादीला चार जागा द्या, अशी आग्रही मागणी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते व आ. जयंत पाटील यांच्याकडे केली. यासंदर्भात शुक्रवारी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात बैठकही झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे उपस्थित होते.या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जत तालुकाध्यक्ष बसवराज दोडमणी, चन्नाप्पा होर्तीकर, सिध्दाण्णा शिरसट, महादेव पाटील, राम पाटील, आर. के. पाटील आदी उपस्थित होते. बाजार समितीच्या निवडणुकीत जत तालुक्याचे वर्चस्व आहे. सहकारी संस्थेचे २६६८ पैकी ९९१ मतदार जतचे आहेत. ग्रामपंचायतीच्या २२६८ मतदारांपैकी १००४ जत तालुक्याचे आहेत. एकूण ८२२५ पैकी २१७६ मतदार जत तालुक्यातील आहेत. यामुळे या निवडणुकीत जत तालुक्याचे प्राबल्य राहणार आहे. यामुळे जतच्या राष्ट्रवादीला चार जागा सोडण्यात याव्यात. राष्ट्रवादीने कोणाशीही युती करावी, त्यांच्यासोबत जत तालुका राहणार आहे. मात्र जत तालुक्याला योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी जयंत पाटील यांनी यासंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर इतर पक्षांशीही चर्चा सुरु असून, लवकरच याबाबत निर्णय जाहीर करु असे आश्वासन दिले. विलासराव शिंदे म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपापल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आहेत. राष्ट्रवादीही सर्व पक्षांशी चर्चा करणार आहे. याबाबतचे सर्व अधिकार जयंत पाटील यांना आहेत. इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे कोणताही निर्णय घेण्यास विलंब लागणार आहे. तरीही येत्या दोन दिवसात आपले धोरण जाहीर करण्यात येईल. नेतेमंडळी चर्चा करुन निर्णय घेतील. सध्या तरी जे इच्छुक आहेत त्यांनी अर्ज भरण्यास प्रारंभ केला आहे. येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेण्यासाठी जयंत पाटील बैठक घेणार आहेत. त्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येईल. (प्रतिनिधी)इच्छुकांच्या संख्येमुळे निर्णय लांबणीवरसांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी इच्छुकांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढल्याने राष्ट्रवादी पक्षाने आपला निर्णय लांबणीवर टाकला आहे. एके ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यास इच्छुक दुसऱ्या पक्षात जाण्याच्या भीतीमुळे ऐनवेळी पक्षाचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. सध्या तरी इच्छुकांकडून उमेदवारी दाखल करण्यात येत आहे. ६ जुलैपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत असून, पक्षाचे धोरण ४ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.